शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अखेर वर्तकनगरच्या ४० पोलीस कुटूंबीयांवरील गडांतर टळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 22:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : तांत्रिकदृष्ट्या अती धोकादायकमध्ये गणल्या गेलेल्या वर्तकनगर येथील १४ आणि १६ या दोन इमारतींच्या रहिवाशांना ...

ठळक मुद्देखासदार राजन विचारे यांची मध्यस्थीपोलीस आयुक्तांनी दिला हिरवा कंदील

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: तांत्रिकदृष्ट्या अती धोकादायकमध्ये गणल्या गेलेल्या वर्तकनगर येथील १४ आणि १६ या दोन इमारतींच्या रहिवाशांना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यापाठोपाठ पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनीही हिरवा कंदील दिला आहे. शिवसेना खासदार राजन विचारे यांच्यासह या रहिवाशांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर आयुक्तांनी या कारवाईला तूर्तास स्थगिती दिल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.ठाणे महानगरपालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त चारुशीला पंडित यांनी म्हाडा वसाहतीमधील पोलीस निवासस्थाने असलेल्या इमारत क्रमांक १४ आणि १६ या दोन इमारतींना धोकादायक इमारतीचे तांत्रिक परिक्षण अहवाल (स्ट्रक्चरल आॅडिट रिपोर्ट) तसेच स्थैर्यता प्रमाणपत्र (स्टॅबिलिटी सर्टीफिकेट) सादर करण्याची नोटीस बजावली होती. मात्र, हे कोविडमुळे हे स्थैर्यता प्रमाणपत्र वेळेत देता न आल्यामुळे इमारतीला अतिधोकादायकचा फलक लावला. ती तातडीने रिक्त करण्याची पालिकेने पोलीस प्रशासनाला नोटीसही बजावली. त्यामुळेच वर्तकनगर पोलिसांनी या इमारती अवघ्या ४८ तासांमध्येच रिक्त करण्याच्या नोटीसा बजावल्या होत्या. विशेष म्हणजे ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अहवालानुसार इमारत सी- २ बी या प्रवर्गामध्ये (अर्थात रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती करणे) समाविष्ट केली आहे. तरीही पालिका आणि पोलिसांच्या कारवाईच्या इशाऱ्यामुळे ही ४० कुटूंबे हवालदिल झाली होती.दरम्यान, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे या रहिवाशांनी गाºहाणे मांडल्यानंतर पालिकेने इमारतीची दुरुस्ती आणि स्थैर्यता अहवालाच्या अटीवर कारवाई थांबविली. तरीही पोलिसांकडून कारवाईचा इशारा आल्यानंतर ठाण्याचे खासदार राजन विचारे, शिवसेना विभागप्रमुख प्रशांत सातपुते आणि स्थानिक नगरसेविका विमल भोईर यांच्यासह रहिवाशांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तेंव्हा कोरोनासारखी जागतिक महामारीचा आजार, मुलांच्या आगामी वार्षिक परीक्षा आणि आगामी सण या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची कारवाई करु नये, अशी मागणी करण्यात आली. त्यास पोलीस आयुक्तांनीही सकारात्क दुजोरा दिला. त्यामुळे रहिवाशांनी खासदार राजन विचारे आणि पोलीस आयुक्तांचे आभार मानले. स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनीही या रहिवाशांवरील कारवाईच्या स्थगितीसाठी पालिका आणि पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा केला.* दरम्यान, बुधवारी (१४ आॅक्टोंबर) या रहिवाशांना वास्तुविशारदाने इमारतीचे स्थैर्यता प्रमाणपत्रही दिले. त्यामुळे ठाणे महापालिका प्रशासनाकडे हे प्रमाणपत्र देण्यात आल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.* काय होती मागणीइमारत अतिधोकादायक नसल्यामुळे पालिका आणि पोलीस प्रशासनाने कारवाई थांबवावी. दोन्ही इमारतींमध्ये कोविडचे १५ ते १६ रुग्ण बाधित आहेत. आगामी वार्षिक परीक्षा आणि कोविडचे संक्रमण या पार्श्वभूमीवर माणूसकीच्या दृष्टीने अशी कारवाई थांबविण्याची रहिवाशांची मागणी होती.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र