शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

चार तासांच्या व्यापारामुळे अन्नधान्यटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:40 IST

कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासठी अत्यावश्यक सेवेतील अन्नधान्याची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवावीत, असे उपमुख्यमंत्री ...

कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासठी अत्यावश्यक सेवेतील अन्नधान्याची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवावीत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, त्याचा लेखी आदेश महापालिका प्रशासन आणि पोलिसांना प्राप्त झालेला नाही. त्यामुळे कल्याणमधील होलसेल अन्नधान्य व्यापारी वर्गात याविषयी संभ्रमाची स्थिती आहे. चार तासांत अन्नधान्याचा व्यापार कसा होणार, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. व्यापाराची वेळ वाढवून द्यावी. अन्यथा कल्याण डोंबिवलीत येत्या काही दिवसांत अन्नधान्याचा तुटवडा होण्याची दाट शक्यता व्यापारी वर्गाने व्यक्त केली आहे.

कल्याणमध्ये झुंझारराव मार्केट आाणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत अन्नधान्याची मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत ५० पेक्षा जास्त व्यापारी अन्नधान्याचा व्यापार करतात. त्या ठिकाणी डाळ, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, मसाले, तेल आदी माल राज्यासह परराज्यातून येतो. विदर्भातून तांदूळ येतो. मध्य प्रदेशातून गहू येतो. पश्चिम बंगाल, कर्नाटक, आंध्रातून तांदूळ येतो. या बाजारात दररोज ३०० टन माल येतो. एका दुकानात चार कर्मचारी काम करतात. त्यामुळे या व्यापारावर शेकडो कुटुंबीयांचे पोटपाणी आहे.

होलसेल मार्केटचे सचिव नरेंद्र परमार यांनी सांगितले की, चार तासांत व्यापार कसा करणार? दिलेली वेळ खूपच कमी आहे. त्याचा लेखी आदेशही प्राप्त झालेला नाही. महापालिकेने त्याविषयी व्यापारी वर्गास मार्गदर्शन करावे. कारण व्यापारी संभ्रमावस्थेत आहेत. राज्यातून - परराज्यातून जो माल येतो ते लोडिंग - अनलोडिंग कधी करणार? सध्या माथाडी कामगार कमी आहेत. कोरोनाच्या भीतीपोटी निम्मे माथाडी कामगार गावी गेले आहेत. वेळ वाढवून न दिल्यास अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. व्यापारी प्रकाश गोयल यांनी सांगितले की, सकाळी ७ ते ११ या वेळेत व्यापार करणे शक्य नाही. त्याचे कारण व्यापार केल्यावर बँकेचे व्यवहार कधी करणार? आलेल्या मालाचा हिशोब चुकता कसा करणार, असा प्रश्न आहे. त्यामुळे वेळ वाढवून दिली पाहिजे. व्यापारी हेमंद देढिया यांनी सांगितले की, माथाडी कामगार कमी असल्याने एका अन्नधान्याच्या गाडीतून माल उतरविण्यासाठीच चार ते पाच तास वेळ लागतो. त्यामुळे गाडी खाली कधी करणार? आणि व्यापार कधी करणार, असा प्रश्न आहे. चार तासांऐवजी किमान दुपारी १ वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्यात यावी.

---------------------------