शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

आंध्रा धरण पाच वर्षात प्रथमच ९२ टक्के भरले, पाणीसमस्येला यंदा पूर्णविराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 02:22 IST

जिल्ह्यातील पाच महापालिका, दोन नगरपालिका आणि जि.प.च्या ४५ गावपाड्यांना उल्हासनदीव्दारे पाणीपुरवठा करणारे आंध्रा धरण पाच वर्षात प्रथमच ९२.५४ टक्के सोमवारी भरले. यामुळे पिण्याच्या पाण्यासह उद्योगधंद्यांच्या पाणीसमस्येला यंदा पूर्णविराम मिळाला आहे.

सुरेश लोखंडे ठाणे : जिल्ह्यातील पाच महापालिका, दोन नगरपालिका आणि जि.प.च्या ४५ गावपाड्यांना उल्हासनदीव्दारे पाणीपुरवठा करणारे आंध्रा धरण पाच वर्षात प्रथमच ९२.५४ टक्के सोमवारी भरले. यामुळे पिण्याच्या पाण्यासह उद्योगधंद्यांच्या पाणीसमस्येला यंदा पूर्णविराम मिळाला आहे.कर्जतजवळील भिवपुरीजवळ आंध्रा नदीवरील पुणे जिल्ह्यात असलेले हे धरण टाटा कंपनीच्या मालकीचे आहे. त्यावर ७२ मेगावॅटचा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट कार्यरत आहे. यासाठी वापरलेले पाणी उल्हासनदीत सोडले जाते. त्याचा लाभ ठाणे जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि उद्योगांना होतो. या धरणातील मागील पाच वर्षातील सरासरी उपयुक्त पाणीसाठा २३५.३८ दशलक्ष घनमीटर होता. मात्र, यंदा प्रथमच ३१३.८४ दशलक्ष घनमीटर (दलघमी.) म्हणजे ९२.५४ टक्के उपयुक्त पाणीसाठा तयार झाला आहे. सुमारे ९४२.१० दलघमी पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या भातसा धरणानंतर या आंध्रा धरणाची ३३९.१४ दलघमी उपयुक्त पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणात मागील वर्षी २२७.७५ दलघमी म्हणजे ६७.१६ टक्के पाणीसाठा होता. तो यंदा ९२ .५४ टक्के तयार झाला आहे. या खोºयात यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे या धरणात झपाट्याने पाणी जमा होत आहे. आतापर्यंत धरणात २४६१ मिमी. पाऊस पडला असून मागील वर्षी याच दिनांकापर्यंत २१४३ मिमी. पाऊस पडला होता.आंध्रा धरण्याचे पाणी भिवपुरी, भिरा येथील टाटाच्या विद्युत प्रकल्पात सोडले जाते. त्यानंतर उल्हास नदीव्दारे ठाणे जिल्ह्यात येणारे हे पाणी बारवी धरणासह बदलापूर बंधारा, जांभूळ बंधारा, मोहने बंधारा आदी ठिकाणी अडविण्यात येते. त्यानंतर एमआयडीसी, शहाड टेमघर, कल्याण-डोंबिवली, जीवन प्राधिकरण आदी प्रमुख संस्था या पाण्याचा पुरवठा पाच महापालिका, दोन नगरपालिका आणि औद्योगिक कारखान्यांना करतात. आंध्रा धरणासह बारवी धरणातही १०० टक्के पाणी साठ््यामुळे ठाणे पालिकेच्या काही भागांसह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर, बदलापूर आणि अंबरनाथ आणि भिवंडी तालुक्यातील ४५ गावांची पाणीटंचाईची समस्या दूर झाली आहे.

टॅग्स :Damधरण