शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

बंदी आदेश मोडून फोडले गेले फटाके; ३२ ठिकाणी लागल्या आगी

By धीरज परब | Updated: November 13, 2023 23:18 IST

फटाक्यांमुळे तब्बल ३२ ठिकाणी लागल्या आगी

धीरज परब

मीरारोड - वाढलेले हवेतील प्रदूषण व ध्वनिप्रदूषण पाहता मीरा भाईंदर महापालिकेने फटाके फोडण्यासाठी रात्री ७ ते १० हि वेळ निश्चित केली असताना देखील त्याला काडीचे महत्व न देता रविवारी दिवाळी दिवशी बहुतांश लोकांनी सायंकाळ पासून मध्यरात्र उलटून गेल्या नंतर सुद्धा सर्रास कानठळ्या बसवणारे फटाके फोडले . यामुळे मोठे वायू प्रदूषण झालेच पण ध्वनी प्रदूषण होऊन लोकांना त्रास सहन करावा लागला  . तर फटाक्यां मुळे तब्बल ३२ ठिकाणी आगी लागल्या असून त्यात ४ घरांना व एका दुचाकीला आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे . 

महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी आदेश काढून दिवाळी निमित्त रात्री ७ ते १० वाजे पर्यंतची वेळ मर्यादा फटाके फोडण्यासाठी दिली होती . त्यादरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने वायू आणि ध्वनी प्रदूषणाचा विचार करून रात्री ८ ते १० ह्या दोन तासांची वेळ फटाके फोडण्यास दिली . 

तसे असताना मीरा शहरात मात्र रविवारी दिवाळी दिवशी सायंकाळ पासून मध्यरात्री उलटून गेल्या नंतर देखील कानठळ्या बसवणारे फटाके फोडले जात होते . शहरातील रुग्णालय , शाळा , धार्मिक स्थळं आदी शांतता क्षेत्रात सुद्धा फटाके फोडले गेले . पोलीस वा पालिकेचे कोणीही कारवाई करत नसल्याने मध्यरात्री नंतर सुद्धा फटाके फोडले गेले . 

मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्याने सर्वत्र घातक धुराचे साम्राज्य पासून अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत होता . तर अनेकांना मोठ्या आवाजा मुळे त्रास होऊन रात्रीची झोप सुद्धा पूर्ण करता आली नाही . रुग्ण , लहान बाळ, गर्भवती स्त्रिया, वृद्ध आदींना जास्त त्रास सोसावा लागतो .  

तर फटाक्यां मुळे रविवारच्या रात्री तब्बल ३२ ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत . त्यात जय अंबे नगर , इंद्रलोक , कनकिया भागातील कांदळवन क्षेत्रात आगी लागल्या . कांदळवनातील ३ ठिकाणीच्या आगी अग्निशमन दलाने विझवल्या . 

फटाक्यां मुळे कचरा वा ज्वलनशील वस्तूं आगी लागल्या . ४ घरांना फटक्यां मुळे आगी लागल्या . सदर आगी ह्या रॉकेट फाटक्या मुळे लागल्या आहेत . त्यातील मीरारोडच्या सिल्वर सरिता भागातील पृथ्वी प्राईड ह्या २२ मजली टॉवरच्या १८ व्या मजल्यावरील सदनिका रॉकेट फटाक्याच्या आगीने मध्यरात्री जळून खाक झाली . मोठी आग लागल्याने इमारतीतील रहिवाश्याना बाहेर काढण्यात आले तसेच वीज पुरवठा खंडित करण्यात आला . अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली . यात लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले . भाईंदर पूर्वेच्या नवघर मार्गावर फटाक्या मुळे दुचाकी जाळून खाक झाली . 

शासन , कायदे नियम , न्यायालयीन आदेश चे उल्लंघन करून मीरा भाईंदर महापालिकेने शहरात नियमबाह्यरीत्या भर रस्त्या लगत प्रचंड प्रमाणात फटाके स्टॉल ना परवानग्या दिल्या आहेत . फटाक्यांनी घातक वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण होत असताना ते कमी करण्या ऐवजी महापालिकेने व पोलिसांनी सर्रास फटाके स्टॉल ना परवानग्या दिल्या . त्यामुळे मर्यादेचे उल्लंघन करून फटाके फोडण्यासह वाढत्या वायू व ध्वनी प्रदूषणास तसेच आगी लागून झालेल्या नुकसानीला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे .

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरfire crackerफटाकेthaneठाणे