शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीचा कोपर दिशेकडील उड्डाणपूल २७ मे पासून वाहतुकीसाठी होणार बंद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 20:01 IST

मध्य रेल्वेचे महापालिकेला पत्र * आयआयटीच्या स्ट्रक्चरल आॅडिटनुसार रेल्वेचा निर्णय

ठळक मुद्देआयआयटीच्या स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये त्या पूलाची डागडुजी होणे अत्यावश्यक असल्याचे रेल्वेने महापालिकेला सोमवारी लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.धोकादायक पूलावरून वाहतूक करतांना जर काही अपघात झाला तर मात्र त्याला जबाबदार कोण? असा सवाल करत वाहतूक करायची की नाही अशी भिती वाहनचालकांमध्ये निर्माण झाली आहे.

डोंबिवलीडोंबिवली शहराला पूर्व पश्चिम जोडणारा कोपर दिशेकडील उड्डाणपूलाला डागडुजीची नितांत आवश्यकता असल्याने तो वाहतूकीसाठी २७ मे पासून बंद करण्यात यावा असे पत्र मध्य रेल्वेने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला लिहिले आहे. त्यामुळे हा पूल बंद झाल्यास त्याची दुरुस्ति कधीपासून सुरु होणार? किती दिवसांपर्यंत ते चालणार? तसेच ती डागडुजी कोण करणार या संदर्भात महापालिका प्रशासनाला कोणतेही तपशील माहिती नसल्याने डोंबिवलीकरांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. आयआयटीच्या स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये त्या पूलाची डागडुजी होणे अत्यावश्यक असल्याचे रेल्वेने महापालिकेला सोमवारी लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.१३ मे रोजी आयआयटीच्या तज्ज्ञांनी या संदर्भात सुरक्षा विषयक अहवाल मध्य रेल्वे प्रशासनाला दिला होता. त्यानूसार रेल्वे प्रशानाने तातडीने हा निर्णय घेतला आहे. येथील जाणकारांच्या माहितीनूसार १९८० दशकामध्ये हा उड्डाणपूल बांधण्यात आला. तेव्हापासून साधारणपणे दोन वेळा त्याची डागडुजी करण्यात आली होती. वरच्या भागातून जेथून वाहने जातात तेथे डांबरीकरणाचा रस्ता आहे. त्याठिकाणी डांबरीकरणाचे थर साठल्याने ते कमी करून पूलावरचे वजन कमी करण्यात आले होते. तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या काळात तो उपाय केला होता. त्यानंतर पूलाची संरक्षक भिंतींची डागडुजी, रेलींग आणि रंगरंगोटी अशी कामे करण्यात आली होती. मध्य रेल्वे प्रशासनानेही त्या पूलाचे लोखंड गंजू नये यासाठी काही वर्षांपूर्वी चंदेरी रंगकाम केले होते. पण फार मोठ्या प्रमाणावर गेल्या ३५ वर्षामध्ये काहीही काम हाती घेण्यात आलेले नाही. त्यामुळे आता ते काम करावे लागणार असल्याने वाहतूकीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. पावसाळयाच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आला तर मात्र डोंबिवलीकरांचे प्रचंड हाल होणार असून लाखो नागरिकांमध्ये नाराजी पसरलेली आहे. तसेच धोकादायक पूलावरून वाहतूक करतांना जर काही अपघात झाला तर मात्र त्याला जबाबदार कोण? असा सवाल करत वाहतूक करायची की नाही अशी भिती वाहनचालकांमध्ये निर्माण झाली आहे. आधीच कल्याणचा पत्रीपूलाचे काम कूर्मगतीने होत असल्याने त्यात आता हा पूल काही दिवसांसाठी का होईना बंद होणार असेल तर नागरिकांनी वाहतूक कोंडीमध्येच लटकायचे का? अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू असून नाराजी व्यक्त होत आहे.मध्य रेल्वेच्या पत्रासंदर्भात पुढे काय भूमिका घेणार यासंदर्भात महापालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी निवडणूक कामानिमित्ति आॅब्झरव्हर असल्याने विजयवाडा येथे व्यस्त असून यासंदर्भात नगररचना विभागातील वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा करावी असे त्यांनी सांगितले. त्यानूसार नगररचनाकार सपना कोळी यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, डोंबिवलीच्या उड्डाणपूलासंदर्भात व्हाट्सअपवरच या संदर्भात पत्राची प्रत मिळाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाशी यासंदर्भात बुधवारी पत्र पाठवणार आहे. त्यानूसार पूलामध्ये कोणते दोष आहेत? कुठे डागडुजी करावी लागणार आहे? ती रेल्वेने करायची की नाही? तसेच जोडरस्ते आहेत त्या ठिकाणी काही काम सुचवली असतील तर ती आमच्या माध्यमातून करायची का? त्या सगळयासाठी किती दिवसांचा अवधी लागणार आहे? किती निधी लागणार ही सर्व माहिती मागवली जाणार आहे. तसेच आयआयटी ने दिलेला अहवाल देखिल माहितीसाठी मागवून तज्ज्ञांची मते घेतली जाणार असल्याचे सांगितले.यासंदर्भात वाहतूक नियंत्रण पोलीस निरिक्षक सतेज जाधव म्हणाले की, असे कोणतेही पत्र, सूचना आम्हाला आमच्या वरिष्ठांनी दिलेल्या नाहीत. तसेच महापालिकेनेही संपर्क साधलेला नाही. यासंदर्भात सोशल मीडियावर चर्चा सुरु असून तेवढीच माहिती मिळाली आहे. पण संबंधित यंत्रणांकडून ठोस सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे आताच त्यासंदर्भात काहीही भाष्य करता येणार नाही असे ते म्हणाले.

ठाकूर्ली उड्डाणपूलाचा पर्याय* जर हा पूल २७ मे पासून वाहतूकीसाठी बंद झाला तर पूर्व पश्चिम वाहनांना ये जा करण्यासाठी ठाकुर्ली येथील नव्या उड्डाणपूलाचा एकमेव पर्याय असेल.पण तो पूल टू लेन असून आधीच अरुंद आहे. त्यातच पूलाचे ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या दिशेने काम सुरु आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेdombivaliडोंबिवली