शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

आंध्रा धरण पाच वर्षात प्रथमच ९२ टक्के भरले, पाणीसमस्येला यंदा पूर्णविराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 02:22 IST

जिल्ह्यातील पाच महापालिका, दोन नगरपालिका आणि जि.प.च्या ४५ गावपाड्यांना उल्हासनदीव्दारे पाणीपुरवठा करणारे आंध्रा धरण पाच वर्षात प्रथमच ९२.५४ टक्के सोमवारी भरले. यामुळे पिण्याच्या पाण्यासह उद्योगधंद्यांच्या पाणीसमस्येला यंदा पूर्णविराम मिळाला आहे.

सुरेश लोखंडे ठाणे : जिल्ह्यातील पाच महापालिका, दोन नगरपालिका आणि जि.प.च्या ४५ गावपाड्यांना उल्हासनदीव्दारे पाणीपुरवठा करणारे आंध्रा धरण पाच वर्षात प्रथमच ९२.५४ टक्के सोमवारी भरले. यामुळे पिण्याच्या पाण्यासह उद्योगधंद्यांच्या पाणीसमस्येला यंदा पूर्णविराम मिळाला आहे.कर्जतजवळील भिवपुरीजवळ आंध्रा नदीवरील पुणे जिल्ह्यात असलेले हे धरण टाटा कंपनीच्या मालकीचे आहे. त्यावर ७२ मेगावॅटचा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट कार्यरत आहे. यासाठी वापरलेले पाणी उल्हासनदीत सोडले जाते. त्याचा लाभ ठाणे जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि उद्योगांना होतो. या धरणातील मागील पाच वर्षातील सरासरी उपयुक्त पाणीसाठा २३५.३८ दशलक्ष घनमीटर होता. मात्र, यंदा प्रथमच ३१३.८४ दशलक्ष घनमीटर (दलघमी.) म्हणजे ९२.५४ टक्के उपयुक्त पाणीसाठा तयार झाला आहे. सुमारे ९४२.१० दलघमी पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या भातसा धरणानंतर या आंध्रा धरणाची ३३९.१४ दलघमी उपयुक्त पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणात मागील वर्षी २२७.७५ दलघमी म्हणजे ६७.१६ टक्के पाणीसाठा होता. तो यंदा ९२ .५४ टक्के तयार झाला आहे. या खोºयात यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे या धरणात झपाट्याने पाणी जमा होत आहे. आतापर्यंत धरणात २४६१ मिमी. पाऊस पडला असून मागील वर्षी याच दिनांकापर्यंत २१४३ मिमी. पाऊस पडला होता.आंध्रा धरण्याचे पाणी भिवपुरी, भिरा येथील टाटाच्या विद्युत प्रकल्पात सोडले जाते. त्यानंतर उल्हास नदीव्दारे ठाणे जिल्ह्यात येणारे हे पाणी बारवी धरणासह बदलापूर बंधारा, जांभूळ बंधारा, मोहने बंधारा आदी ठिकाणी अडविण्यात येते. त्यानंतर एमआयडीसी, शहाड टेमघर, कल्याण-डोंबिवली, जीवन प्राधिकरण आदी प्रमुख संस्था या पाण्याचा पुरवठा पाच महापालिका, दोन नगरपालिका आणि औद्योगिक कारखान्यांना करतात. आंध्रा धरणासह बारवी धरणातही १०० टक्के पाणी साठ््यामुळे ठाणे पालिकेच्या काही भागांसह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर, बदलापूर आणि अंबरनाथ आणि भिवंडी तालुक्यातील ४५ गावांची पाणीटंचाईची समस्या दूर झाली आहे.

टॅग्स :Damधरण