शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
2
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
3
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
4
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
5
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल
6
१९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप
7
Zubeen Garg Death: झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा
8
Perplexity Comet AI ब्राउझर 'गुगल क्रोम'ला धक्का देणार! हे ५ प्रमुख फिचर आहेत जबरदस्त
9
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
10
Cough Syrup: कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा
11
Thane: पीएसआय स्नेहा करणाळे यांना ऑल इंडिया पोलीस बॉडीबिल्डिंग स्पर्धेत 'सुवर्ण'
12
ATP Masters 1000: वयाच्या ३८व्या वर्षीही नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
13
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
14
Astro Tips: वैवाहिक सुखासाठी नवरा बायकोने दर शनिवारी लवंगीने दृष्ट कशी काढावी? वाचा 
15
Penny Stock देणार १० बोनस शेअर्स, कधी आहे रकॉर्ड डेट? ५ वर्षांत ११००% वधारला 'हा' शेअर
16
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
17
Nitish Reddy Flying Catch: नितीश रेड्डी बनला सुपरमॅन, सिराजच्या गोलंदाजीवर घेतला जबरदस्त कॅच!
18
या राज्यात धोकादायक कफ सिरपवरही बंदी; मुलांच्या मृत्यूनंतर लगेच कारवाई
19
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
20
शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात

भिवंडीच्या पाण्याला पाठपुराव्याचा खोडा

By admin | Updated: February 22, 2016 00:38 IST

महानगरपालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करण्यासाठी बनविलेली स्वतंत्र पाणीपुरवठा योजना गेल्या दोन वर्षांपासून लाल फितीत अडकली असून त्यासाठी मनपा प्रशासनाने पाठपुरावा

भिवंडी : महानगरपालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करण्यासाठी बनविलेली स्वतंत्र पाणीपुरवठा योजना गेल्या दोन वर्षांपासून लाल फितीत अडकली असून त्यासाठी मनपा प्रशासनाने पाठपुरावा केला नसल्याचे सूत्राकडून समजते. त्यामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली असून त्यासाठी मनपा प्रशासनाने प्रयत्न करावे, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.महानगरपालिका क्षेत्रात विकास होत असताना वाढत्या लोकसंख्येसाठी नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी महानगरपालिकेस भातसा धरणातून १०० एमएलडी पाणी मंजूर झाले असून ते पाणी नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मनपाने स्वतंत्र पाणीपुरवठा योजना बनविली असून ती सध्या शासनाकडे प्रलंबित आहे. सध्या मनपा क्षेत्रातील नागरिकांसाठी मुंबई मनपाकडून ४० एमएलडी, स्टेमकडून ७३ एमएलडी व वऱ्हाळा तलावामधून २ एमएलडी असे एकूण ११५ एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार भविष्यात लागणाऱ्या पाण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन मनपाने खाजगी सहकारी भागीदारी तत्त्वावर १०० एमएलडी पाण्याची योजना केली आहे. भातसा धरणातून पिसे येथील बंधाऱ्यातून १०० एमएलडी पाणी घेऊन ते कार्यान्वित करणे व वारणा नाल्यावर खडकीखुर्द येथे मध्यम आकाराचे धरण बांधणे, अशी योजना आहे. तसेच शहराच्या आजूबाजूच्या नदी-खोऱ्याचे सर्वेक्षण करून नवीन स्त्रोत निर्माण करण्याचा प्रस्ताव तयार करून ५७१.११ कोटींचा प्रकल्प अहवाल महासभेपुढे ठेवला होता. तेव्हा विशेष हेतू यंत्रणेमार्फत हा प्रकल्प राबविण्यासाठी मंजुरी दिली. मनपाने निविदा प्रक्रिया पूर्ण करून हे काम मे.एस.पी.एम.एल. इन्फ्रा लि. यांना वारणा व भातसा पिसे धरण बांधा, वापरा व हस्तांतरित करा, या तत्त्वावर कार्यान्वित करण्याची मान्यता महासभेने नोव्हेंबर २००७ मध्ये दिली. या ठरावानुसार डिसेंबर २००९ मध्ये करारनामा करण्यात आला. हा प्रकल्प राबविण्यासाठी विलंब होणार असल्याने वाढत्या लोकसंख्येसाठी आवश्यक असलेला १०० एमएलडी पाणीपुरवठा तातडीने भातसा धरणातून मंजूर करण्यासाठी मनपाव्दारे मार्च २०१२ मध्ये शासनास पत्र पाठविले. शासनस्तरावर अनुकूल निर्णय होऊन १०० एमएलडी पाणी मंजूर करण्यात आले. या शासन निर्णयाप्रमाणे मूळ प्रकल्पांचा समावेश असलेला फेर विस्तृत प्रकल्प अहवाल मनपाव्दारे तयार करून ५६८ कोटीचा प्रस्ताव तयार करण्यात आला.स्वतंत्र योजनेनंतरच पाणीप्रश्न निकाली निघणारया प्रकल्पासाठी लागणाऱ्या राज्य व केंद्र शासनाच्या मंजुऱ्या तत्कालीन आयुक्तांनी प्राप्त करून घेतल्या आहेत.मनपा महासभा ठरावाच्या व शासनाकडून मंजूर सवलत करारनाम्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेस भातसा धरणातील १०० एमएलडी प्रतिदिन पाणीपुरवठा पिसे येथून उपसा करून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचे कार्य विशेष हेतू यंत्रणेमार्फत राबविण्यासाठी मान्यता देऊन मंजुरी मिळावी, अशा मागणीचे पत्र तत्कालीन आयुक्त जीवन सोनावणे यांनी आॅक्टोबर २०१३ साली राज्याच्या प्रधान सचिवांना पाठविले आहे. शहरात ठिकठिकाणी पाणीटंचाई जाणवत आहे. नागरिकांचे मोर्चे पालिकेत येत असताना विद्यमान आयुक्त व लोकप्रतिनीधींनी या प्रकल्पासाठी शासनाकडे पाठपुरावा केला तर स्वतंत्र पाणीयोजना निर्माण होऊन पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.