शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

पूरग्रस्तांची पुन्हा आवराआवर; शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:20 IST

पुराचा दोनवेळा फटका, नागरिक अजूनही भीतीच्या छायेत

बदलापूर : २६ आणि २७ जुलै रोजी आलेल्या महापुराने शेकडो कुटुंबे बाधित झाली. पूर ओसरल्यावर त्यांनी आपल्या घरांची आणि सामानांची आवराआवर सुरू केली. यातून सावरून आठवडाही उलटत नाही, तोच रविवारी बदलापूरला पुन्हा पुराचा जोरदार फटका बसला. जी कुटुंबे आधीच उद्ध्वस्त झाली होती, त्यांना पुन्हा एकदा फटका बसल्याने आता त्यांचा धीर खचला आहे. तरीसुद्धा दु:ख बाजूला सारून पूरग्रस्त कुटुंबांनी पुन्हा आपल्या संसाराची आवराआवर सुरू केली आहे.२६ आणि २७ जुलैच्या पुराचा फटका सहन केल्यावर त्याच कुटुंबांवर ४ आॅगस्टच्या पुराचा फटका सहन करण्याची वेळ पुन्हा आली आहे. रविवारी पहाटेपासून पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पूरग्रस्त सावध झाले होते. मात्र, पुन्हा घरात पाणी भरेल, असे वाटले नव्हते. मात्र, उल्हास नदीने पुन्हा आपले रौद्ररूप दाखवत पूरग्रस्तांची धास्ती वाढवली आहे. रविवारी बसलेल्या पुराच्या तडाख्यानंतर पुन्हा एकदा घर आवरण्यात ही कुटुंबे व्यस्त झाली होती. पहिल्या पुरात बाधित झाल्यानंतर नागरिकांना आलेल्या मदतीचे साहित्यदेखील रविवारच्या पुरात वाहून गेले. हेंदे्रपाडा, यादवनगर भागातील नागरिकांना दोन दिवस आधीच जे जीवनावश्यक साहित्य मिळाले होते, ते साहित्यही रविवारच्या पुरात भिजले. त्यामुळे अन्नधान्याची गरज नव्याने निर्माण झाली आहे. आधीच भिजलेले दुकानातील सामान फेकले असताना, या दुकानदारांनाही दुसऱ्यांदा पुराचा फटका सहन करावा लागला. सोमवारी दिवसभर पूरग्रस्तांची आवराआवर सुरू होती. पूर ओसरत आला असला तरी, अजूनही बदलापूरचा धोका कमी झालेला नाही.पूर ओसरला; पंचनामे सुरूभिवंडी : भिवंडी शहरासह ग्रामीण भागात तीन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने या पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात, दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. या पूरग्रस्त बाधित नागरिकांच्या मालमत्तेचा महापालिका प्रशासन आणि ग्रामीण भागात तहसीदारांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी, तलाठी यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सोमवारपासून हाती घेतले आहे. घरे, जनावरे वाहून गेली असतील अथवा मनुष्यहानी झालेल्या नागरिकांच्या पंचनाम्यांना प्राधान्य दिले जात आहे. नुकसानीचा आकडा निश्चित होण्यासाठी किमान चार दिवस लागणार आहेत. त्यानंतर, अहवालानुसार शासकीय मदत पूरग्रस्तांना दिली जाईल, अशी माहिती तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी दिली.तीनबत्ती चौक, ईदगाह रोड, बाजारपेठ, शिवाजी चौक, शिवाजीनगर, नवीचाळ, म्हाडा कॉलनी, बंदर मोहल्ला, अंबिकानगर, पद्मानगर या भागात पाणी साचल्याने अनेक नागरिकांची दुकाने व घरांमध्ये पाणी शिरल्याने घरगुती सामानासह मालाचे मोठे नुकसान झाले आहे, तर भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांच्या अन्नधान्यासह कपडे, भांडी व किमती वस्तूंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी नुकसान झालेल्या लोकांच्या मालमत्तेचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना दिल्याने सकाळपासून महसूल यंत्रणा कामाला लागली आहे.

टॅग्स :floodपूर