शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

पूरग्रस्तांची पुन्हा आवराआवर; शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:20 IST

पुराचा दोनवेळा फटका, नागरिक अजूनही भीतीच्या छायेत

बदलापूर : २६ आणि २७ जुलै रोजी आलेल्या महापुराने शेकडो कुटुंबे बाधित झाली. पूर ओसरल्यावर त्यांनी आपल्या घरांची आणि सामानांची आवराआवर सुरू केली. यातून सावरून आठवडाही उलटत नाही, तोच रविवारी बदलापूरला पुन्हा पुराचा जोरदार फटका बसला. जी कुटुंबे आधीच उद्ध्वस्त झाली होती, त्यांना पुन्हा एकदा फटका बसल्याने आता त्यांचा धीर खचला आहे. तरीसुद्धा दु:ख बाजूला सारून पूरग्रस्त कुटुंबांनी पुन्हा आपल्या संसाराची आवराआवर सुरू केली आहे.२६ आणि २७ जुलैच्या पुराचा फटका सहन केल्यावर त्याच कुटुंबांवर ४ आॅगस्टच्या पुराचा फटका सहन करण्याची वेळ पुन्हा आली आहे. रविवारी पहाटेपासून पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पूरग्रस्त सावध झाले होते. मात्र, पुन्हा घरात पाणी भरेल, असे वाटले नव्हते. मात्र, उल्हास नदीने पुन्हा आपले रौद्ररूप दाखवत पूरग्रस्तांची धास्ती वाढवली आहे. रविवारी बसलेल्या पुराच्या तडाख्यानंतर पुन्हा एकदा घर आवरण्यात ही कुटुंबे व्यस्त झाली होती. पहिल्या पुरात बाधित झाल्यानंतर नागरिकांना आलेल्या मदतीचे साहित्यदेखील रविवारच्या पुरात वाहून गेले. हेंदे्रपाडा, यादवनगर भागातील नागरिकांना दोन दिवस आधीच जे जीवनावश्यक साहित्य मिळाले होते, ते साहित्यही रविवारच्या पुरात भिजले. त्यामुळे अन्नधान्याची गरज नव्याने निर्माण झाली आहे. आधीच भिजलेले दुकानातील सामान फेकले असताना, या दुकानदारांनाही दुसऱ्यांदा पुराचा फटका सहन करावा लागला. सोमवारी दिवसभर पूरग्रस्तांची आवराआवर सुरू होती. पूर ओसरत आला असला तरी, अजूनही बदलापूरचा धोका कमी झालेला नाही.पूर ओसरला; पंचनामे सुरूभिवंडी : भिवंडी शहरासह ग्रामीण भागात तीन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने या पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात, दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. या पूरग्रस्त बाधित नागरिकांच्या मालमत्तेचा महापालिका प्रशासन आणि ग्रामीण भागात तहसीदारांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी, तलाठी यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सोमवारपासून हाती घेतले आहे. घरे, जनावरे वाहून गेली असतील अथवा मनुष्यहानी झालेल्या नागरिकांच्या पंचनाम्यांना प्राधान्य दिले जात आहे. नुकसानीचा आकडा निश्चित होण्यासाठी किमान चार दिवस लागणार आहेत. त्यानंतर, अहवालानुसार शासकीय मदत पूरग्रस्तांना दिली जाईल, अशी माहिती तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी दिली.तीनबत्ती चौक, ईदगाह रोड, बाजारपेठ, शिवाजी चौक, शिवाजीनगर, नवीचाळ, म्हाडा कॉलनी, बंदर मोहल्ला, अंबिकानगर, पद्मानगर या भागात पाणी साचल्याने अनेक नागरिकांची दुकाने व घरांमध्ये पाणी शिरल्याने घरगुती सामानासह मालाचे मोठे नुकसान झाले आहे, तर भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांच्या अन्नधान्यासह कपडे, भांडी व किमती वस्तूंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी नुकसान झालेल्या लोकांच्या मालमत्तेचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना दिल्याने सकाळपासून महसूल यंत्रणा कामाला लागली आहे.

टॅग्स :floodपूर