शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
3
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
4
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
5
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
6
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
7
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
8
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
9
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
10
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
11
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
12
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
13
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
14
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
15
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
16
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
17
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
18
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
19
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
20
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता

‘लस्ट फॉर लालबाग’मुळे गिरणी संप साहित्यात प्रथमच

By admin | Updated: November 9, 2015 02:32 IST

मुंबईतील कापड गिरण्याचा जीवघेणा संप व त्यातून निर्माण झालेली ‘लस्ट फॉर लालबाग’ हा विषय मराठी साहित्यात प्रथमच लस्ट फॉर लालबागच्या रुपाने आला आहे

जान्हवी मोर्ये, ठाणे मुंबईतील कापड गिरण्याचा जीवघेणा संप व त्यातून निर्माण झालेली ‘लस्ट फॉर लालबाग’ हा विषय मराठी साहित्यात प्रथमच लस्ट फॉर लालबागच्या रुपाने आला आहे. हा विलक्षण विषय आहे. तसेच तो स्फोटक व मर्मभेदी आहे. १९८२ साली झालेल्या संपाने, जागतिकीकरणाच्या लाटेत गिरण्या बंद पडल्या, त्यातील कामगार उद्ध्वस्त झाला. ती समस्या कादंबरीतून मांडत असताना प्रेमकथाही भेटत गेली, असे उद्गार पानिपतकार विश्वास पाटील यांनी लोकमतशी ‘लस्ट फॉर लालबागच्या’ प्रकाशन सोहळ्या निमित्ताने साधलेल्या संवादात काढले.ही एक विलक्षण प्रेमकथा व समस्या मांडणारी कादंबरी आहे. तिच्या निमित्ताने मी प्रेम अनुभवले आहे. साहित्य हे प्रवाही राहिले पाहिजे. तरच ते वाचकाला भावते. ही कादंबरी लिहिताना आनंद व अभिमान वाटला. पंढरपूरच्या वारीला निघणाऱ्या यात्रेकरूकडे पैसे नसतात. तरीही त्याला या वारीत एक चैतन्य अनुभवायला मिळते. मी ही साहित्य दिंडीचा वारकरी झालो. साहित्यातून उभे केलेले खरेखुरे वातावरण वाचकांना नेहमीच भावते. त्यामुळे माझ्या ८०० पानांच्या कादंबऱ्या वाचक दोन दिवसांत वाचून काढतात. हातात घेतलेले पुस्तक वाचकाला खाली ठेवावेसे वाटत नाही. तहानभूक हरपून ते एका बैठकीत वाचून काढतात. यावरून वाचक हा सकस साहित्यासाठी भुकेला असतो. ते त्याला दिले तर तो त्याला नक्कीच पसंती देतो, असा माझा अनुभव आहे. मीदेखील वाचकाची ही भूक लक्षात घेऊन सकस साहित्य लिहिण्याचा प्रयत्न केला. मी शासकीय नोकरी सांभाळून हे सगळे केले आहे. आवड असली तर सवड मिळते. माझ्या आवडीसाठी सवड काढली, असे त्यांनी सांगितले.जीवन जगत असताना जीवनात मला अनेक माणसे भेटली. जशी नदी भेटली, निसर्ग भेटला, नदी ओलांडून गेल्यावर जीवन जगणाऱ्या माणसांच्या समस्या भेटल्या. लोकविलक्षण घटना दिसल्या. त्या लोकविलक्षण घटना माझ्या साहित्याची प्रेरणा ठरल्या, असे ते म्हणाले. शासकीय नोकरी असताना कांद्याचे आंदोलन झाले होते. त्या वेळी शेतकऱ्यांच्या समस्या काय असतात, राबणाऱ्या हाताला काय हवे असते, त्याने कष्ट करून शेतातून पिकविलेल्या पिकाला हमीभाव मिळत नाही, ही समस्या मनाला भिडली. मी एक शासकीय अधिकारी असलो तरी प्रथम माणूस आहे. त्यामुळे माणूस म्हणून या समस्या माझ्या मनाला भिडणाऱ्या ठरल्या. तसेच माझे मन हेलावणाऱ्या ठरल्या. त्यातून मला काही तरी लिहावे वाटले.लोकविलक्षण घटनांचा मनात झालेला कोंडमारा मी लेखणीच्या वाटे फोडला. पुण्यात बदली झाल्यावर पुण्यातील धरणग्रस्तांचे प्रश्न जवळून पाहिले. त्यातून ‘झाडाझडती’ने आकार घेतला. त्यांच्या जीवनाची झाडाझडती कादंबरी रुपाने मांडली. त्यापाठोपाठ ‘पानिपत’ लिहिली. ‘पानिपत’ आणि ‘झाडाझडती’ हे दोन्ही भिन्न विषय असले तरी पानिपतसाठी सगळा इतिहास वाचून काढला. अनेक संदर्भ तपासले. तसाच अभ्यास पुढे नेताजीसाठी करावा लागला. महानायक लिहिताना त्यांच्या प्रेमात पडलो. पात्रे उभी करताना लेखक त्यांच्यावर जोपर्यंत जिवापाड प्रेम करीत नाही, त्यांचे चरित्र समजून घेत नाही, तोपर्यंत तो ती सशक्तपणे उभी करू शकत नाही. केवळ प्रेमातच पडणे नसते, तर त्या भूमिकेकडे तटस्थपणे पाहून त्यांची मांडणी भाषेच्या अंगाने करणे हेही अपेक्षित असते असे ते म्हणाले..