शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
4
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
5
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
6
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
7
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
8
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
9
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
10
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
11
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
12
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
13
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
14
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
15
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
16
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
17
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
18
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
19
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...

‘लस्ट फॉर लालबाग’मुळे गिरणी संप साहित्यात प्रथमच

By admin | Updated: November 9, 2015 02:32 IST

मुंबईतील कापड गिरण्याचा जीवघेणा संप व त्यातून निर्माण झालेली ‘लस्ट फॉर लालबाग’ हा विषय मराठी साहित्यात प्रथमच लस्ट फॉर लालबागच्या रुपाने आला आहे

जान्हवी मोर्ये, ठाणे मुंबईतील कापड गिरण्याचा जीवघेणा संप व त्यातून निर्माण झालेली ‘लस्ट फॉर लालबाग’ हा विषय मराठी साहित्यात प्रथमच लस्ट फॉर लालबागच्या रुपाने आला आहे. हा विलक्षण विषय आहे. तसेच तो स्फोटक व मर्मभेदी आहे. १९८२ साली झालेल्या संपाने, जागतिकीकरणाच्या लाटेत गिरण्या बंद पडल्या, त्यातील कामगार उद्ध्वस्त झाला. ती समस्या कादंबरीतून मांडत असताना प्रेमकथाही भेटत गेली, असे उद्गार पानिपतकार विश्वास पाटील यांनी लोकमतशी ‘लस्ट फॉर लालबागच्या’ प्रकाशन सोहळ्या निमित्ताने साधलेल्या संवादात काढले.ही एक विलक्षण प्रेमकथा व समस्या मांडणारी कादंबरी आहे. तिच्या निमित्ताने मी प्रेम अनुभवले आहे. साहित्य हे प्रवाही राहिले पाहिजे. तरच ते वाचकाला भावते. ही कादंबरी लिहिताना आनंद व अभिमान वाटला. पंढरपूरच्या वारीला निघणाऱ्या यात्रेकरूकडे पैसे नसतात. तरीही त्याला या वारीत एक चैतन्य अनुभवायला मिळते. मी ही साहित्य दिंडीचा वारकरी झालो. साहित्यातून उभे केलेले खरेखुरे वातावरण वाचकांना नेहमीच भावते. त्यामुळे माझ्या ८०० पानांच्या कादंबऱ्या वाचक दोन दिवसांत वाचून काढतात. हातात घेतलेले पुस्तक वाचकाला खाली ठेवावेसे वाटत नाही. तहानभूक हरपून ते एका बैठकीत वाचून काढतात. यावरून वाचक हा सकस साहित्यासाठी भुकेला असतो. ते त्याला दिले तर तो त्याला नक्कीच पसंती देतो, असा माझा अनुभव आहे. मीदेखील वाचकाची ही भूक लक्षात घेऊन सकस साहित्य लिहिण्याचा प्रयत्न केला. मी शासकीय नोकरी सांभाळून हे सगळे केले आहे. आवड असली तर सवड मिळते. माझ्या आवडीसाठी सवड काढली, असे त्यांनी सांगितले.जीवन जगत असताना जीवनात मला अनेक माणसे भेटली. जशी नदी भेटली, निसर्ग भेटला, नदी ओलांडून गेल्यावर जीवन जगणाऱ्या माणसांच्या समस्या भेटल्या. लोकविलक्षण घटना दिसल्या. त्या लोकविलक्षण घटना माझ्या साहित्याची प्रेरणा ठरल्या, असे ते म्हणाले. शासकीय नोकरी असताना कांद्याचे आंदोलन झाले होते. त्या वेळी शेतकऱ्यांच्या समस्या काय असतात, राबणाऱ्या हाताला काय हवे असते, त्याने कष्ट करून शेतातून पिकविलेल्या पिकाला हमीभाव मिळत नाही, ही समस्या मनाला भिडली. मी एक शासकीय अधिकारी असलो तरी प्रथम माणूस आहे. त्यामुळे माणूस म्हणून या समस्या माझ्या मनाला भिडणाऱ्या ठरल्या. तसेच माझे मन हेलावणाऱ्या ठरल्या. त्यातून मला काही तरी लिहावे वाटले.लोकविलक्षण घटनांचा मनात झालेला कोंडमारा मी लेखणीच्या वाटे फोडला. पुण्यात बदली झाल्यावर पुण्यातील धरणग्रस्तांचे प्रश्न जवळून पाहिले. त्यातून ‘झाडाझडती’ने आकार घेतला. त्यांच्या जीवनाची झाडाझडती कादंबरी रुपाने मांडली. त्यापाठोपाठ ‘पानिपत’ लिहिली. ‘पानिपत’ आणि ‘झाडाझडती’ हे दोन्ही भिन्न विषय असले तरी पानिपतसाठी सगळा इतिहास वाचून काढला. अनेक संदर्भ तपासले. तसाच अभ्यास पुढे नेताजीसाठी करावा लागला. महानायक लिहिताना त्यांच्या प्रेमात पडलो. पात्रे उभी करताना लेखक त्यांच्यावर जोपर्यंत जिवापाड प्रेम करीत नाही, त्यांचे चरित्र समजून घेत नाही, तोपर्यंत तो ती सशक्तपणे उभी करू शकत नाही. केवळ प्रेमातच पडणे नसते, तर त्या भूमिकेकडे तटस्थपणे पाहून त्यांची मांडणी भाषेच्या अंगाने करणे हेही अपेक्षित असते असे ते म्हणाले..