शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

...तर १० दिवसांनंतर टोल बंद करू; एकनाथ शिंदेंचा अधिकाऱ्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 16:37 IST

निधी आणून दिलाय, आता कामं करा; मंत्री संतापले

ठाणे : येत्या १० दिवसात ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे भरले गेले नाहीत, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल आणि रस्त्यावरील टोल बंद केले जातील, अशा शब्दांमध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. ठाणे आणि रायगडमध्ये जिल्ह्यांमधील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांनाच नव्हे, तर राजकीय नेत्यांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांची गोची झाली आहे. सोशल मीडियावर याचे पडसाददेखील उमटू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगड आणि पालघरचे पालक मंत्री रविंद्र चव्हाण यांनी ठाणे जिल्हाधिकारी नियोजन भवनात तिन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, वाहतूक पोलीस विभाग, परिवहन विभाग, सिडकोच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. पुढील १० दिवसात रस्त्यांवरील खड्डे भरा. अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा दोन्ही पालकमंत्र्यांनी यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना दिला. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे लोक शिव्या घालत आहेत. विरोधक आमच्या फोटोचे बॅनर लावत आहेत. आता हे सहन केलं जाणार नाही. आम्ही निधी आणून द्यायचं काम केलं आहे. त्यानंतर पुढील कामं तुम्ही करायला हवी होती. मात्र तुम्ही ती केली नाहीत. आता पुढील १० दिवसात रस्यांवरील खड्डे बुजवा. अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा शिंदे आणि चव्हाण यांनी दिला. २८ फेब्रुवारी २०२० या दिवशी कल्याण पत्री पुलाचं काम पूर्ण होणार असून याच दिवशी पत्री पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची माहितीदेखील संबंधीत अधिकाऱ्यांनीनी बैठकीत दिली. डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा १२ मीटरचा उड्डाण पूल गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. हा पूल आता २५ मीटरचा करण्यात येणार असून यासाठी ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन घेतल्याची माहिती डोंबिवलीचे आमदार आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. लवकरच कोपर पुलाच्या कामालादेखील सुरुवात होईल, असंदेखील त्यांनी सांगितलं.  

टॅग्स :tollplazaटोलनाकाEknath Shindeएकनाथ शिंदेPotholeखड्डे