शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना मिळणार प्रत्येकी १५ हजार रुपयांची आर्थिक मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 17:54 IST

अतिवृष्टीमुळे कल्याण ग्रामीण मतदार संघातील संपूर्ण दिवा व आयरे परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी घुसल्यामुळे जवळपास दिवा विभागात ३० ते ३५ हजार चाळीतील घरे तसेच दुकाने व इमारतींमध्ये पाणी शिरले होते.

डोंबिवली-  अतिवृष्टीमुळे कल्याण ग्रामीण मतदार संघातील संपूर्णदिवा व आयरे परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी घुसल्यामुळे जवळपास दिवा विभागात ३० ते ३५ हजार चाळीतील घरे तसेच दुकाने व इमारतींमध्ये पाणी शिरले. या परिसरात प्रचंड अतिवृष्टी होत असताना बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होवू लागल्याने पाण्याच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली व संपूर्ण दिवा व आयरे, पलावा, भोपर तसेच कल्याण ग्रामीण संपूर्ण परिसर जलमय झाला होता.

सुमारे सात ते आठ फुटांपर्यंत पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्याने दिव्यातील संपूर्ण परिसरातील चाळी, दुकाने व घरामध्ये पाणी मोठ्या प्रमाणावर शिरले. त्यामध्ये प्रचंड आर्थिक नुकसान झाल्यामुळे आज ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीमंडळ बैठकीत पूरग्रस्तांना आर्थिक मदत मिळण्याचा विषय लावून धरल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तातील प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी  १५ हजार रुपये व ज्या व्यक्तींचे वीज मीटर पाण्याखाली जाऊन नादुरुस्त झाले असेल त्या व्यक्तीला नवीन मीटर बसवून देण्यात येईल याकरिता मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. यासाठी आमदार सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी 

दिवा विभागातील बेडेकर नगर, म्हसोबा नगर, वक्रतुंड नगर, ओमकार नगर, बी आर नगर, सुरेश नगर, श्लोक नगर, शिवशक्ती  नगर, सदाशिव दळवी नगर, दातिवली, सिद्धिविनायक नगर, विकास म्हात्रे गेट, दिवा आगासन रोड, तिसाई नगर, टाटा पॉवर लाईन, विठ्ठल रखुमाई नगर, मुंब्रादेवी कॉलनी, बेतवडे, म्हातार्डी, आगासन, डी जी कॉम्प्लेक्स, नॅशनल शाळेजवळ, डम्पिंग परिसर, यशवंत नगर, साबेगाव, कोकणरत्न, विष्णू पाटील नगर, दिवा बंदर आळी, एन आर नगर, नागवाडी तसेच आयरे विभागातील सुमारे एक हजार चाळींमध्ये त्याचप्रमाणे , पलावा, भोपर व संपूर्ण कल्याण ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले. या प्रंचड पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये जीवनावश्यक तसेच इतरही अनेक वस्तूंचे अतोनात नुकसान झाले आहे.

 यावेळी आमदार सुभाष भोईर यांनी संपूर्ण दिवसभर दिवा विभागात तळ ठोकून संपूर्ण  परिसरातून बोटीतून बचावकार्यात भाग घेतला होता. प्रत्येक नागरिकाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ व टीडीआरएफ जवान तसेच महानगरपालिका अधिकारी,  नगरसेवक, पोलीस तसेच सर्वपक्षीय  कार्यकर्ते यांच्यासह स्वतः मदतकार्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. तसेच पूरग्रस्तांना निवारा तसेच जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली होती. आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य विभागामार्फत ठिकठिकाणी आरोग्य शिबिरे तसेच नुकसान भरपाईचे पंचनामे देखील  सुरु करण्यात आले आहेत. मात्र दिवा, आयरे, पलावा, भोपर तसेच मतदार संघात ज्या ज्या ठिकाणी पाणी भरून नुकसान झाले अशा पूरग्रस्ताना तातडीची आर्थिक मदत मिळण्याकरिता आमदार सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्र्यांकडे व पालकमंत्र्याकडे मागणी केली असून आज मंत्रिमंडळ बैठकीत नुकसान भरपाई देण्यासाबंधी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी १५  हजार रुपये व ज्या व्यक्तीचे वीजमीटर पाण्याखाली जाऊन नादुरुस्त झाले असेल अशा व्यक्तीला नवीन वीजमीटर बसवून देण्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. 

टॅग्स :floodपूरdivaदिवाdombivaliडोंबिवलीkalyanकल्याणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस