शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

बहुप्रतिक्षित आगरी भवनची निर्मिती राजकीय खेळात अडकणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 20:07 IST

पुर्वेकडील आझाद नगर या पालिकेच्या आरक्षित भूखंडावर उद्यान व सामाजिक वनीकरणाचे आरक्षण क्रमांक १२२ टाकण्यात आले असताना त्यावर बहुप्रतिक्षित आगरी भवनच्या निर्मिचा प्रस्ताव आजच्या महासभेत विचार विनिमयासाठी आणण्यात येणार आहे.

- राजू काळे  

भार्इंदर - पुर्वेकडील आझाद नगर या पालिकेच्या आरक्षित भूखंडावर उद्यान व सामाजिक वनीकरणाचे आरक्षण क्रमांक १२२ टाकण्यात आले असताना त्यावर बहुप्रतिक्षित आगरी भवनच्या निर्मिचा प्रस्ताव आजच्या महासभेत विचार विनिमयासाठी आणण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात याच भूखंडावर अनेक विकासकामे करण्यात आली असताना त्याला छेद देत आगरी समाजाला खूष करण्यासाठी राजकीय डावपेच आखले जात असुन या राजकीय खेळात आगरी भवन अडकण्याची शक्यता काही राजकीय तज्ञांकडून वर्तविली जात असल्याने या समाजाच्या मागणीला हरताळ फासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

आझाद नगर येथील भूखंडावर अनेक आद्योगिक वसाहतींसह झोपडपट्टी व धार्मिक स्थळे बेकायदेशीरपणे वसविण्यात आली आहेत. या भूखंडावरील आरक्षणानुसार उद्यान व सामाजिक वनीकरण प्रस्तावित असून त्याचा विकास करण्यासाठी पालिकेने मात्र अद्याप कोणतीही पावले उचलली नाहीत. अतिक्रमण वसविले जात असताना प्रशासन झोपा काढीत होते कि काय, असा प्रश्न सध्या उपस्थित होऊ लागला आहे. २०१२ मध्ये याच भूखंडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण निर्मुलन पथकावर तेथील उद्योजकांसह स्थानिकांनी दगडफेक केली होती. त्यात पथकातील अधिकारी व कर्मचारी जखमी झाले होते. याप्रकरणी पालिकेने सुमारे २० ते २२ जणांवर नवघर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. तत्पुर्वी व तद्नंतर देखील तेथील अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र त्यात अपेक्षेनुसार राजकीय हस्तक्षेप करण्यात आला. त्यामुळे आजपर्यंत तेथील अतिक्रमण जैसे थे आहे. गेल्या वर्षी या भूखंडावर स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक व संग्रहालय साकारण्याचा प्रस्ताव महासभेत मंजुर करण्यात आला. या भूखंडाच्या एकुण ४६ हजार ७०० चौरस मीटर जागेपैकी ३० हजार ५३३ चौरस मीटर जागा पालिकेच्या ताब्यात आल्याचा दावा प्रशासनाकडुन केला जात आहे. या जागेपैकी ४ हजार ५८० चौरस मीटर जागेवर बाळासाहेब ठाकरे स्मारक प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे ५० कोटींहुन अधिक खर्च अंदाजित करण्यात आला असुन त्याला तत्कालिन आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी मान्यता दिली आहे.  स्मारकासाठी पालिकेकडुन दोन टप्प्यांत २५ कोटींची तरतूद करण्यात येणार असुन उर्वरीत २५ कोटींच्या निधीसाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे व आ. प्रताप सरनाईक यांनी काही महिन्यांपुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने स्मारकाच्या कामाला येत्या मे महिन्यात सुरुवात होणार असून येत्या दोन वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याचे सरनाईक यांच्याकडुन सांगण्यात आले. अशा परिस्थितीतही सत्ताधारी भाजपाने या भूखंडावर आगरी समाजाचे भवन निर्मितीचा प्रस्ताव आजच्या महासभेत आणून राजकीय खेळाला सुरुवात केल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान या भूखंडावर टाकण्यात आलेल्या आरक्षणात बदल करण्याचा प्रस्ताव पालिकेने राज्य सरकारकडे २८ मार्च २०१२ रोजी पाठविला होता. त्याला राज्य सरकारने अमान्य केल्याने तुर्तास नवीन विकास आराखड्यातील बदलाची वाट पहावी लागणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

आरक्षण क्रमांक १२२ वर यापुर्वी ज्या विकासकामांचे प्रस्ताव मंजुर करण्यात आले आहेत ते अगोदर रद्द करण्यात यावेत. यानंतरच आगरी भवन निर्मितीसह इतर विकासकामांची आरक्षणे त्या भूखंडावर अधिकृतपणे टाकून त्याचा विकास व्हावा. त्यासाठी प्रशासनाने ठोस प्रयत्न करावेत.  मात्र कोणत्याही समाजाची दिशाभूल होऊ नये, अशी अपेक्षा आहे.

-  भाजपा नगरसेविका गीता जैन 

त्या भूखंडावर असलेली अतिक्रमणे पालिकेने अद्याप हटविलेली नाहीत. अशातच त्यावर टाकण्यात आलेल्या आरक्षणाच्या फेरबदलास राज्य सरकारने मान्यता दिली नाही. तरीदेखील आरक्षणाखेरीज इतर काही विकासकामे त्यावर प्रस्तावित करण्यात येऊन विविध समाजासह काही पक्षांच्या भावनांचा सत्ताधाऱ्यांनी राजकीय खेळ मांडला आहे. 

-  काँग्रेस नगरसेवक अनिल सावंत 

आगरी समाज हा शहरातील मुळ भूमीपुत्र असुन या समाजाने अनेकदा त्या आरक्षणावर समाजाची इमारत साकारण्याची मागणी केली आहे. मात्र त्याला सर्वच राजकीय पक्ष व त्यातील पुढाय््राांनी समाजाच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. मात्र आजच्या महासभेतही सत्ताधारी भाजपाने या समाजाच्या भावनांचा राजकीय खेळ मांडू नये, अशी अपेक्षा आहे. 

 शिवसेना शहरप्रमुख धनेश पाटील 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरthaneठाणे