शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक शेतीचा पहिला प्रयोग यशस्वी

By admin | Updated: February 21, 2016 02:34 IST

ठाणे व पालघर जिल्ह्यांत बटाट्यांचे उत्पादन होत नाही. मात्र, वाडा तालुक्यातील काही तरुणांनी एकत्र येऊन आपापल्या शेतात प्रायोगिक तत्त्वावर २५ एकरांत या वाणाची लागवड केली आहे.

- वसंत भोईर,  वाडाठाणे व पालघर जिल्ह्यांत बटाट्यांचे उत्पादन होत नाही. मात्र, वाडा तालुक्यातील काही तरुणांनी एकत्र येऊन आपापल्या शेतात प्रायोगिक तत्त्वावर २५ एकरांत या वाणाची लागवड केली आहे. हा पहिला प्रयोग येथील तरुण शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखवला असून शिवजयंतीच्या मुहूर्तावर आंबिस्ते बु. येथील शेतकरी संजय पाटील व कोंडू पाटील यांच्या शेतातील बटाटे काढण्यात आले. काढलेले बटाटे शांतिदूत ग्रुप फार्मिंगमार्फत थेट ग्राहकांना घरपोच पुरवण्यात येणार असल्याची माहिती प्रफुल्ल पाटील यांनी दिली.तालुक्यातील देवघर, गांध्रे, आंबिस्ते बु., ढाढते, घोटमाळ, पालसई, विलकोस, निचोळे, बावेघर, शेलटा, बोरांडा या गावांत सुमारे २५ एकर जागेत या वर्षी बटाट्यांची लागवड केली आहे. बटाट्याची लागवड थंडीच्या काळात केली जाते. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही लागवड केली असून हे पीक आता तयार झाले आहे. एक एकर जागेत ७०० ते ८०० किलो बियाणे लागले असून एकरी २३ हजार झाडे बसतात तर पीक १० ते १५ टनांपर्यंत येते. एका एकरावर शेती केल्यास हंगामी १ लाख ४० हजारांपर्यंत नफा मिळतो.शेतकऱ्यांची खंत...वाड्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून कुठलेही सहकार्य मिळत नसल्याची खंत आंबिस्ते येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी ही शेती असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या तरुणांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. नोकरीपेक्षा जास्त पैसा आपण कमावू शकतो, असा आत्मविश्वास त्यांना आहे. मजुरांची कमतरता, खते, औषधांचा तुटवडा या गोष्टींमुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होते. मात्र, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून येथील शेतकऱ्यांनी नवी हरितक्रांती घडवण्यासाठी बटाट्याच्या शेतीचा पहिला प्रयोग यशस्वी केला आहे.बटाटा शेतीही तालुक्यात नव्हे तर कोकणात प्रथमच केली जात असावी, म्हणून येथील शेतकऱ्यांच्या सहली काढून त्यांना प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. त्यानंतर, येथील शेतकऱ्यांनी संवाद साधल्यानंतर ही शेती सोपी व जास्त उत्पन्न देणारी असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने ती येथे सुरू केली आहे. बटाटा शेती या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर २५ एकर क्षेत्रात केली असली तरी पुढील वर्षात ५०० एकर क्षेत्रात करण्याचा विचार आहे.वेफर्ससाठी हा बटाटा ९० दिवसांत तयार होतो, तर भाजीसाठी ७५ दिवसांत तयार होतो. येथील तरुण शेतकरी प्रफुल्ल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिदूत ग्रुप फार्मिंगची स्थापना करण्यात आली आहे. बटाटा शेतीसाठी बी-बियाणेतज्ज्ञ गणेश पवार व तज्ज्ञ शेतकरी अरुण मोरे, परदेशातील तज्ज्ञांनीही या शेतीसाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.