शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

मागोवा २०२० : कोरोनामुळे ठामपाची आर्थिक घडी विस्कटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 00:38 IST

Thane : शेवटच्या टप्प्यात महापालिकेला मालमत्ता आणि पाणीकर वसुलीमुळे थोडासा दिलासा मिळाला.

- अजित मांडकेठाणे :  महापालिकेसाठी सरते वर्ष फारसे चांगले नव्हते. प्रारंभीच तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल आणि अधिकाऱ्यांच्या वादामुळे त्यांनी सक्तीची रजा घेतली. त्यानंतर, अर्थसंकल्पातूनही ठाणेकरांच्या पदरी निराशाच आली. त्याउलट पालिकेच्या खांद्यावर तब्बल तीन हजार ३०० कोटींचे दायित्व आले. त्यानंतर, आलेल्या कोरोनामुळे आर्थिक घडी पुरती विस्कटली. ठेकेदारांची बिले रखडल्याने अनेक प्रकल्पांवर त्याचा परिणाम झाला. जो काही निधी होता, त्यातून कोविड सेंटर उभारणी करण्यात आली. शेवटच्या टप्प्यात महापालिकेला मालमत्ता आणि पाणीकर वसुलीमुळे थोडासा दिलासा मिळाला.

अर्थसंकल्पातून घोर निराशाअर्थसंकल्पातून ठाणेकरांना नवीन काहीच मिळाले नाही. तीन हजार ७८० कोटींचे मूळ अंदाजपत्रक सादर केले. यामध्ये करवाढ नसली तरी अर्थसंकल्प तुटीचा आणि तीन हजार ३०० कोटी दायित्वाचा ठरला. वर्ष सरत आल्यानंतर आता कुठे या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी झालेली दिसत आहे.

तीन महिन्यांत आले दोन आयुक्तकोरोनाची सुरुवात होण्यापूर्वी तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पदभार सोडला होता. मार्च महिन्यात विजय सिंघल यांची नियुक्ती झाली. त्यांचा कार्यकाळ फारसा गाजला नाही. तीन महिन्यांत त्यांच्या जागेवर डॉ. विपिन शर्मा यांची नियुक्ती झाली.

पदोन्नती दिलेले अधिकारी आले मूळ पदावर तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मर्जीतील अधिकाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने बढती आणि पदोन्नती देण्याची घाई केली होती. परंतु, त्यानंतर आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी या सर्व अधिकाऱ्यांचे कार्यभार काढून त्यांना मूळ पदावर आणण्याचे काम वर्षाच्या शेवटी केले.

वाढीव पाण्यासाठी स्टेमबरोबर खडाजंगीठाणेकरांना या काळातही पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे स्टेमकडून वाढीव पाणी मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर, मागील महिन्यात झालेल्या बैठकीनंतर ठाणेकरांना वाढीव १० एमएलडी पाण्याचा वाढीव साठा मिळू लागला आहे. त्यामुळे ठाण्याला दिलासा मिळाला आहे.

तिजोरी झाली रितीलॉकडाऊनमुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला. ठेकेदारांची बिले रखडल्याने विकासकामांवर परिणाम झाला. या कालावधीत तिजोरीच रिती झाली होती. जो निधी शिल्लक होता, तोदेखील कोरोनासाठी वापरण्यात आला. राज्य शासनाला कोरोनासाठी २५० कोटींची मागणी केली. परंतु, जेमतेम ५० ते ६० कोटीच मिळाले. त्यातही कोरोनाचा काळ असल्याने मालमत्ता आणि पाणीकर माफ करावे, अशी मागणी राजकीय मंडळींनी केली. परंतु, ती मान्य झाली नाही. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका