शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

चार तासांच्या व्यापारामुळे अन्नधान्यटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:40 IST

कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासठी अत्यावश्यक सेवेतील अन्नधान्याची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवावीत, असे उपमुख्यमंत्री ...

कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासठी अत्यावश्यक सेवेतील अन्नधान्याची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवावीत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, त्याचा लेखी आदेश महापालिका प्रशासन आणि पोलिसांना प्राप्त झालेला नाही. त्यामुळे कल्याणमधील होलसेल अन्नधान्य व्यापारी वर्गात याविषयी संभ्रमाची स्थिती आहे. चार तासांत अन्नधान्याचा व्यापार कसा होणार, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. व्यापाराची वेळ वाढवून द्यावी. अन्यथा कल्याण डोंबिवलीत येत्या काही दिवसांत अन्नधान्याचा तुटवडा होण्याची दाट शक्यता व्यापारी वर्गाने व्यक्त केली आहे.

कल्याणमध्ये झुंझारराव मार्केट आाणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत अन्नधान्याची मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत ५० पेक्षा जास्त व्यापारी अन्नधान्याचा व्यापार करतात. त्या ठिकाणी डाळ, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, मसाले, तेल आदी माल राज्यासह परराज्यातून येतो. विदर्भातून तांदूळ येतो. मध्य प्रदेशातून गहू येतो. पश्चिम बंगाल, कर्नाटक, आंध्रातून तांदूळ येतो. या बाजारात दररोज ३०० टन माल येतो. एका दुकानात चार कर्मचारी काम करतात. त्यामुळे या व्यापारावर शेकडो कुटुंबीयांचे पोटपाणी आहे.

होलसेल मार्केटचे सचिव नरेंद्र परमार यांनी सांगितले की, चार तासांत व्यापार कसा करणार? दिलेली वेळ खूपच कमी आहे. त्याचा लेखी आदेशही प्राप्त झालेला नाही. महापालिकेने त्याविषयी व्यापारी वर्गास मार्गदर्शन करावे. कारण व्यापारी संभ्रमावस्थेत आहेत. राज्यातून - परराज्यातून जो माल येतो ते लोडिंग - अनलोडिंग कधी करणार? सध्या माथाडी कामगार कमी आहेत. कोरोनाच्या भीतीपोटी निम्मे माथाडी कामगार गावी गेले आहेत. वेळ वाढवून न दिल्यास अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. व्यापारी प्रकाश गोयल यांनी सांगितले की, सकाळी ७ ते ११ या वेळेत व्यापार करणे शक्य नाही. त्याचे कारण व्यापार केल्यावर बँकेचे व्यवहार कधी करणार? आलेल्या मालाचा हिशोब चुकता कसा करणार, असा प्रश्न आहे. त्यामुळे वेळ वाढवून दिली पाहिजे. व्यापारी हेमंद देढिया यांनी सांगितले की, माथाडी कामगार कमी असल्याने एका अन्नधान्याच्या गाडीतून माल उतरविण्यासाठीच चार ते पाच तास वेळ लागतो. त्यामुळे गाडी खाली कधी करणार? आणि व्यापार कधी करणार, असा प्रश्न आहे. चार तासांऐवजी किमान दुपारी १ वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्यात यावी.

---------------------------