शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

आंध्रा धरण पाच वर्षात प्रथमच ९२ टक्के भरले, पाणीसमस्येला यंदा पूर्णविराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 02:22 IST

जिल्ह्यातील पाच महापालिका, दोन नगरपालिका आणि जि.प.च्या ४५ गावपाड्यांना उल्हासनदीव्दारे पाणीपुरवठा करणारे आंध्रा धरण पाच वर्षात प्रथमच ९२.५४ टक्के सोमवारी भरले. यामुळे पिण्याच्या पाण्यासह उद्योगधंद्यांच्या पाणीसमस्येला यंदा पूर्णविराम मिळाला आहे.

सुरेश लोखंडे ठाणे : जिल्ह्यातील पाच महापालिका, दोन नगरपालिका आणि जि.प.च्या ४५ गावपाड्यांना उल्हासनदीव्दारे पाणीपुरवठा करणारे आंध्रा धरण पाच वर्षात प्रथमच ९२.५४ टक्के सोमवारी भरले. यामुळे पिण्याच्या पाण्यासह उद्योगधंद्यांच्या पाणीसमस्येला यंदा पूर्णविराम मिळाला आहे.कर्जतजवळील भिवपुरीजवळ आंध्रा नदीवरील पुणे जिल्ह्यात असलेले हे धरण टाटा कंपनीच्या मालकीचे आहे. त्यावर ७२ मेगावॅटचा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट कार्यरत आहे. यासाठी वापरलेले पाणी उल्हासनदीत सोडले जाते. त्याचा लाभ ठाणे जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि उद्योगांना होतो. या धरणातील मागील पाच वर्षातील सरासरी उपयुक्त पाणीसाठा २३५.३८ दशलक्ष घनमीटर होता. मात्र, यंदा प्रथमच ३१३.८४ दशलक्ष घनमीटर (दलघमी.) म्हणजे ९२.५४ टक्के उपयुक्त पाणीसाठा तयार झाला आहे. सुमारे ९४२.१० दलघमी पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या भातसा धरणानंतर या आंध्रा धरणाची ३३९.१४ दलघमी उपयुक्त पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणात मागील वर्षी २२७.७५ दलघमी म्हणजे ६७.१६ टक्के पाणीसाठा होता. तो यंदा ९२ .५४ टक्के तयार झाला आहे. या खोºयात यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे या धरणात झपाट्याने पाणी जमा होत आहे. आतापर्यंत धरणात २४६१ मिमी. पाऊस पडला असून मागील वर्षी याच दिनांकापर्यंत २१४३ मिमी. पाऊस पडला होता.आंध्रा धरण्याचे पाणी भिवपुरी, भिरा येथील टाटाच्या विद्युत प्रकल्पात सोडले जाते. त्यानंतर उल्हास नदीव्दारे ठाणे जिल्ह्यात येणारे हे पाणी बारवी धरणासह बदलापूर बंधारा, जांभूळ बंधारा, मोहने बंधारा आदी ठिकाणी अडविण्यात येते. त्यानंतर एमआयडीसी, शहाड टेमघर, कल्याण-डोंबिवली, जीवन प्राधिकरण आदी प्रमुख संस्था या पाण्याचा पुरवठा पाच महापालिका, दोन नगरपालिका आणि औद्योगिक कारखान्यांना करतात. आंध्रा धरणासह बारवी धरणातही १०० टक्के पाणी साठ््यामुळे ठाणे पालिकेच्या काही भागांसह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर, बदलापूर आणि अंबरनाथ आणि भिवंडी तालुक्यातील ४५ गावांची पाणीटंचाईची समस्या दूर झाली आहे.

टॅग्स :Damधरण