शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Mira Bhayander : अखेर ६ वर्षांनी प्रसिद्ध झाला मीरा भाईंदर शहराचा प्रारूप सुधारित विकास आराखडा 

By धीरज परब | Updated: October 29, 2022 00:12 IST

Mira Bhayander : प्रसिद्ध होण्याआधीच फुटलेला व वादग्रस्त ठरल्याने रखडलेला मीरा भाईंदर शहराचा प्रारूप सुधारित विकास आराखडा अखेर ६ वर्षांनी म्हणजे शुक्रवार २८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे .

 - धीरज परब

मीरारोड - प्रसिद्ध होण्याआधीच फुटलेला व वादग्रस्त ठरल्याने रखडलेला मीरा भाईंदर शहराचा प्रारूप सुधारित विकास आराखडा अखेर ६ वर्षांनी म्हणजे शुक्रवार २८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे .  त्यावर हरकती - सूचना घ्यायच्या असतील तर ३० दिवसांच्या आत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नगररचना विभागात नागरिकांना जावे लागणार आहे.

१९९७ साली मीरा भाईंदर शहराचा विकास आराखडा अंतिम करण्यात आला होता . त्याची मुदत २० वर्षांची असल्याने २०१६ सालीच ती मुदत संपुष्टात आली होती . महासभेने २०१५ सालात शहराचा सुधारित विकास योजनेचा इरादा जाहीर केला व पालिकेत प्रतिनियुक्ती वर असलेले दिलीप घेवारे यांची नियुक्ती केली होती.

मात्र एका वजनदार राजकीय व्यक्तीच्या माध्यमातून मनमर्जी नुसार विकास आराखडा तयार केला जात असल्यासह काही शेतकरी , जमीन मालकांना त्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकण्याची तंबी देऊन पैश्यांची मागणी केली जाऊ लागली असल्याचे आरोप झाले . विकास आराखडा प्रसिद्ध होण्या आधीच फुटल्याचे बाजारात नकाशा द्वारे चर्चा सुरु झाली . लोकमत ने त्यावेळी विकास आराखडा फुटल्याचे उघडकीस आणल्या नंतर एकच खळबळ उडाली. त्या नंतर काही शेतकरी , जमीन मालकांनी त्यांना सुद्धा आरक्षण टाकण्याचे धमकावल्याच्या तक्रारी केल्या.

२०१८ सालच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रताप सरनाईक यांनी शहरातील एका नेत्यावर बोट ठेवत आरखडा घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केल्या नंतर तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री डॉ . रणजित पाटील यांनी  पालिकेने तयार केलेला तो प्रारूप आराखडा रद्द केला . तसेच ठाणे नगररचना विभागातील सहायक संचालक यांची नियुक्ती अधिकारी म्हणून नियुक्ती केली गेली.

परंतु मध्यंतरी कोरोना मुळे प्रारूप आराखडा रखडला . जेणे करून संबंधित अधिकाऱ्यास वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली  . अखेर शुक्रवारी सहायक संचालक नगररचना , ठाणे यांनी शहराचा प्रारूप विकास आराखडा जाहीर केला आहे .  ह्या प्रारूप आराखड्याचे नकाशे मीरा भाईंदर महापालिका मुख्यालयच्या दुसऱ्या मजल्यावर नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहे .  त्या शिवाय ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नगररचना विभागात व नवी मुंबई, कोकण भवन मधील नगररचना कार्यालयात प्रारूप नकाशे नागरिकांना पाहता येणार आहेत.

परंतु ज्या नागरिकांना हरकती वा सूचना द्यायच्या असतील त्यासाठी मात्र त्यांना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातच जाऊन ३० दिवसांच्या आत लेखी स्वरूपात हरकती वा सूचना द्याव्या लागणार आहेत . त्यामुळे मीरा भाईंदरच्या नागरिकांना ठाणे येथे जाणे जाचक ठरणार आहे . त्यातच डिजिटल युगात ईमेल वरती हरकती व सूचना देण्याची तरतूद सुद्धा शासनाने दिली नसल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे .

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक