शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

कल्याणमध्ये खड्ड्यांमुळे बंब पोहोचले उशिरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 06:56 IST

४५ मिनिटांचा झाला विलंब : मिठाईच्या दुकानाला लागलेल्या आगीची घरांनाही झळ

कल्याण : पश्चिमेतील सिंडिकेट परिसरातील एका मिठाईच्या दुकानाला रविवारी मध्यरात्री आग लागली. मात्र, या आगीची माहिती अग्निशमन विभागाला दिल्यानंतर खड्ड्यांमुळे सुमारे ४५ मिनिटांनी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरातील वस्तूंचे नुकसान झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. मात्र, अग्निशमन दलाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.सिंडिकेट परिसरातील स्टर्लिंग टॉवर इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या एका मिठाईच्या दुकानाला मध्यरात्री २.३० च्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला एका पोलीस कर्मचाऱ्याने दिली. मात्र, माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास ४५ मिनिटे लागल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. यादरम्यान, आगीने रौद्ररूप धारण केल्याने झालेल्या धुराने इमारतीचा सातवा मजला गाठला. त्यामुळे, इमारतीमधील रहिवाशांच्या घरात धूर गेल्याने त्यांचा जीव गुदमरला. तसेच, काहींच्या घरातील विद्युत उपकरणांचे नुकसान झाले. तर, काहींच्या घरांच्या खिडक्याही तुटल्या. उशिरा आल्याबद्दल आम्ही अग्निशमन जवानांकडे विचारणा केली, असता त्यांनी खड्ड्यांमुळे येण्यास उशीर झाल्याचे सांगितले, असे इमारतीमधील रहिवासी एन.व्ही. राव आणि फ्रान्सिस जोस यांनी सांगितले. दरम्यान, या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसली, तरी दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज अग्निशमन विभागाने व्यक्त केला. आगीचे नेमके कारण अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.अवघ्या १५ मिनिटांत जवान घटनास्थळी - गुंडआगीची वर्दी मिळाल्यानंतर १५ मिनिटांमध्ये अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर, त्यांनी आग आटोक्यात आणल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप गुंड यांनी सांगितले.

टॅग्स :fireआग