शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

अखेर उल्हासनगर महापालिका पाणी गळतीची निविदा रद्द, तुकडे पाडून दिले जाणार काम?

By सदानंद नाईक | Updated: January 6, 2023 17:22 IST

उल्हासनगर महापालिकेने जलवाहिन्यांना लागलेली पाणी गळती बंद करण्यासाठी काही वर्षांपूर्वी ४०० कोटींची पाणी वितरण योजना राबिविली. त्यावेळी स्थानिक राजकारणी नेत्यांनी मुबलक पाणी व पाणी गळती बंद अशी हाक दिली होती.

उल्हासनगर : शहरातील पाणी गळतीच्या निविदेविरोधात लहान ठेकेदारांनी साखळी उपोषण केल्याने, महापालिकेने अखेर निविदा रद्द केली. ये रे माझ्या मागल्या प्रमाणे जुन्याच पद्धतीने पाणी गळतीचे काम देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

उल्हासनगर महापालिकेने जलवाहिन्यांना लागलेली पाणी गळती बंद करण्यासाठी काही वर्षांपूर्वी ४०० कोटींची पाणी वितरण योजना राबिविली. त्यावेळी स्थानिक राजकारणी नेत्यांनी मुबलक पाणी व पाणी गळती बंद अशी हाक दिली होती. मात्र योजना झोपडपट्टी काही भागात नसल्याने, पाणी गळतीचा प्रश्न पूर्णतः निकाली लागला नाही. पाणी गळती थांबविण्यासाठी महापालिका वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च करीत असल्याचे उघड झाले. पाणी गळतीचा ठेका लहान-लहान ठेकेदाराला न देता, एकाच ठेकेदाराला देण्याची संकल्पना पुढे आली. यातूनच गेल्या महिन्यात लागणाऱ्या साहित्याच्या किंमतीनुसार निविदा काढण्यात आली. निविदेतील अटी व शर्तीनुसार आम्हाला कामे मिळणार नाही. असा गळा लहान ठेकेदार, मजूर संस्था, बेरोजगार अभियंता संस्था यांनी काढून निविदा रद्द करण्यासाठी महापालिके समोर उपोषण सुरू केले.

 गेल्या तीन वर्षात पाणी गळतीवर झालेला खर्च यानिमित्ताने शहरवासिया समोर उघड झाला. ३ वर्षात तब्बल ५० कोटी रुपये महापालिकेने पाणी गळती थांबविण्यासाठी खर्च करूनही, पाणी गळती थांबली नाही. पाणी गळतीवर झालेला खर्च बघून यापूर्वी झालेल्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याच्या मागणीने जोर पकडला आहे. पाणी गळती बंद करण्यासाठी काढलेली निविदा रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने लहान ठेकेदारांच्या उपोषणामुळे रद्द करावा लागला. पुन्हा पाणी गळती पूर्णतः थांबविणे सोडून नेहमी प्रमाणे तुकड्याने लहान ठेकेदाराने कामे द्यावे लागणार आहे. पाणी गळतीवर ठोस उपाययोजना न करता, दरवर्षी १८ कोटी पेक्षा जास्त खर्च पाणी गळतीच्या कामावर होणार आहे. एकूणच महापालिकेचे आर्थिक हित न साधता निविदा रद्द केल्याने, महापालिका लहान ठेकेदाराच्या आंदोलना पुढे झुजली. असा प्रचार शहरात होत आहे. 

पाणी गळती बंद होणार का? शहरात २५ टक्के पेक्षा जास्त पाणी गळती होत असून कोट्यवधी रुपये किमतीचे लाखो लिटर पाणी खाली जात आहे. असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पाणी गळती थांबविण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील अमोल अमृत योजना कार्यान्वित होण्याची वाट पहावे लागणार आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरWaterपाणी