शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
4
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
5
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
6
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
7
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
8
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
9
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
10
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
11
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
12
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
13
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
14
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
15
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
16
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
17
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
18
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
19
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
20
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल

ताडी व्यवसायाला अखेरची घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 11:57 PM

सर्वच सत्ताधाऱ्यांनी व्यापारीकरणाचे धोरण राबविल्याने हा व्यवसाय आता उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

- हितेन नाईकपालघर : अल्पभूधारक व बेरोजगार असलेल्या भंडारी समाजाच्या परंपरागत ताडी व्यवसायाला आता अखेरची घरघर लागली आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी ताडी व्यवसाय खुला करून या समाजाच्या उदरनिर्वाहाच्या साधनासह सहकार्याची बीजे घट्ट रोवली होती, परंतु नंतर सर्वच सत्ताधाऱ्यांनी व्यापारीकरणाचे धोरण राबविल्याने हा व्यवसाय आता उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे अन्यायाविरोधात मोर्चे-आमरण उपोषणाद्वारे उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा अध्यक्ष विजय राऊत यांनी दिला आहे.पालघर जिल्ह्यातील डहाणू ते एडवण या भागात राहणाऱ्या भंडारी समाजाचा शेती हा प्रमुख व्यवसाय असला तरी शेतीव्यतिरिक्त खाजरी-माडावरून निघणाऱ्या ताडी विक्रीचा जोडधंदा हा समाज अनेक वर्षांपासून करीत आला आहे. १९६८ सालापासून ताडी व्यवसायाला सुरुवात होत आज सहकारी संस्थांच्या माध्यमातून हा शेतीपूरक व्यवसाय सुरू ठेवला असताना शासनाच्या ताडी विक्री परवान्याबाबतच्या बदलत्या धोरणाचा फटका सहकारी संस्थांना बसून धनदांडग्यांचा शिरकाव या व्यवसायात सुरू झाला आहे. परप्रांतीय व्यावसायिकांना शिरकाव करून देताना शासनाचे बदलते धोरण स्थानिक भंडारी व्यावसायिकांना उद्ध्वस्त करीत आहे. परिणामी, अधिक उत्पन्न मिळविण्याच्या नावाखाली शरीराला पोषक असणाऱ्या या पेयाचे डुप्लिकेशन करून या व्यवसायाला बदनाम करण्याचा प्रयत्न काही परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे आंदाेलनाचा इशारा दिला आहे.या धंद्यापासून भंडारी समाजास सारले जात आहे दूरया धंद्यापासून भंडारी समाज दूर सारला जाऊ लागला असून सहकारी संस्था हळूहळू बंद पडू लागल्या आहेत. पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या ४० संस्थांपैकी सातपाटी, वडराई, माहीम येथील फक्त तीन सहकारी संस्था मागील काही वर्षांपासून तग धरून हा व्यवसाय वाचविण्याचा खटाटोप करीत असल्याचे अध्यक्ष विजय राऊत यांनी ‘लोकमत’ला सांगितले. २०१२ पासून तत्कालीन राज्यमंत्री व विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्यापासून ते विद्यमान पालकमंत्री दादासाहेब भुसे अशा डझनभर मंत्र्यांना आतापर्यंत निवेदने देण्यात आल्यानंतरही भंडारी समाजाच्या समस्या आजही जैसे थे आहेत.