शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील नद्यांना पूर, गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 03:20 IST

काही दिवस अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाने रविवारी पुन्हा जोर धरला असून दिवसभर कोसळलेल्या पावसाने जिल्ह्यातील नदीनाल्यांना पूर आले आहेत.

ठाणे : काही दिवस अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाने रविवारी पुन्हा जोर धरला असून दिवसभर कोसळलेल्या पावसाने जिल्ह्यातील नदीनाल्यांना पूर आले आहेत. या पावसाने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. टिटवाळ्यानजीकच्या रुंदे गावच्या पुलावरून काळू नदीचे पाणी वाहत असल्यामुळे सुमारे १२ गावांचा संपर्क तुटला. कल्याणमधील गणेशघाट येथे अडकलेल्या दोन महिला, एक पुरुष आणि काही बकºयांची केडीएमसीच्या अग्निशमन विभागाने सुखरुप बाहेर काढले.हवामान खात्याने सोमवार व मंगळवारी ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तलाव क्षेत्रातही पावसाचा जोर असल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहापूरच्या किन्हवली गावाजवळील संगमेश्वर हे प्राचीन मंदिरात काळू नदीच्या पुराचे पाणी शिरले. तेथील पुजाºयांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. याच नदीचे पाणी कल्याण तालुक्यातील रुंद गावाजवळच्या पुलावरून वाहत आहे. यामुळे फळगाव, वासुंद्री आदी १२ गावांचा टिटवाळ्याशी संपर्क तुटला आहे. या काळू नदीच्या पुरामुळे मुरबाड परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. उल्हास नदीसह ठिकठिकाणच्या नदीनाल्यांच्या पुरामुळे कल्याण-नगर महामार्गावरील वाहतूक मंदावली. माळशेज घाटातही पाऊस असून दाट धुके आहे. यामुळे घाटातील वाहतूक काही अंशी खोळंबली असून चालकांना दिवे लावून वाहन चालवण्याचा प्रसंग ओढवला आहे.भिवंडीजवळील माणकोली पुलाचे अर्धवट काम असल्यामुळे या पावसात मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूककोंडी झाली. चालकांना तासन्तास एकाच जागेवर उभे राहण्याचा प्रसंग ओढवला.ठाणे शहरात घोडबंदर रोडवर परिसरातील रहिवाशांना घरी जाण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. ठाणे खाडीसह नागलाबंदर, घोडबंदर खाडीत सुमारे ४.६२ मीटरच्या लाटा उसळण्याचा अंदाज महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण विभागाने व्यक्त केल्यामुळे खाडीकिनारी असलेल्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.ठाणे शहर परिसरात ठिकठिकाणी किरकोळ दोन आगीच्या घटना घडल्या. पाच झाडे पडली. पाणीपुरवठा करणाºया पाइपलाइनला एका ठिकाणी गळती लागली. ठाणे शहरात सकाळी ८ वाजेपासून सव्वाचार वाजेपर्यंत ५१.५८ मिमी पाऊस पडला. लोकलगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले, मात्र सुटीचा दिवस असल्यामुळे फार परिणाम जाणवला नाही. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस उल्हासनगर शहरात ८९ मिमी, मुरबाडला ७९, अंबरनाथला ७०, कल्याणला ६३, शहापूरला ५८, ठाण्याला ३७ आणि सर्वात कमी भिवंडी तालुक्यात २५ मिमी पाऊस मागील २४ तासांच्या कालावधीत पडला.>स्लॅब कोसळून महिलेचा मृत्यूलोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : कॅम्प नं-५, भाटिया चौक परिसरातील मुरलीवाला कॉम्प्लेक्स इमारतीचा तिसºया मजल्याचा स्लॅब रविवारी संध्याकाळी कोसळला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू, तर दोन मुले जखमी झाली. मुलांवर शिवनेरी रुग्णालयात उपचार सुरू असून ही इमारत रिकामी करण्यात येत आहे.भाटिया चौक परिसरात १९९५ मध्ये मुरलीवाला कॉम्प्लेक्स ही चार मजली इमारत बांधण्यात आली. या इमारतीच्या तिसºया मजल्यावरील रुम नं. ३०३ चा स्लॅब दुसºया मजल्यावरील रुम नं. २०३ वर सायंकाळी कोसळला. त्यावेळी नीना भरत गनवानी या हॉलमध्ये दोन मुलांसह बसल्या होत्या. त्यांच्या डोक्यावर स्लॅब पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांची २३ आणि १८ वर्षांची दोन मुले गंभीर जखमी झाली.महापालिका सहायक आयुक्त गणेश शिंपी, सुरक्षा अधिकारी बाळू नेटके, स्थानिक नगरसेवकांसह नायब तहसीलदार गवई यांनी घटनास्थळी धाव घेतली. नीना गनवानी यांचा मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आला. शिंपी यांनी इमारत रिकामी करण्यास सुरुवात केली असून इमारतीत एकूण १६ प्लॉट, तर चार दुकाने आहेत. येथील रहिवाशांची नातेवाइकांकडे तर काहींची राहण्याची सोय महापालिका करणार असल्याची माहिती शिंपी यांनी दिली. तसेच भाटिया चौकातून कुर्ला कॅम्पकडे जाणारा एकीकडचा रस्ता बंद केला आहे.>धरणक्षेत्रात दमदारपाणीपुरवठा करणाºया धरण क्षेत्रातही पावसाने दमदार हजेरी लावली असून मागील वर्षीच्या तुलनेत मात्र भातसा धरणात आजपर्यंत सुमारे सहा टक्के कमी साठा आहे. मोडकसागर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. बारवी धरणात ७० टक्के पाणीसाठा झाला. मागच्या वर्षी ६९ टक्के होता. मुंबईसह ठाण्यास पाणीपुरवठा करणाºया व सर्वाधिक मोठे जलाशय म्हणून ओळखल्या जाणाºया भातसा धरणात आज ९० मिमी पाऊस पडला असून आतापर्यंत एक हजार १३६ मिमी पाऊस या धरणात पडला. मोडकसागरमध्ये आतापर्यंत एक हजार २९१ मिमी पाऊस पडला. १६२.७२ मीटर पाण्याची पातळी असलेले हे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. तानसा धरणात मात्र ८०.५६ टक्के पाणीसाठा असून, आंध्रा धरणात ५३ मिमी पाऊस पडला. या धरणात ४३ टक्के पाणीसाठा तयार झाला. मागील वर्षी ४४ टक्के होता. मात्र, या उल्हास नदी खोºयातही पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे या धरणात पाणीसाठा वाढतो आहे.