शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

अखेर उल्हासनगर महापालिका पाणी गळतीची निविदा रद्द, तुकडे पाडून दिले जाणार काम?

By सदानंद नाईक | Updated: January 6, 2023 17:22 IST

उल्हासनगर महापालिकेने जलवाहिन्यांना लागलेली पाणी गळती बंद करण्यासाठी काही वर्षांपूर्वी ४०० कोटींची पाणी वितरण योजना राबिविली. त्यावेळी स्थानिक राजकारणी नेत्यांनी मुबलक पाणी व पाणी गळती बंद अशी हाक दिली होती.

उल्हासनगर : शहरातील पाणी गळतीच्या निविदेविरोधात लहान ठेकेदारांनी साखळी उपोषण केल्याने, महापालिकेने अखेर निविदा रद्द केली. ये रे माझ्या मागल्या प्रमाणे जुन्याच पद्धतीने पाणी गळतीचे काम देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

उल्हासनगर महापालिकेने जलवाहिन्यांना लागलेली पाणी गळती बंद करण्यासाठी काही वर्षांपूर्वी ४०० कोटींची पाणी वितरण योजना राबिविली. त्यावेळी स्थानिक राजकारणी नेत्यांनी मुबलक पाणी व पाणी गळती बंद अशी हाक दिली होती. मात्र योजना झोपडपट्टी काही भागात नसल्याने, पाणी गळतीचा प्रश्न पूर्णतः निकाली लागला नाही. पाणी गळती थांबविण्यासाठी महापालिका वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च करीत असल्याचे उघड झाले. पाणी गळतीचा ठेका लहान-लहान ठेकेदाराला न देता, एकाच ठेकेदाराला देण्याची संकल्पना पुढे आली. यातूनच गेल्या महिन्यात लागणाऱ्या साहित्याच्या किंमतीनुसार निविदा काढण्यात आली. निविदेतील अटी व शर्तीनुसार आम्हाला कामे मिळणार नाही. असा गळा लहान ठेकेदार, मजूर संस्था, बेरोजगार अभियंता संस्था यांनी काढून निविदा रद्द करण्यासाठी महापालिके समोर उपोषण सुरू केले.

 गेल्या तीन वर्षात पाणी गळतीवर झालेला खर्च यानिमित्ताने शहरवासिया समोर उघड झाला. ३ वर्षात तब्बल ५० कोटी रुपये महापालिकेने पाणी गळती थांबविण्यासाठी खर्च करूनही, पाणी गळती थांबली नाही. पाणी गळतीवर झालेला खर्च बघून यापूर्वी झालेल्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याच्या मागणीने जोर पकडला आहे. पाणी गळती बंद करण्यासाठी काढलेली निविदा रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने लहान ठेकेदारांच्या उपोषणामुळे रद्द करावा लागला. पुन्हा पाणी गळती पूर्णतः थांबविणे सोडून नेहमी प्रमाणे तुकड्याने लहान ठेकेदाराने कामे द्यावे लागणार आहे. पाणी गळतीवर ठोस उपाययोजना न करता, दरवर्षी १८ कोटी पेक्षा जास्त खर्च पाणी गळतीच्या कामावर होणार आहे. एकूणच महापालिकेचे आर्थिक हित न साधता निविदा रद्द केल्याने, महापालिका लहान ठेकेदाराच्या आंदोलना पुढे झुजली. असा प्रचार शहरात होत आहे. 

पाणी गळती बंद होणार का? शहरात २५ टक्के पेक्षा जास्त पाणी गळती होत असून कोट्यवधी रुपये किमतीचे लाखो लिटर पाणी खाली जात आहे. असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पाणी गळती थांबविण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील अमोल अमृत योजना कार्यान्वित होण्याची वाट पहावे लागणार आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरWaterपाणी