शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

१९९५ च्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेला यश

By admin | Updated: October 10, 2015 00:07 IST

केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असतानाही केडीएमसीच्या पहिल्याच १९९५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा एकमेकांसमोर उभे ठाकले होते. शिवसेना-भाजपा-काँग्रेस

- प्रशांत माने,  कल्याणकेंद्रात आणि राज्यात सत्तेवर असतानाही केडीएमसीच्या पहिल्याच १९९५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा एकमेकांसमोर उभे ठाकले होते. शिवसेना-भाजपा-काँग्रेस अशा तिरंगी झालेल्या लढतीत शिवसेनेने घवघवीत यश संपादन केले, तर भाजपाला विरोधी पक्षात बसावे लागले. कल्याण-डोंबिवली हा बालेकिल्ला कोणाचा, हे ठरविणारी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती.केंद्रात, राज्यात सत्ता असल्याने केडीएमसीच्या निवडणुकीत युती होईल, अशी शक्यता होती. महापालिकेचे एकूण ९६ प्रभाग होते. दरम्यान, त्या वेळीही २७ गावांतील संघर्ष समितीने निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने ८६ प्रभागांमध्ये निवडणुका झाल्या. या ८६ जागांच्या वाटपावर चर्चा सुरू झाल्या खऱ्या, परंतु वाटपाचे सूत्र ठरत नव्हते.शिवसेनेला घवघवीत यशनिवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या सेना-भाजपाकडून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. दोन्ही पक्षांतील भांडणाचा फायदा काँग्रेस उठवेल, अशी अपेक्षा होती. परंतु, ती कालांतराने फोल ठरली. शिवसेनाविरुद्ध भाजपाविरुद्ध काँग्रेस अशा तिरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.या निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री मनोहर जोशी, भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तर भाजपाच्या वतीने उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन आदी दिग्गज नेते उतरले होते. दरम्यान, निवडणुकीच्या निकालात ८६ पैकी ४० जागा जिंकून शिवसेना सत्तेच्या जवळपास पोहोचली. बहुमतासाठी त्यांना ५ जणांच्या पाठिंब्याची आवश्यकता होती. सर्व ६ अपक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. यात शिवसेनेने सत्ता काबीज केली तर बालेकिल्ला असल्याच्या भ्रमात असलेल्या भाजपाचा मात्र चांगलाच भ्रमनिरास झाला. त्यांना २३ जागांवर तर काँग्रेसला १७ जागांवर विजय मिळविता आला. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या भाजपाला विरोधी पक्ष म्हणून समाधान मानावे लागले.५० टकके जागांचा होता आग्रह आधीच्या कल्याण-डोंबिवली नगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता होती. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत अधिक जागा हव्यात, असा दावा त्यांनी केला होता. शिवसेनेला २५ च्या आसपास जागा सोडण्यास भाजपा तयार झाली होती. परंतु, हे शिवसेनेला मान्य नव्हते. त्यांनी ५० टकके जागांचा आग्रह धरला होता. अखेर, जागावाटपावरून बोलणी फिस्कटल्याने युती होऊ शकली नाही.