शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
7
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
8
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
11
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
12
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
13
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
14
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
15
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
16
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
17
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
18
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
19
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
20
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेसह सात जिल्ह्यातील कांदळवन संवर्धनासाठी अखेर व्यापक अधिकारांची सनियंत्रण समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 19:14 IST

न्यायालयीन निर्णयास अनुसरून ‘खाडी किनाºयांवरील १६०० हक्टरवरील कांदळवन आता पुन्हा बहरणार ’ या मथळ्याखाली लोकमतने १९ सप्टेंबरला वृत्त प्रसिध्द करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. यामध्ये जिल्ह्यातील नवी मुंबई, ठाणे, घोडबंदर, नागलाबंदर, मीराभार्इंदर, भिवंडी, दिवा, कळवा, मुंब्रा आदी ठिकाणच्या खाडी किना-या सुमारे एक हजार ६०८ हेक्टर क्षेत्रावर कांदळवन, खारफूटी आणि तिवरांचे जंगल आदींची सध्या स्थिती उघड करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष केंद्रीत करून आता मुंबई, उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या या सात जिल्ह्यांतील कांदळवन संवर्धनासाठी एकच सनियंत्रण समिती सुमारे पाच दिवसांपूर्वी गठीत केली

ठळक मुद्देमध्यवर्ती तक्रार निवारण कक्ष स्थापन करणे, उपाययोजना सुचिवणे , सीसीटीव्ही पाळावे व निगराणी या समितीने आपला पहिला अनुपालन अहवाल १ डिसेंबर पूर्वी उच्च न्यायालयाला सादर करावयाचा यामुळे खाडीतील कांदळवन नष्ठ करून बेकायदेशीर रेती उत्खनन करणाऱ्या रेती माफियांचे आता धाबे दणाणले

ठाणे : सात जिल्ह्यातील कांदळवन संरक्षण,संवर्धनासाठी आता एकच सनियंत्रण समिती कोकण विभागीय आयुक्त, यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीचे गठीत करण्यात आली. याशिवाय या समितीला व्यापक अधिकार प्राप्त झाले आहेत. यामुळे खाडीतील कांदळवन नष्ठ करून बेकायदेशीर रेती उत्खनन करणाऱ्या रेती माफियांचे आता धाबे दणाणले आहे. तर कांदवळन, खारफूटीचे जंगल खाडी पुन्हा वाढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.न्यायालयीन निर्णयास अनुसरून ‘खाडी किना-यांवरील १६०० हक्टरवरील कांदळवन आता पुन्हा बहरणार ’ या मथळ्याखाली लोकमतने १९ सप्टेंबरला वृत्त प्रसिध्द करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. यामध्ये जिल्ह्यातील नवी मुंबई, ठाणे, घोडबंदर, नागलाबंदर, मीराभार्इंदर, भिवंडी, दिवा, कळवा, मुंब्रा आदी ठिकाणच्या खाडी किना-या सुमारे एक हजार ६०८ हेक्टर क्षेत्रावर कांदळवन, खारफूटी आणि तिवरांचे जंगल आदींची सध्या स्थिती उघड करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष केंद्रीत करून आता मुंबई, उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या या सात जिल्ह्यांतील कांदळवन संवर्धनासाठी एकच सनियंत्रण समिती सुमारे पाच दिवसांपूर्वी गठीत केली आहे.या आधीच्या नवी मुंबई तसेच मुंबई व मुंबई उपनगर यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सनियंत्रण समित्या बरखास्त करून महसूल व वन विभागाने उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांच्या स्वाक्षरीचा शासन निर्णय जारी केला. यामुळे खाडी किना-या लगतच्या या सात जिल्ह्यांतील कांदळवन संवर्धनासाठी एकच सनियंत्रण समिती गठीत झाली आहे. व्यापक अधिकार प्राप्त झालेल्या या समितीमध्ये अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (सह अध्यक्ष), पोलीस आयुक्त मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पोलीस अधीक्षक मुंबई वगळून सर्व जिल्हे, आठ पालिकांचे आयुक्त, ठाणे व कोल्हापूर प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक, एमएमआरडीए, सिडको, म्हाडा, एमआयडीसी, एसआरए, सर्व जिल्हाधिकारी, महाराष्ट्र सागरतटीय क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण, प्रदूषण नियंत्रण मंडळ, उपवनसंरक्षक कांदळवन, नवी मुंबई एन्व्हायर्नमेंट प्रिझर्व्हेशन सोसायटी, वनशक्ती, बॉम्बे एन्व्हायर्नमेंट एक्शन ग्रुप, महाराष्ट्र मच्छीमार कृती संघ, बॉम्बे नैचरल हिस्ट्री आदींच्या प्रतिनिधींचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.** व्यापक अधिकार - या समितीचे कार्य कांदळवन संरक्षण आणि संवर्धनाच्या मर्यादेत परंतु व्यापक स्वरूपाचे अधिकार आहेत. यात मध्यवर्ती तक्रार निवारण कक्ष स्थापन करणे, उपाययोजना सुचिवणे , सीसीटीव्ही पाळावे व निगराणी अशा अनेक बाबींचा समवेश आहे.** समिती अहवाल - या समितीने आपला पहिला अनुपालन अहवाल १ डिसेंबर पूर्वी उच्च न्यायालयाला सादर करावयाचा आहे.

टॅग्स :thaneठाणेKhadiखादी