शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वादग्रस्त जागांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होत असल्याचा भाजपच्या माजी आमदारांचा आरोप 

By धीरज परब | Updated: October 10, 2022 15:03 IST

महाराणा प्रताप पुतळयाचे अनावरण दोन वर्षां पूर्वीच झाले आहे त्यामुळे आता परवानगी मिळाली म्हणून पुन्हा अनावरण करणे योग्य होणार नाही . 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मंगळवार ११ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या काही भूमिपूजनच्या जागा वादग्रस्त व तांत्रिक अडचणीच्या असल्याचे तसेच पुतळ्याचे पुन्हा अनावरण योग्य नाही असे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे . इतकेच नव्हे तर नाट्यगृहाच्या कार्यक्रमाला जाऊ पण त्या ३ कार्यक्रमांना जाणार नाही असे त्यांनी म्हटले आहे . त्यामुळे सरकारला मेहतांनी दिलेला घरचा आहेर मानला जात आहे. 

मेहता यांनी रविवारी त्यांच्या सेव्हन इलेव्हन शाळेच्या आवारातील भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमातील महापालिका प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन , रुग्णालयाचे भूमिपूजन आणि महाराणी प्रताप यांच्या पुतळ्याच्या अनावरण बद्दल आक्षेप घेत गंभीर आरोप केले. 

महाराणा प्रताप पुतळयाचे अनावरण दोन वर्षां पूर्वीच झाले आहे त्यामुळे आता परवानगी मिळाली म्हणून पुन्हा अनावरण करणे योग्य होणार नाही . पालिका प्रशासकीय भवन शहराच्या टोकाला वेस्टर्न हॉटेल जवळ बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन हे वादग्रस्त जागी असून एक दोन जमिनीचे वाद उच्च न्यायालयात सुरु आहेत . विकासकाने सर्व चटईक्षेत्र वापरले असून उद्यान , ऍमेनिटी स्पेस व निवासी क्षेत्राच्या जागा असे एकत्र करून हि इमारत केली जाणार आहे . शासना कडून सुद्धा कलम ३७ खाली केलेला आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर होईल असे वाटत नाही . पूर्वी असेच प्रशासकीय भवनचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते . पण आजही ते जमीन वादा मुळे झाले नाही . म्हणून पुन्हा वादग्रस्त जागी भूमिपूजन करून पुढे काम न झाल्यास शहराची दिशाभूल होईल व जनता आपल्यावर हसेल. 

मीरारोड येथील रुग्णालयाचे शहरातले एकमेव आरक्षण क्रमांक ३०२ हे आहे . त्या संपूर्ण जागेत रुग्णालय विकसित करावे असा ठराव २०१६ साली महासभेने केला असून शासना कडून निधी आणून रुग्णालय बांधावे असा निर्णय झाला होता . मात्र आता प्रशासकीय राजवटीत पालिकेने रातोरात विकासकाला आरक्षणाच्या जागेत  त्याच्या व्यावसायिक इमारतींसाठी ६ लाख फुटाच्या बांधकामास परवानगी देत रुग्णालयाच्या इमारतीसाठी केवळ ११ हजार चौरस फुटाचे बांधकाम करून मिळणार आहे . इतक्या कमी जागेत ओपीडी सुद्धा चालणार नाही तर रुग्णालय कसे होणार ? हे कोणाच्या फायद्यासाठी आहे असा सवाल करत भ्रष्टाचारचा संशय व्यक्त केला आहे. हा प्रकार शहराला घातक असल्याचा आरोप मेहतांनी केली . 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरPoliticsराजकारण