शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

अजब तुझे सरकार...! उड्डाणपूल ८५ दिवसांपासून बंद; मुदत संपत आल्यावर काढले १६ लाखांचे कंत्राट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 23:23 IST

भिवंडी शहरातील स्व राजीव गांधी उड्डाणपुलाची दुरावस्था झाल्याने महापालिका प्रशासनाने तब्बल सात कोटी रुपये खर्च करत उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

नितिन पंडीत

भिवंडी ( दि. ७ ) शहरातील स्व राजीव गांधी उड्डाणपुलाची दुरावस्था झाल्याने महापालिका प्रशासनाने तब्बल सात कोटी रुपये खर्च करत उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. हा उड्डाणपूल ११ ऑक्टोबर ते ३१ जानेवारी पर्यंत साधारणतः ११३ दिवसांसाठी बंद राहणार असल्याचे ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त यांनी काढलेल्या अधिसूचनेत नमूद केले होते. मात्र त्यानंतर दोन दिवस व्यवस्था होऊ न शकल्याने अखेर दोन दिवस उशिराने उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामास प्रारंभ करण्यात आला होता. उड्डाणपुलाच्या दुरुस्तीकामामुळे पुला खालील रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्यास होत आहे. मागील दोन महिन्यांपासून या वाहतूक कोंडीचा त्रास शहरातील नागरिक व प्रवासी सहन करत होते. 

या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून भिवंडी महापालिकेने त्यावेळेस ट्राफिक वार्डनची कोणतीही व्यवस्था केली नव्हती. मात्र आता उड्डाणपुलाचा काम पूर्णत्वास येत असतांनाच महापालिकेने उड्डाणपुलाखालील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ट्राफिक वार्डनच्या नेमणुकीसाठी तब्बल १६ लाख ३४ हजार १७० रुपयांची निविदा महापालिका प्रशासनाने गुरुवारी जाहीर केल्या आहेत. विशेष म्हणजे उड्डाणपुलाचे काम सुरु झाले त्यावेळेस या निविदा काढणे गरजेचे होते, मात्र उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास येत असतांना महापालिकेने आता ट्राफिक वार्डनची निविदा काढणे म्हणजे भिवंडी महापालिकेचा अजब तुझे सरकार अशी टीका मनपा प्रशासनावर होत आहे. दुसरीकडे पालिका प्रशासनाने अतिक्रमण विभागाने या रस्त्यावरील अतिक्रमण केलेल्यां वर कारवाई करण्याची गरज असतांना त्याकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील नागरिक करीत आहेत. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणे