शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अजब तुझे सरकार...! उड्डाणपूल ८५ दिवसांपासून बंद; मुदत संपत आल्यावर काढले १६ लाखांचे कंत्राट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 23:23 IST

भिवंडी शहरातील स्व राजीव गांधी उड्डाणपुलाची दुरावस्था झाल्याने महापालिका प्रशासनाने तब्बल सात कोटी रुपये खर्च करत उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

नितिन पंडीत

भिवंडी ( दि. ७ ) शहरातील स्व राजीव गांधी उड्डाणपुलाची दुरावस्था झाल्याने महापालिका प्रशासनाने तब्बल सात कोटी रुपये खर्च करत उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. हा उड्डाणपूल ११ ऑक्टोबर ते ३१ जानेवारी पर्यंत साधारणतः ११३ दिवसांसाठी बंद राहणार असल्याचे ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त यांनी काढलेल्या अधिसूचनेत नमूद केले होते. मात्र त्यानंतर दोन दिवस व्यवस्था होऊ न शकल्याने अखेर दोन दिवस उशिराने उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामास प्रारंभ करण्यात आला होता. उड्डाणपुलाच्या दुरुस्तीकामामुळे पुला खालील रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्यास होत आहे. मागील दोन महिन्यांपासून या वाहतूक कोंडीचा त्रास शहरातील नागरिक व प्रवासी सहन करत होते. 

या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून भिवंडी महापालिकेने त्यावेळेस ट्राफिक वार्डनची कोणतीही व्यवस्था केली नव्हती. मात्र आता उड्डाणपुलाचा काम पूर्णत्वास येत असतांनाच महापालिकेने उड्डाणपुलाखालील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ट्राफिक वार्डनच्या नेमणुकीसाठी तब्बल १६ लाख ३४ हजार १७० रुपयांची निविदा महापालिका प्रशासनाने गुरुवारी जाहीर केल्या आहेत. विशेष म्हणजे उड्डाणपुलाचे काम सुरु झाले त्यावेळेस या निविदा काढणे गरजेचे होते, मात्र उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास येत असतांना महापालिकेने आता ट्राफिक वार्डनची निविदा काढणे म्हणजे भिवंडी महापालिकेचा अजब तुझे सरकार अशी टीका मनपा प्रशासनावर होत आहे. दुसरीकडे पालिका प्रशासनाने अतिक्रमण विभागाने या रस्त्यावरील अतिक्रमण केलेल्यां वर कारवाई करण्याची गरज असतांना त्याकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील नागरिक करीत आहेत. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणे