शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

वणव्यामुळे वनसंपदेचा -हास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 02:26 IST

मार्च महिना सुरू होताच उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत.

दासगांव : मार्च महिना सुरू होताच उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तापमान वाढल्याने वणवे लागण्याचे प्रकारही वाढले आहेत. रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी लागणाऱ्या वणव्यांतून आगीच्या ज्वालांनी वातावरण आणखीनच तापले आहे. याचा परिणाम मानवी जीवनावर, तसेच पशू-पक्ष्यांवर होत असून, वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. दोन दिवसांपासून दासगाव डोंगर भागात लागलेल्या वणव्यामुळे परिसरात उष्णतेत वाढ झाली आहे. हा वणवा विझवण्यासाठी पुरेशी यंत्रणा कार्यान्वित नसल्याने उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत.कोकणातील बहुतांश गावे ही डोंगर कुशीमध्ये वसलेली आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून येथील वनसंपत्तीमुळे कोकणातील तापमान कायम कमी किंवा थंड राहिलेले आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळे वनसंपदा नष्ट होत आहे. यामुळे कोकणातील तापमानाचा पाढा दिवसेंदिवस वाढू लागलेला दिसून येत आहे. त्यातच शेतकºयांच्या गैरसमजुतीतून आणि नैसर्गिकरीत्या वणवा लागण्याचे प्रमाणदेखील वाढू लागले आहे.एकीकडे शेतकरी परंपरागत पद्धतीतून भातशेती करण्यासाठी जंगलातील झाडांच्या कोवळ्या फांद्या तोडून तरवा भाजण्याचे काम करीत आहे. त्यामुळे वनसंपत्तीचा ºहास आणि वातावरणावरील परिणाम होत आहे. पूर्वीपासूनच्या डोंगरांना वणवा लावून गवत जाळण्याचे प्रमाणदेखील आजही कायम आहे. यामुळे जानेवारी महिन्यापासूनच विविध ठिकाणी डोंगरात आगीचे लोट उठताना दिसतात.शासकीय पातळीवर वणवा आणि तरवा भाजणीबाबत जनजागृती करण्यात येत असली तरी वारंवार लागणारे वणव्यांचे प्रकार बघता शेतकºयांनी परंपरागत शेतीत बदल केला नसल्याचेच दिसून येत आहे. नेहमीच अशाच प्रकारे वणवा लागल्याने सध्या असलेल्या तापमानामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाड तालुक्यात असे वणवे लागण्याचे प्रकार होत आहेत. दासगावमध्ये दोन दिवसांपूर्वी महामार्गालगतच्या डोंगरामध्ये मोठ्या प्रमाणात वणवा लागला आहे. त्यात संपूर्ण डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी गेला आहे.