शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

चार तासांच्या व्यापारामुळे अन्नधान्यटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:40 IST

कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासठी अत्यावश्यक सेवेतील अन्नधान्याची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवावीत, असे उपमुख्यमंत्री ...

कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासठी अत्यावश्यक सेवेतील अन्नधान्याची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवावीत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, त्याचा लेखी आदेश महापालिका प्रशासन आणि पोलिसांना प्राप्त झालेला नाही. त्यामुळे कल्याणमधील होलसेल अन्नधान्य व्यापारी वर्गात याविषयी संभ्रमाची स्थिती आहे. चार तासांत अन्नधान्याचा व्यापार कसा होणार, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. व्यापाराची वेळ वाढवून द्यावी. अन्यथा कल्याण डोंबिवलीत येत्या काही दिवसांत अन्नधान्याचा तुटवडा होण्याची दाट शक्यता व्यापारी वर्गाने व्यक्त केली आहे.

कल्याणमध्ये झुंझारराव मार्केट आाणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत अन्नधान्याची मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत ५० पेक्षा जास्त व्यापारी अन्नधान्याचा व्यापार करतात. त्या ठिकाणी डाळ, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, मसाले, तेल आदी माल राज्यासह परराज्यातून येतो. विदर्भातून तांदूळ येतो. मध्य प्रदेशातून गहू येतो. पश्चिम बंगाल, कर्नाटक, आंध्रातून तांदूळ येतो. या बाजारात दररोज ३०० टन माल येतो. एका दुकानात चार कर्मचारी काम करतात. त्यामुळे या व्यापारावर शेकडो कुटुंबीयांचे पोटपाणी आहे.

होलसेल मार्केटचे सचिव नरेंद्र परमार यांनी सांगितले की, चार तासांत व्यापार कसा करणार? दिलेली वेळ खूपच कमी आहे. त्याचा लेखी आदेशही प्राप्त झालेला नाही. महापालिकेने त्याविषयी व्यापारी वर्गास मार्गदर्शन करावे. कारण व्यापारी संभ्रमावस्थेत आहेत. राज्यातून - परराज्यातून जो माल येतो ते लोडिंग - अनलोडिंग कधी करणार? सध्या माथाडी कामगार कमी आहेत. कोरोनाच्या भीतीपोटी निम्मे माथाडी कामगार गावी गेले आहेत. वेळ वाढवून न दिल्यास अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. व्यापारी प्रकाश गोयल यांनी सांगितले की, सकाळी ७ ते ११ या वेळेत व्यापार करणे शक्य नाही. त्याचे कारण व्यापार केल्यावर बँकेचे व्यवहार कधी करणार? आलेल्या मालाचा हिशोब चुकता कसा करणार, असा प्रश्न आहे. त्यामुळे वेळ वाढवून दिली पाहिजे. व्यापारी हेमंद देढिया यांनी सांगितले की, माथाडी कामगार कमी असल्याने एका अन्नधान्याच्या गाडीतून माल उतरविण्यासाठीच चार ते पाच तास वेळ लागतो. त्यामुळे गाडी खाली कधी करणार? आणि व्यापार कधी करणार, असा प्रश्न आहे. चार तासांऐवजी किमान दुपारी १ वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्यात यावी.

---------------------------