शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

दरवाढीमुळे कोलमडले गृहिणींचे आर्थिक बजेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 01:32 IST

भाजीपाल्याची आवक घटली; डाळीही १५ ते २० रुपयांनी महागल्या

- हितेन नाईक पालघर : जिल्ह्यात नाशिक आणि गुजरात राज्यातून भाजीपाला पुरवठा होत असतो, परंतु अवकाळी पावसामुळे उत्पादन घटल्याने भाजीपाल्याच्या दरांनी उचल खाल्ली आहे. त्यामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. तसेच डाळींच्या दरांमध्येही १५ ते २० रुपयांनी वाढ झाली आहे.पालघर जिल्ह्यात नाशिकसह गुजरात राज्यातल्या वापी आणि सुरत भागातून सुमारे ५० ते ६० ट्रक भाजीपाला वितरित केला जातो. तर जिल्ह्यातील सुमारे ६०० हेक्टर क्षेत्रफळावर वेलवर्गीय भाजीपाला ज्यात दुधी, गलके, कारले आदी भाजीसह मिरची, सिमला मिरची, वांगी, टॉमेटो आदीचे उत्पादन घेतले जाते. मात्र अवकाळीमुळे भाजीपाला उत्पादनात घट झाली आहे. कांद्याचाही ४० ते ५० रुपये प्रतिकिलो असा भाव झाला असून सर्वसामान्यांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे रोजगार बंद झाले असून नोकऱ्यांवर पाणी फिरले आहे. अनेक उद्योगधंदेही बंद पडल्याने हातमजुरी करणाºया गोरगरीबांसह किरकोळ व्यावसायिकांवरही मोठे संकट कोसळले आहे. अशातच भाजीपाला यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडल्याने जनसामान्यांना दुहेरी फटका सोसावा लागत आहे.सध्या लोकल सेवा बंद असल्याने माझ्या पतीला कामावर जात येत नसल्यामुळे एप्रिलपासून अर्धाच पगार मिळत आहे. त्यामुळे आमच्या घरचे बजेट गडबडले असून येत्या सणासुदीच्या दिवसात आणखी भाव वाढण्याची शक्यता वाटते.- शालिनी मेहेर, ग्राहकपालघर जिल्ह्यात भाजीपाल्याची नाशिक आणि गुजरातमधून होणारी आवक सध्या घटली असल्याने दर वाढले आहेत. मात्र नोकºया तसेच कामधंदे बंद झाल्याने ग्राहकांकडून कमी भाजीपाला खरेदी केला जात आहे.-देव लुक्षा, भाजीविक्रेता पालघरअनेक कष्ट घेऊन शेतकरी शेतमाल पिकवतो, मात्र विक्री व्यवस्थेतील असंख्य अडचणींमुळे तो त्याची विक्री करू शकत नाही. त्यामुळे भाववाढीनंतरही उत्पादकांना कोणताच आर्थिक फायदा होत नाही.- शेतीनिष्ठ देवेंद्र राऊत, भाजीपाला उत्पादक शेतकरीभाजीपाला-डाळी महागण्याची कारणेपालघरला भाजीपुरवठा करणाºया नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे उत्पादन घटल्याने भाजीपाल्याच्या दरांनी उचल खाल्ली आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसात डाळीही १५ ते २० रुपयांनी महागल्या आहेत.

टॅग्स :vegetableभाज्या