शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

‘लस्ट फॉर लालबाग’मुळे गिरणी संप साहित्यात प्रथमच

By admin | Updated: November 9, 2015 02:32 IST

मुंबईतील कापड गिरण्याचा जीवघेणा संप व त्यातून निर्माण झालेली ‘लस्ट फॉर लालबाग’ हा विषय मराठी साहित्यात प्रथमच लस्ट फॉर लालबागच्या रुपाने आला आहे

जान्हवी मोर्ये, ठाणे मुंबईतील कापड गिरण्याचा जीवघेणा संप व त्यातून निर्माण झालेली ‘लस्ट फॉर लालबाग’ हा विषय मराठी साहित्यात प्रथमच लस्ट फॉर लालबागच्या रुपाने आला आहे. हा विलक्षण विषय आहे. तसेच तो स्फोटक व मर्मभेदी आहे. १९८२ साली झालेल्या संपाने, जागतिकीकरणाच्या लाटेत गिरण्या बंद पडल्या, त्यातील कामगार उद्ध्वस्त झाला. ती समस्या कादंबरीतून मांडत असताना प्रेमकथाही भेटत गेली, असे उद्गार पानिपतकार विश्वास पाटील यांनी लोकमतशी ‘लस्ट फॉर लालबागच्या’ प्रकाशन सोहळ्या निमित्ताने साधलेल्या संवादात काढले.ही एक विलक्षण प्रेमकथा व समस्या मांडणारी कादंबरी आहे. तिच्या निमित्ताने मी प्रेम अनुभवले आहे. साहित्य हे प्रवाही राहिले पाहिजे. तरच ते वाचकाला भावते. ही कादंबरी लिहिताना आनंद व अभिमान वाटला. पंढरपूरच्या वारीला निघणाऱ्या यात्रेकरूकडे पैसे नसतात. तरीही त्याला या वारीत एक चैतन्य अनुभवायला मिळते. मी ही साहित्य दिंडीचा वारकरी झालो. साहित्यातून उभे केलेले खरेखुरे वातावरण वाचकांना नेहमीच भावते. त्यामुळे माझ्या ८०० पानांच्या कादंबऱ्या वाचक दोन दिवसांत वाचून काढतात. हातात घेतलेले पुस्तक वाचकाला खाली ठेवावेसे वाटत नाही. तहानभूक हरपून ते एका बैठकीत वाचून काढतात. यावरून वाचक हा सकस साहित्यासाठी भुकेला असतो. ते त्याला दिले तर तो त्याला नक्कीच पसंती देतो, असा माझा अनुभव आहे. मीदेखील वाचकाची ही भूक लक्षात घेऊन सकस साहित्य लिहिण्याचा प्रयत्न केला. मी शासकीय नोकरी सांभाळून हे सगळे केले आहे. आवड असली तर सवड मिळते. माझ्या आवडीसाठी सवड काढली, असे त्यांनी सांगितले.जीवन जगत असताना जीवनात मला अनेक माणसे भेटली. जशी नदी भेटली, निसर्ग भेटला, नदी ओलांडून गेल्यावर जीवन जगणाऱ्या माणसांच्या समस्या भेटल्या. लोकविलक्षण घटना दिसल्या. त्या लोकविलक्षण घटना माझ्या साहित्याची प्रेरणा ठरल्या, असे ते म्हणाले. शासकीय नोकरी असताना कांद्याचे आंदोलन झाले होते. त्या वेळी शेतकऱ्यांच्या समस्या काय असतात, राबणाऱ्या हाताला काय हवे असते, त्याने कष्ट करून शेतातून पिकविलेल्या पिकाला हमीभाव मिळत नाही, ही समस्या मनाला भिडली. मी एक शासकीय अधिकारी असलो तरी प्रथम माणूस आहे. त्यामुळे माणूस म्हणून या समस्या माझ्या मनाला भिडणाऱ्या ठरल्या. तसेच माझे मन हेलावणाऱ्या ठरल्या. त्यातून मला काही तरी लिहावे वाटले.लोकविलक्षण घटनांचा मनात झालेला कोंडमारा मी लेखणीच्या वाटे फोडला. पुण्यात बदली झाल्यावर पुण्यातील धरणग्रस्तांचे प्रश्न जवळून पाहिले. त्यातून ‘झाडाझडती’ने आकार घेतला. त्यांच्या जीवनाची झाडाझडती कादंबरी रुपाने मांडली. त्यापाठोपाठ ‘पानिपत’ लिहिली. ‘पानिपत’ आणि ‘झाडाझडती’ हे दोन्ही भिन्न विषय असले तरी पानिपतसाठी सगळा इतिहास वाचून काढला. अनेक संदर्भ तपासले. तसाच अभ्यास पुढे नेताजीसाठी करावा लागला. महानायक लिहिताना त्यांच्या प्रेमात पडलो. पात्रे उभी करताना लेखक त्यांच्यावर जोपर्यंत जिवापाड प्रेम करीत नाही, त्यांचे चरित्र समजून घेत नाही, तोपर्यंत तो ती सशक्तपणे उभी करू शकत नाही. केवळ प्रेमातच पडणे नसते, तर त्या भूमिकेकडे तटस्थपणे पाहून त्यांची मांडणी भाषेच्या अंगाने करणे हेही अपेक्षित असते असे ते म्हणाले..