शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
3
"हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
4
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
5
तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
6
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
7
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
8
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
9
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
10
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
13
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
14
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
15
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
16
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
17
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
18
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
19
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

परतीच्या पावसामुळे घसरला ओल्या झालेल्या फुलांचा दर्जा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 6:24 AM

परतीच्या पावसाचा परिणाम भाज्यांप्रमाणे फुलांवरही झाला आहे. त्यामुळे दरवर्षी दिवाळीच्या तोंडावर वाढणारे फुलांचे दर यंदा मात्र सर्वसाधारण आहेत. यंदा मालाला दर्जा नसल्याने

ठाणे : परतीच्या पावसाचा परिणाम भाज्यांप्रमाणे फुलांवरही झाला आहे. त्यामुळे दरवर्षी दिवाळीच्या तोंडावर वाढणारे फुलांचे दर यंदा मात्र सर्वसाधारण आहेत. यंदा मालाला दर्जा नसल्याने फुलांचे दर फार वाढलेले नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.सण - उत्सव, समारंभाचे वातावरण प्रसन्न करण्यासाठी फुलांची आवश्यकता असते. गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, दिवाळी, दसरा या सण - उत्सवांत फुलांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. यानिमित्ताने एरव्हीपेक्षा फुलांचे दरही तिप्पट - चौपट होतात. ते वधारले तरी फुलांची मागणी मात्र कायम असते. दिवाळीच्या तोंडावर विविध प्रकारांची फुले बाजारात दाखल झाली आहेत. परंतु, परतीच्या पावसाने त्यांच्या दर्जावर मात्र पाणी फेरले. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत फुलांचे दर सर्वसाधारण आहेत. पावसामुळे मालाला दर्जा नाही, फुले माल भिजलेली येत आहेत. आजची फुले ही उद्या लगेच खराब होऊ शकतात. त्यामुळे फार महागड्या दरात ती विकली जात नसल्याचे विक्रेते संजय ठसाळे यांनी लोकमतला सांगितले. बुधवारी नरक चतुर्दशी असल्याने मंगळवारी ठाणेकरांनी फुलांची खरेदी केली. लक्ष्मीपूजनच्या दिवशी दुप्पट गर्दी होईल, असा अंदाज ठसाळे यांनी व्यक्त केला. ठाण्याचा बाजार फुलांनी बहरला असला तरी मालाचा दर्जा खालावला असल्याने विक्रेत्यांमध्ये नाराजी आहे. दिवाळीच्या निमित्ताने मंगळवारी तब्बल ५० हजारांहून किलो अधिक फुलांची आवक झाल्याचे ठसाळे म्हणाले.

टॅग्स :diwaliदिवाळी