शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

सामूहिक शेतीचा पहिला प्रयोग यशस्वी

By admin | Updated: February 21, 2016 02:34 IST

ठाणे व पालघर जिल्ह्यांत बटाट्यांचे उत्पादन होत नाही. मात्र, वाडा तालुक्यातील काही तरुणांनी एकत्र येऊन आपापल्या शेतात प्रायोगिक तत्त्वावर २५ एकरांत या वाणाची लागवड केली आहे.

- वसंत भोईर,  वाडाठाणे व पालघर जिल्ह्यांत बटाट्यांचे उत्पादन होत नाही. मात्र, वाडा तालुक्यातील काही तरुणांनी एकत्र येऊन आपापल्या शेतात प्रायोगिक तत्त्वावर २५ एकरांत या वाणाची लागवड केली आहे. हा पहिला प्रयोग येथील तरुण शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखवला असून शिवजयंतीच्या मुहूर्तावर आंबिस्ते बु. येथील शेतकरी संजय पाटील व कोंडू पाटील यांच्या शेतातील बटाटे काढण्यात आले. काढलेले बटाटे शांतिदूत ग्रुप फार्मिंगमार्फत थेट ग्राहकांना घरपोच पुरवण्यात येणार असल्याची माहिती प्रफुल्ल पाटील यांनी दिली.तालुक्यातील देवघर, गांध्रे, आंबिस्ते बु., ढाढते, घोटमाळ, पालसई, विलकोस, निचोळे, बावेघर, शेलटा, बोरांडा या गावांत सुमारे २५ एकर जागेत या वर्षी बटाट्यांची लागवड केली आहे. बटाट्याची लागवड थंडीच्या काळात केली जाते. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही लागवड केली असून हे पीक आता तयार झाले आहे. एक एकर जागेत ७०० ते ८०० किलो बियाणे लागले असून एकरी २३ हजार झाडे बसतात तर पीक १० ते १५ टनांपर्यंत येते. एका एकरावर शेती केल्यास हंगामी १ लाख ४० हजारांपर्यंत नफा मिळतो.शेतकऱ्यांची खंत...वाड्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून कुठलेही सहकार्य मिळत नसल्याची खंत आंबिस्ते येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी ही शेती असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या तरुणांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. नोकरीपेक्षा जास्त पैसा आपण कमावू शकतो, असा आत्मविश्वास त्यांना आहे. मजुरांची कमतरता, खते, औषधांचा तुटवडा या गोष्टींमुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होते. मात्र, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून येथील शेतकऱ्यांनी नवी हरितक्रांती घडवण्यासाठी बटाट्याच्या शेतीचा पहिला प्रयोग यशस्वी केला आहे.बटाटा शेतीही तालुक्यात नव्हे तर कोकणात प्रथमच केली जात असावी, म्हणून येथील शेतकऱ्यांच्या सहली काढून त्यांना प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. त्यानंतर, येथील शेतकऱ्यांनी संवाद साधल्यानंतर ही शेती सोपी व जास्त उत्पन्न देणारी असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने ती येथे सुरू केली आहे. बटाटा शेती या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर २५ एकर क्षेत्रात केली असली तरी पुढील वर्षात ५०० एकर क्षेत्रात करण्याचा विचार आहे.वेफर्ससाठी हा बटाटा ९० दिवसांत तयार होतो, तर भाजीसाठी ७५ दिवसांत तयार होतो. येथील तरुण शेतकरी प्रफुल्ल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिदूत ग्रुप फार्मिंगची स्थापना करण्यात आली आहे. बटाटा शेतीसाठी बी-बियाणेतज्ज्ञ गणेश पवार व तज्ज्ञ शेतकरी अरुण मोरे, परदेशातील तज्ज्ञांनीही या शेतीसाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.