शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
4
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
5
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
6
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
7
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
8
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
9
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
10
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
11
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
12
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
13
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
14
VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न
15
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
16
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
17
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
18
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
19
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
20
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी

डोंबिवलीचा कोपर दिशेकडील उड्डाणपूल २७ मे पासून वाहतुकीसाठी होणार बंद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 20:01 IST

मध्य रेल्वेचे महापालिकेला पत्र * आयआयटीच्या स्ट्रक्चरल आॅडिटनुसार रेल्वेचा निर्णय

ठळक मुद्देआयआयटीच्या स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये त्या पूलाची डागडुजी होणे अत्यावश्यक असल्याचे रेल्वेने महापालिकेला सोमवारी लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.धोकादायक पूलावरून वाहतूक करतांना जर काही अपघात झाला तर मात्र त्याला जबाबदार कोण? असा सवाल करत वाहतूक करायची की नाही अशी भिती वाहनचालकांमध्ये निर्माण झाली आहे.

डोंबिवलीडोंबिवली शहराला पूर्व पश्चिम जोडणारा कोपर दिशेकडील उड्डाणपूलाला डागडुजीची नितांत आवश्यकता असल्याने तो वाहतूकीसाठी २७ मे पासून बंद करण्यात यावा असे पत्र मध्य रेल्वेने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला लिहिले आहे. त्यामुळे हा पूल बंद झाल्यास त्याची दुरुस्ति कधीपासून सुरु होणार? किती दिवसांपर्यंत ते चालणार? तसेच ती डागडुजी कोण करणार या संदर्भात महापालिका प्रशासनाला कोणतेही तपशील माहिती नसल्याने डोंबिवलीकरांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. आयआयटीच्या स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये त्या पूलाची डागडुजी होणे अत्यावश्यक असल्याचे रेल्वेने महापालिकेला सोमवारी लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.१३ मे रोजी आयआयटीच्या तज्ज्ञांनी या संदर्भात सुरक्षा विषयक अहवाल मध्य रेल्वे प्रशासनाला दिला होता. त्यानूसार रेल्वे प्रशानाने तातडीने हा निर्णय घेतला आहे. येथील जाणकारांच्या माहितीनूसार १९८० दशकामध्ये हा उड्डाणपूल बांधण्यात आला. तेव्हापासून साधारणपणे दोन वेळा त्याची डागडुजी करण्यात आली होती. वरच्या भागातून जेथून वाहने जातात तेथे डांबरीकरणाचा रस्ता आहे. त्याठिकाणी डांबरीकरणाचे थर साठल्याने ते कमी करून पूलावरचे वजन कमी करण्यात आले होते. तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या काळात तो उपाय केला होता. त्यानंतर पूलाची संरक्षक भिंतींची डागडुजी, रेलींग आणि रंगरंगोटी अशी कामे करण्यात आली होती. मध्य रेल्वे प्रशासनानेही त्या पूलाचे लोखंड गंजू नये यासाठी काही वर्षांपूर्वी चंदेरी रंगकाम केले होते. पण फार मोठ्या प्रमाणावर गेल्या ३५ वर्षामध्ये काहीही काम हाती घेण्यात आलेले नाही. त्यामुळे आता ते काम करावे लागणार असल्याने वाहतूकीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. पावसाळयाच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आला तर मात्र डोंबिवलीकरांचे प्रचंड हाल होणार असून लाखो नागरिकांमध्ये नाराजी पसरलेली आहे. तसेच धोकादायक पूलावरून वाहतूक करतांना जर काही अपघात झाला तर मात्र त्याला जबाबदार कोण? असा सवाल करत वाहतूक करायची की नाही अशी भिती वाहनचालकांमध्ये निर्माण झाली आहे. आधीच कल्याणचा पत्रीपूलाचे काम कूर्मगतीने होत असल्याने त्यात आता हा पूल काही दिवसांसाठी का होईना बंद होणार असेल तर नागरिकांनी वाहतूक कोंडीमध्येच लटकायचे का? अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू असून नाराजी व्यक्त होत आहे.मध्य रेल्वेच्या पत्रासंदर्भात पुढे काय भूमिका घेणार यासंदर्भात महापालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी निवडणूक कामानिमित्ति आॅब्झरव्हर असल्याने विजयवाडा येथे व्यस्त असून यासंदर्भात नगररचना विभागातील वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा करावी असे त्यांनी सांगितले. त्यानूसार नगररचनाकार सपना कोळी यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, डोंबिवलीच्या उड्डाणपूलासंदर्भात व्हाट्सअपवरच या संदर्भात पत्राची प्रत मिळाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाशी यासंदर्भात बुधवारी पत्र पाठवणार आहे. त्यानूसार पूलामध्ये कोणते दोष आहेत? कुठे डागडुजी करावी लागणार आहे? ती रेल्वेने करायची की नाही? तसेच जोडरस्ते आहेत त्या ठिकाणी काही काम सुचवली असतील तर ती आमच्या माध्यमातून करायची का? त्या सगळयासाठी किती दिवसांचा अवधी लागणार आहे? किती निधी लागणार ही सर्व माहिती मागवली जाणार आहे. तसेच आयआयटी ने दिलेला अहवाल देखिल माहितीसाठी मागवून तज्ज्ञांची मते घेतली जाणार असल्याचे सांगितले.यासंदर्भात वाहतूक नियंत्रण पोलीस निरिक्षक सतेज जाधव म्हणाले की, असे कोणतेही पत्र, सूचना आम्हाला आमच्या वरिष्ठांनी दिलेल्या नाहीत. तसेच महापालिकेनेही संपर्क साधलेला नाही. यासंदर्भात सोशल मीडियावर चर्चा सुरु असून तेवढीच माहिती मिळाली आहे. पण संबंधित यंत्रणांकडून ठोस सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे आताच त्यासंदर्भात काहीही भाष्य करता येणार नाही असे ते म्हणाले.

ठाकूर्ली उड्डाणपूलाचा पर्याय* जर हा पूल २७ मे पासून वाहतूकीसाठी बंद झाला तर पूर्व पश्चिम वाहनांना ये जा करण्यासाठी ठाकुर्ली येथील नव्या उड्डाणपूलाचा एकमेव पर्याय असेल.पण तो पूल टू लेन असून आधीच अरुंद आहे. त्यातच पूलाचे ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या दिशेने काम सुरु आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेdombivaliडोंबिवली