शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

अग्निरोधक यंत्रांची मुदत संपूनही डोळेझाक; नागरिक, कर्मचाऱ्यांची सुरक्षा रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 22:55 IST

मीरा-भाईंदर महापालिकेकडून सामान्य नागरिकांच्या गृहनिर्माण संस्थांसह शाळा, विविध आस्थापनांना अग्निशामक यंत्रणा बसवण्याचे उपदेश देत असते.

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिका मुख्यालयासह पालिका शाळा व नगरभवनमधील अग्निरोधक यंत्रांची मुदत गेल्या वर्षी संपूनही पालिकेने त्याकडे डोळेझाक चालवल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. विद्यार्थ्यांसह नागरिक व पालिका कर्मचाऱ्यांची सुरक्षाच रामभरोसे आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेकडून सामान्य नागरिकांच्या गृहनिर्माण संस्थांसह शाळा, विविध आस्थापनांना अग्निशामक यंत्रणा बसवण्याचे उपदेश देत असते. अग्निशामक यंत्रणा बसवणे बंधनकारक असताना त्याची काटेकोर अंमलबजावणीच केली जात नाही. त्यातच, आता महापालिका मुख्यालयासह पालिकेच्या ३६ शाळा, नगरभवन येथील कार्यालये व सभागृह आदी ठिकाणी लावलेल्या अग्निरोधक यंत्रांची मुदत गेल्यावर्षीच संपली आहे. मुख्यालयासह नगरभवनमध्ये पालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांची दालने आहेत.

सामान्य नागरिक, लोकप्रतिनिधीही मोठ्या संख्येने येत असतात. तर पालिका शाळांमध्ये पहिली ते आठवीचे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारीवर्ग असतो. मुख्यालय व नगरभवनमध्ये अग्निरोधक यंत्रांसह अग्निशमन यंत्रणा आहे. पण, शाळांमध्ये केवळ अग्निरोधक यंत्रांवरच सुरक्षेची भिस्त आहे.

अग्निरोधक यंत्रांची मुदत गेल्या वर्षीच संपल्याने आग लागल्यास ती कूचकामी ठरणार आहेत. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत आग शमवण्यासाठी यंत्रच नसल्याने अनर्थ होण्याची भीती आहे. गंभीर बाब म्हणजे गेल्या वर्षी मुदत संपलेली असतानाही पालिका प्रशासनाने आजतागायत त्याकडे डोळेझाक केली आहे.तातडीने मुदत संपलेल्या अग्निरोधक यंत्रांना बदलून त्यांचे रिफिलिंग करून पुन्हा लावले जातील. - डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त

महापालिका, शाळा व नगरभवनमधील अग्निरोधक यंत्रांची मुदत संपली असून आम्ही त्वरित ते बदलण्यास घेतले आहे. - प्रकाश बोराडे, अग्निशमन दल अधिकारी, प्रभारी

गेल्या वर्षी अग्निरोधक यंत्रांची मुदत संपूनही पालिकेने अजूनही ते रिफिलिंग न करणे गंभीर बाब आहे. पालिकाच नियमांचे पालन करत नाही, हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. त्यांना नागरिकांच्या सुरक्षिततेचे काही पडलेले नाही. - डॉ. जितेंद्र जोशी, नागरिक

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकfireआग