शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सामूहिक शेतीचा पहिला प्रयोग यशस्वी

By admin | Updated: February 21, 2016 02:34 IST

ठाणे व पालघर जिल्ह्यांत बटाट्यांचे उत्पादन होत नाही. मात्र, वाडा तालुक्यातील काही तरुणांनी एकत्र येऊन आपापल्या शेतात प्रायोगिक तत्त्वावर २५ एकरांत या वाणाची लागवड केली आहे.

- वसंत भोईर,  वाडाठाणे व पालघर जिल्ह्यांत बटाट्यांचे उत्पादन होत नाही. मात्र, वाडा तालुक्यातील काही तरुणांनी एकत्र येऊन आपापल्या शेतात प्रायोगिक तत्त्वावर २५ एकरांत या वाणाची लागवड केली आहे. हा पहिला प्रयोग येथील तरुण शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखवला असून शिवजयंतीच्या मुहूर्तावर आंबिस्ते बु. येथील शेतकरी संजय पाटील व कोंडू पाटील यांच्या शेतातील बटाटे काढण्यात आले. काढलेले बटाटे शांतिदूत ग्रुप फार्मिंगमार्फत थेट ग्राहकांना घरपोच पुरवण्यात येणार असल्याची माहिती प्रफुल्ल पाटील यांनी दिली.तालुक्यातील देवघर, गांध्रे, आंबिस्ते बु., ढाढते, घोटमाळ, पालसई, विलकोस, निचोळे, बावेघर, शेलटा, बोरांडा या गावांत सुमारे २५ एकर जागेत या वर्षी बटाट्यांची लागवड केली आहे. बटाट्याची लागवड थंडीच्या काळात केली जाते. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही लागवड केली असून हे पीक आता तयार झाले आहे. एक एकर जागेत ७०० ते ८०० किलो बियाणे लागले असून एकरी २३ हजार झाडे बसतात तर पीक १० ते १५ टनांपर्यंत येते. एका एकरावर शेती केल्यास हंगामी १ लाख ४० हजारांपर्यंत नफा मिळतो.शेतकऱ्यांची खंत...वाड्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून कुठलेही सहकार्य मिळत नसल्याची खंत आंबिस्ते येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी ही शेती असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या तरुणांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. नोकरीपेक्षा जास्त पैसा आपण कमावू शकतो, असा आत्मविश्वास त्यांना आहे. मजुरांची कमतरता, खते, औषधांचा तुटवडा या गोष्टींमुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होते. मात्र, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून येथील शेतकऱ्यांनी नवी हरितक्रांती घडवण्यासाठी बटाट्याच्या शेतीचा पहिला प्रयोग यशस्वी केला आहे.बटाटा शेतीही तालुक्यात नव्हे तर कोकणात प्रथमच केली जात असावी, म्हणून येथील शेतकऱ्यांच्या सहली काढून त्यांना प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. त्यानंतर, येथील शेतकऱ्यांनी संवाद साधल्यानंतर ही शेती सोपी व जास्त उत्पन्न देणारी असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने ती येथे सुरू केली आहे. बटाटा शेती या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर २५ एकर क्षेत्रात केली असली तरी पुढील वर्षात ५०० एकर क्षेत्रात करण्याचा विचार आहे.वेफर्ससाठी हा बटाटा ९० दिवसांत तयार होतो, तर भाजीसाठी ७५ दिवसांत तयार होतो. येथील तरुण शेतकरी प्रफुल्ल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिदूत ग्रुप फार्मिंगची स्थापना करण्यात आली आहे. बटाटा शेतीसाठी बी-बियाणेतज्ज्ञ गणेश पवार व तज्ज्ञ शेतकरी अरुण मोरे, परदेशातील तज्ज्ञांनीही या शेतीसाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.