शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

खुशखबर... कल्याण ते वसई 'फेरी' ७० मिनिटांत, तीही अवघ्या २९ रुपयांत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 09:43 IST

उल्हास नदी, ठाण्याची खाडी आणि किनाऱ्यांचा वापर करून मुंबई महानगर प्रदेश पट्ट्यात जलवाहतूक व्यवहार्य ठरू शकते.

मुंबई: कल्याण आणि वसई दरम्यान लवकरच जलवाहतूक सुरू होणार आहे. डिसेंबर महिन्यापासून या फेरी सेवेचा शुभारंभ होणार आहे. त्यामुळे कल्याण ते वसई हे अंतर अवघ्या 70 मिनिटांत पार करता येणे शक्य होईल. सरकारच्या इनलँड वॉटर ट्रान्सपोर्ट (आयडब्ल्यूटी) योजनेंतर्गतही ही फेरी सेवा सुरू होणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सोमवारी कल्याण-ठाणे ते वसई या मार्गावर डिसेंबरपासून ही फेरी सेवा सुरू होणार असल्याची घोषणा केली. हा मार्ग एकूण 47 किलोमीटरचा असेल. विशेष म्हणजे प्रवाशांना यासाठी प्रत्येकी 29 रूपये इतके माफक भाडे मोजावे लागेल. दर तीन वर्षांनी या भाड्यात 15 टक्क्यांनी वाढ होईल. ठाणे महानगरपालिकेकडून इनलँड वॉटर ट्रान्सपोर्ट यंत्रणेची तीन टप्प्यांत अंमलबजावणी केले जाणे अपेक्षित आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात वसई ते ठाणे-कल्याण या मार्गाचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात ठाणे ते मुंबई आणि तिसऱ्या टप्प्यात ठाणे ते नवी मुंबई या मार्गावर जलवाहतूक सुरू करण्याचा मानस आहे. उल्हास नदी, ठाण्याची खाडी आणि किनाऱ्यांचा वापर करून मुंबई महानगर प्रदेश पट्ट्यात जलवाहतूक व्यवहार्य ठरू शकते. ठाणे महानगरपालिकेने यापूर्वीच या संपूर्ण प्रकल्पाचा विस्तृत आराखडा केंद्र सरकारला सादर केला आहे. या प्रस्तावाला लवकरच केंद्रांकडून मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. प्राथमिक माहितीनुसार, पहिल्या टप्प्यातील 47 किलोमीटरच्या मार्गासाठी 600 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. या मार्गाला राष्ट्रीय जलवाहतूकमार्ग क्रमांक 53 असे नाव देण्यात येईल. त्यामुळे कल्याण ते वसई दरम्यानच्या प्रवासासाठी लागणारा दोन तासांचा अवधी 70 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. त्यासाठी वसई, मीरा-भाईंदर, ठाणे आणि कल्याणलगतच्या समुद्री परिसरात 10 बोटी तैनात करण्यात येतील. सुरुवातीच्या काळात नागला, कोलशेत आणि पारसिक या बंदरांवरून बोटी सुटतील. 

टॅग्स :water transportजलवाहतूकKalyan to Vasai ferry serviceकल्याण ते वसई फेरी सेवा