शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
3
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
4
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
5
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
6
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
7
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
8
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
9
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
10
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
12
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
13
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
14
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!
15
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसला मसूद अजहर; आता बिलावल भुट्टो आपला शब्द खरा करणार का?
16
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
17
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
18
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
19
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
20
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान

आगीच्या १८४ घटनांमध्ये वनसंपदा जळून खाक; जंगल वाचविण्यासाठी प्रयत्नांची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 00:35 IST

शहापूर तालुक्यातील चित्र : नागरिकांनी वणवे विझविण्यासाठी वनविभागाला सहकार्य करण्याकरिता व वने किती महत्वाची आहेत

जनार्दन भेरेभातसानगर : शहापूर तालुका जसा डोंगरदऱ्या असणारा तसाच तो जंगलांनी भरलेला तालुका आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या जंगलांना  लागणाऱ्या वणव्यामुळे ही वनसंपदा आता धोक्यात आली असून ती वाचविण्यासाठी गावपातळीवर प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. अनेक वनौषधी असून शिकारीच्या हेतूने वा अनावधानाने लागलेल्या आगीमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे, लावल्या जाणाऱ्या वणव्यांमुळे ही संपदा आता धोक्यात आली आहे. गेल्या ‌‌‌वर्षभरात १८४ घटनांमध्ये वनसंपदा खाक झाली आहे.

कसारा, वाशाळा, डोळखांब, वासिंद, शहापूर या सर्वच परिसरात दररोज वणवे लावले जात असून यामुळे मोठमोठी झाडे पेटल्याने उन्मळून पडत आहेत. शिकारीच्या उद्देशाने तर काही जंगले तस्करीच्या उद्देशाने तर अगदी बोटावर मोजण्याइतकेच वणवे नैसर्गिक आपत्तीतून निर्माण होत आहेत. मात्र हे वणवे विझविण्यासाठी गावकरी पुढे येताना दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याची कारणमीमांसा केल्यानंतर आज शेतीचे प्रमाण कमी झाले असून त्यासाठी लागणारे गवत लागत नसल्याने नागरिक वणवे विझविण्यासाठी पुढे येत नसल्याची बाब उघड झाली आहे. या मागचे कारण शोधणे गरजेचे आहे.

नागरिकांनी वणवे विझविण्यासाठी वनविभागाला सहकार्य करण्याकरिता व वने किती महत्वाची आहेत, त्यांचे संगोपन व संरक्षण किती महत्त्वाचे आहे हे पटवून देण्यासाठी कीर्तनाची जोड दिली जात असून गाव परिसरात जनजागृती केली जात आहे. त्यासाठी  उपवनसंरक्षक वसंत घुले, प्रकाश चौधरी, प्रियांका उबाळे, संदीप तोरडमल, प्रशांत निकाळजे, मयूर बोठे व वन क्षेत्रपाल  जयवंत फर्डे  प्रयत्न करीत आहेत. 

टॅग्स :fireआग