शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

...अखेर पोलिसांना हक्काची घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:03 IST

१७ वर्षे दिला लढा; पोलीस महिला मंडळाच्या पाठपुराव्याला यश

ठाणे : वर्तकनगर येथील म्हाडाच्या धोकादायक इमारतींमधील ३४० पोलीस कुटुंबियांना पुनर्बांधणीत हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेली १७ वर्षे यासाठी लढा देणाऱ्या येथील जनसेवा महिला मंडळाने आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वखाली गेली चार वर्षे पोलीस आयुक्त ते मुख्यमंत्री असा यशस्वी पाठपुरावा केला होता.वर्तकनगर येथील म्हाडाच्या ५८ ते ६१,५१ ते ५३ तसेच १४ आणि १६ अशा दहा इमारतींमध्ये पोलिसांची ३४० कुटूंबे याठिकाणी वास्तव्याला आहेत. या इमारती ४० वर्षे जुन्या असून त्या धोकादायक असल्याचे ठाणे महापालिकेने जाहीर केले आहे. गेली काही वर्षे ही कुटुंबे जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत. पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यानंतर या कुटूंबांना ही घरे पोलीस प्रशासनाकडे परत द्यावी लागतात. त्यामुळे प्रामाणिकपणे सेवा बजावणारे पोलीस आणि त्यासाठी त्याग करणारे कुटुंब बेघर होतात. या कुटुंबांना तात्पुरती घरे न मिळता हक्काची घरे मिळावीत, यासाठी येथील जनसेवा महिला मंडळ गेली १७ वर्षे शासनाकडे मागणी करीत होते.या महिला पदाधिकाºयांनी केळकर यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन पोलीस आयुक्त विजय कांबळे तसेच सह पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण, पोलीस महासंचालक प्रविण दीक्षित यांची भेट घेऊन मालकी हक्काच्या घरांबाबतच्या विषयाचे गाºहाणे मांडल्यामुळे या मागणीला चालना मिळाली. तत्कालीन गृहसचिव के.पी.बक्षी यांच्याशीही मंडळाने भेट घेऊन चर्चा केल्यानंतर त्यांनीही या मागणीला हिरवा कंदील दिला होता. पुनर्बांधणीत सेवानिवृत्त आणि मृत पावलेल्या कर्मचाºयांच्या कुटूंबियांना प्राधान्याने घरे देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यानंतर केळकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याचे मंडळाने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. त्यावेळी या कुटुंबांना मालकी हक्काची घरे देण्याची खात्री त्यांनी दिली. त्याप्रमाणे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पोलीस गृहनिर्माण मंडळास ठाण्याच्या कासारवडवली पोलीस ठाण्याच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी दिले. त्याप्रमाणे पोलीस महासंचालकांच्या दालनात २०१७-२०१८ मध्ये तीन बैठका झाल्या. त्यानुसार २.५ एफएसआय देण्याचे ठरले.दरम्यान, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांची नुकतीच भेट घेवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली असून पोलीस खात्याने मान्यता दिली तर म्हाडा पुनर्विकास करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. अंतिम निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या स्तरावर संबंधित खात्याची बैठक घेण्याबाबत विनंतीपत्र दिलेले असून लवकरच बैठक घेण्याचे त्यांनी मान्य केल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले.आ. केळकरांचेही सहकार्यपोलिसांच्या मागणीला ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यामुळेही यश आले आहे. केळकर यांनी नियमितपणे पाठपुरावा करु न पोलिसांना हक्काची घरे मिळवून देण्याचा मार्ग मोकळा केल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकारी महिलांनी दिली.

टॅग्स :Policeपोलिसthaneठाणे