शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कल्याण रेल्वे स्थानकाची सुरक्षा रामभरोसे; बादलीनं पाणी घेऊन आग विझवण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 17:12 IST

अरुंद रस्त्यामुळे अग्निशमन दलाच्या कामात अडथळा

कल्याण- रेल्वे तिकीट आरक्षण केंद्राच्या मागच्या बाजूला कचऱ्याला आग लागली. या ठिकाणी असलेला रस्ता अतिशय अरुंद असल्यानं तिथे अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे आरपीएफ व रेल्वे कर्मचाऱ्यांनी झाड्यांच्या फांद्यांच्या मदतीनं आणि बादली बादलीनं पाणी आणून आग विझवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यामुळे रेल्वे जंक्शन असूनही कल्याण रेल्वे स्थानकातील आग विझवण्याची यंत्रणा कुचकामी असल्याची बाब आज पुन्हा एकदा उघडकीस आली.कल्याण रेल्वे स्थानकाचा परिसर 65 एकर इतका मोठा आहे. कल्याण हे जंक्शन स्थानक असल्यानं या ठिकाणाहून लाखो प्रवासी प्रवास करतात. या ठिकाणाहून जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या आणि उपनगरीय गाड्यांची संख्या मोठी आहे. स्थानकात एकूण आठ प्लॅटफॉर्म आहेत. फलाट क्रमांक एक जवळ रेल्वेचं तिकीट आरक्षण केंद्र आहे. या केंद्राच्या मागे रेल्वे परिसरातील कचरा टाकला जातो. या कचऱ्याला आज दुपारी अचानक आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात येणार होतं. मात्र त्याठिकाणी पोहोचण्याचा रस्ता अरुंद असल्यानं आणि परिसरात केबल वायर असल्यानं अडथळा निर्माण होतो.अग्नीशमन दलाच्या गाड्या येण्यापूर्वीच आरपीएफ जवान व कामगारांनी कचऱ्याला लागलेली आग विझवण्यासाठी धाव घेतली. त्यांनी पाण्याच्या बादल्या घेऊन आगीवर पाणी टाकले. तसेच झाड्यांच्या फांद्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीमुळे फलाट क्रमांक एकसह अन्य परिसरात धूरच धूर झाला होता. हा धूर प्रवाशांच्या नाकातोंडात गेल्यानं प्रवाशांचा श्वास कोंडला. आगीमुळे मुंबईहून कल्याणला येणारी गाडी पत्री पुलाजवळ एक तास उभी करुन ठेवली होती. रेल्वे तिकीट आरक्षण केंद्राच्या मागे टाकण्यात येणारा कचरा उचलण्यासाठी महापालिकेचे कामगार अथवा कचरा गाडी येत नाही. त्यामुळे त्याठिकाणी कचरा साचला आहे. काही महिन्यापूर्वी दुरुंतो एक्सप्रेसच्या डब्याला कल्याण स्थानकात आग लागली होती. वर्षभरापूर्वी राजेंद्रनगर एक्सप्रेसच्या इंजिनालाही आग लागली होती. त्यावेळीही स्थानकात आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या जवानाला कसरत करावी लागली होती. 

टॅग्स :fireआग