शहरं
Join us  
Trending Stories
1
आत्मा कायम राहत असतो, हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही; शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला
2
SA vs BAN : WHAT A MATCH! माफक लक्ष्य पण संघर्ष मोठा; गोलंदाजांची कमाल, अखेर बांगलादेश चीतपट
3
निवडणूक प्रचारादरम्यान मर्यादांचे उल्लंघन, सरसंघचालकांनी टोचले राजकीय नेत्यांचे कान...
4
मणिपूर वर्षभरापासून शांततेच्या शोधात, प्राधान्याने विचार करावा लागेल: सरसंघचालक मोहन भागवत
5
'तुमच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास...', नवाज शरीफ यांनी केले पीएम नरेंद्र मोदींचे अभिनंदन
6
महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणते खाते?; मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसेंवर मोठी जबाबदारी
7
PM Modi Cabinet : गुजरातचे मनसुख मांडविया देशाचे नवे क्रीडा मंत्री; कोण आहेत ते? जाणून घ्या
8
नवीन सरकारमध्येही PM मोदींची कोअर टीम कायम; देशाची सुरक्षा 'या' मंत्र्यांच्या खांद्यावर...
9
SA vs BAN Live : वर्ल्ड कपमध्ये चाललंय काय? बांगलादेशसमोर आफ्रिकेची ट्वेंटी-२० मध्ये 'कसोटी'
10
Rohit Pawar : "८५ वर्षीय शरद पवारांना, ८५ आमदारांचं गिफ्ट देऊ"; वर्धापनदिनाच्या भाषणात रोहित पवारांनी आकडाच सांगितला
11
नरेंद्र मोदींकडे कुठली खाती, देशाचे कृषी मंत्री कोण?; खातेवाटप जाहीर, वाचा संपूर्ण यादी
12
PHOTOS : विराट कोहलीला प्रपोज करणाऱ्या महिला क्रिकेटपटूचं गर्लफ्रेंडसोबत लग्न
13
मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, महामार्ग अन् रेल्वे मंत्रालय भाजपकडे...
14
Ajit Pawar : वर्धापन कार्यक्रमात अजितदादा शरद पवारांचे नाव घेऊन भावुक; म्हणाले, "२४ वर्ष साहेबांनी पक्षाचं...",
15
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; ३ कोटी लोकांना होणार फायदा
16
काहीजण संपर्कात, योग्यवेळी आमच्यासोबत येतील; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला सूचक इशारा
17
टीम इंडिया पाकिस्तानात जाणार? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ICC कडे सोपवले वेळापत्रक
18
भाजपा मोठा भाऊ मान्य, पण शिंदेंना जितक्या जागा तितक्याच आम्हाला मिळाव्यात - छगन भुजबळ
19
आमचे 7 खासदार असूनही आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद का नाही? शिंदे गटाने जाहीर केली नाराजी...
20
"आमचे १०५ आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री झालेत"; श्रीरंग बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त

शेतात पाणी आणण्यासाठी चाऱ्यांना ताडपत्रीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:40 AM

भातसानगर : शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पाण्यासाठीच्या चाऱ्या निकामी झाल्याने आता त्यांना प्लास्टिकच्या मेणकापडाचा ...

भातसानगर : शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पाण्यासाठीच्या चाऱ्या निकामी झाल्याने आता त्यांना प्लास्टिकच्या मेणकापडाचा स्वखर्चाने मुलामा देऊन पाणी शेतात घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

तालुक्यातील भातसा धरणातून शहापूर, भिवंडी या तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी उन्हाळ्यात पाणी दिले जाते. मात्र आज शहापूर तालुक्यातील शेकडो एकर शेती ही पाण्याविना ओसाड पडली असून या शेतीसाठी तयार करण्यात आलेल्या चाऱ्या या निकामी झाल्याने पाणी शेवटच्या टोकापर्यंत जात नसून ते जमिनीतच मुरते किंवा त्या तुटलेल्या चाऱ्यामधून इतरत्र निघून जाते. जागेवरच पाणी साठत असल्याने शेकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळतच नसल्याने दुबार शेतीचे प्रमाण कमी होत आहे.

आपल्या शेतापर्यंत पाणी येण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आता स्वखर्चाने त्यावर प्लास्टिकची ताडपत्री टाकून आपल्या शेतात पाणी आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. असाच प्रयत्न दहागाव येथील शेतकरी करीत असून तालुक्यात कालव्याच्या जवळ असणाऱ्या व सिंचनाखाली असलेल्या शेतीसाठी हे केविलवाणा प्रयत्न केले जात आहेत. या मोडकळीस असलेल्या चाऱ्यांची डागडुजी करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

फोटो ओळ : दहागाव येथे चाऱ्यावर अशी ताडपत्री टाकून शेतीसाठी पाणी घेण्यात येत आहे.