शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भिवंडीत भंडारी कंपाऊण्ड व कालवार येथील भंगाराची गोदामांना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 22:38 IST

भिवंडी : शहरातील नारपोली भागातील भंडारी कंपाऊण्डमध्ये आज शुक्रवारी पहाटे लागलेली आग मनपाच्या अग्निशामक दलाने शर्थ करून सकाळपर्यंत विझविली ...

ठळक मुद्दे भंडारी कंपाऊण्डमधील लोकवस्तीतील भंगाराच्या गोदामास पहाटे आग कालवार गावातील जंम्बो भंगाराच्या गोदामास सायंकाळी भिषण आगबेकायदेशीर भंगाराच्या गोदामावर कायदेशाीर कारवाई आवश्यक

भिवंडी : शहरातील नारपोली भागातील भंडारी कंपाऊण्डमध्ये आज शुक्रवारी पहाटे लागलेली आग मनपाच्या अग्निशामक दलाने शर्थ करून सकाळपर्यंत विझविली असताना सायंकाळी तालुक्यातील कालवार आगीची घटना घडली असून या आगीच्या भिषणतेमुळे ही आग विझविण्यासाठी रात्र उलटणार असल्याची माहिती आग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.आज घडलेल्या आगीच्या दोन घटनेने भंगाराच्या गोदामांचा विषय ऐरणीवर आला असून अशा बेकायदेशीर गोदामांवर कायदेशीर कारवाई करण्याची आवश्यक्यता आहे.शहरातील भंडारी कंपाऊण्डमधील लोकवस्तीत असलेल्या भंगाराच्या गोदामांस पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत प्लास्टिकच्या वस्तू, कागदी पुठ्ठा,धागा आदि साहित्यांचा मोठ्या प्रमाणावर साठा होता. अचानक पहाटेच्या वेळेस लागलेल्या आगीने गोदामातील सर्व ज्वलनशील साहित्यांनी पेट घेऊन आगीने रौद्ररूप धारण केले. या घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी अग्निशामक दलास पाचारण करून घटनास्थळी दाखल झाले. मनपाच्या अग्निशामकदलाच्या ३ गाड्या सोबत ३ पाण्याच्या गाड्यांनी मिळून ही आग चार तासात विझविली. ही घटना घडल्यानंतर या आगीची धग गोदामाच्या आजूबाजूच्या रहिवासी वस्तीला लागून प्राणहानी होऊ नये म्हणून आजूबाजूच्या वीस-पंचवीस खोलीतील रहिवाश्यांना घराबाहेर काढले. शहरातील अग्निशामकदल ही आग विझवून सुस्कारा टाकत नाही तोच शुक्रवारी सायंकाळी कालवार गावातील जंम्बो गोदामास भिषण आग लागली.भिवंडी-वसई रोडवरील कालवार गावाच्या हद्दीत मोठमोठी जम्बो गोदामे असुन त्यापैकी कागदी लगदा, पुठ्ठा व पॅकींगचे सामान दररोज कंटनेरमधून आणून या जम्बो गोदामातील विविध गोदामात साठविला जात होता. सायंकाळी आग लागल्यानंतर गोदामातील कामगारांनी गोदामाबाहेर पळ काढला. गोदामातील भंगाराला लागलेल्या आगीने भिषणता वाढल्यानंतर भिवंडी,ठाणे,कल्याण येथील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र कोणतीही प्राणहानी झालेली नाही. परिसरांत पाण्याची कमतरता आणि आगीची भिषणता पहाता ही आग विझविण्यास रात्रभर झटावे लागणार असून १२ तासापेक्षा जास्त वेळ जाणार असल्याची माहिती मनपा अग्निशामक दलाचे अधिकारी डी.एन.साळवी यांनी दिली. सदर आगीचे कारण आद्याप समजू शकले नाही.या आगीमुळे गोदामाचा पत्रा,अँन्गल व भिंती तुटल्याने गोदामाचे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडीfireआग