शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

खुशखबर... कल्याण ते वसई 'फेरी' ७० मिनिटांत, तीही अवघ्या २९ रुपयांत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 09:43 IST

उल्हास नदी, ठाण्याची खाडी आणि किनाऱ्यांचा वापर करून मुंबई महानगर प्रदेश पट्ट्यात जलवाहतूक व्यवहार्य ठरू शकते.

मुंबई: कल्याण आणि वसई दरम्यान लवकरच जलवाहतूक सुरू होणार आहे. डिसेंबर महिन्यापासून या फेरी सेवेचा शुभारंभ होणार आहे. त्यामुळे कल्याण ते वसई हे अंतर अवघ्या 70 मिनिटांत पार करता येणे शक्य होईल. सरकारच्या इनलँड वॉटर ट्रान्सपोर्ट (आयडब्ल्यूटी) योजनेंतर्गतही ही फेरी सेवा सुरू होणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सोमवारी कल्याण-ठाणे ते वसई या मार्गावर डिसेंबरपासून ही फेरी सेवा सुरू होणार असल्याची घोषणा केली. हा मार्ग एकूण 47 किलोमीटरचा असेल. विशेष म्हणजे प्रवाशांना यासाठी प्रत्येकी 29 रूपये इतके माफक भाडे मोजावे लागेल. दर तीन वर्षांनी या भाड्यात 15 टक्क्यांनी वाढ होईल. ठाणे महानगरपालिकेकडून इनलँड वॉटर ट्रान्सपोर्ट यंत्रणेची तीन टप्प्यांत अंमलबजावणी केले जाणे अपेक्षित आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात वसई ते ठाणे-कल्याण या मार्गाचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात ठाणे ते मुंबई आणि तिसऱ्या टप्प्यात ठाणे ते नवी मुंबई या मार्गावर जलवाहतूक सुरू करण्याचा मानस आहे. उल्हास नदी, ठाण्याची खाडी आणि किनाऱ्यांचा वापर करून मुंबई महानगर प्रदेश पट्ट्यात जलवाहतूक व्यवहार्य ठरू शकते. ठाणे महानगरपालिकेने यापूर्वीच या संपूर्ण प्रकल्पाचा विस्तृत आराखडा केंद्र सरकारला सादर केला आहे. या प्रस्तावाला लवकरच केंद्रांकडून मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. प्राथमिक माहितीनुसार, पहिल्या टप्प्यातील 47 किलोमीटरच्या मार्गासाठी 600 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. या मार्गाला राष्ट्रीय जलवाहतूकमार्ग क्रमांक 53 असे नाव देण्यात येईल. त्यामुळे कल्याण ते वसई दरम्यानच्या प्रवासासाठी लागणारा दोन तासांचा अवधी 70 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. त्यासाठी वसई, मीरा-भाईंदर, ठाणे आणि कल्याणलगतच्या समुद्री परिसरात 10 बोटी तैनात करण्यात येतील. सुरुवातीच्या काळात नागला, कोलशेत आणि पारसिक या बंदरांवरून बोटी सुटतील. 

टॅग्स :water transportजलवाहतूकKalyan to Vasai ferry serviceकल्याण ते वसई फेरी सेवा