शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
3
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
4
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
5
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
6
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
7
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
8
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
9
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
10
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
11
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
12
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
13
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
14
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
15
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
16
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
17
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
18
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
19
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
20
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या

लढाई विरोधकांशी नव्हे, मित्रपक्षांबरोबर; भाजप कार्यशाळेतील सूर; ताकद वाढल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 08:18 IST

विरोधक कमकुवत झाल्याचाही पुनरुच्चार

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: आपले विरोधक कमकुवत झाल्याने आपली लढाई ही विरोधकांशी नसून, प्रतिस्पर्धी असलेल्या मित्रपक्षांबरोबर असल्याचा सूर ठाण्यात भाजपच्या कार्यशाळेत पदाधिकाऱ्यांनी लावला. ठाण्यासह कोकणपट्ट्यात भाजपचे दीड कोटी सदस्य नोंदणी अभियान राबविले आहे. त्यामुळे या पट्ट्यात भाजपची ताकद मोठी असून, स्वबळाच्या तयारीला लागा, असा अप्रत्यक्ष संदेश बैठकीत नेत्यांनी दिल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

ठाण्यातील रेमंड येथील भाजप कार्यालयात ठाण्यासह कोकणपट्ट्यातील आमदार, जिल्हाध्यक्ष, मंडल अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीला भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक, मंत्री नितेश राणे, माधवी नाईक, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. मागील काही वर्षांत ठाण्यासह कोकणपट्ट्यात भाजपची ताकद वाढली आहे. जिल्हा परिषदेपासून ते लोकसभेपर्यंत भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळू शकते. यापूर्वी मिळालेले यश टिकवून ठेवताना वाढवण्यासाठी काम करा, असा सल्ला चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता आपले कुणी जुळे भाऊ नाही, तर भाजप हाच मोठा भाऊ असल्याचा सूर नेत्यांंनी आळवल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली.  

ठाण्यात भाजपने आधीपासूनच स्वबळाचा नारा दिला आहे. बैठकीत स्थानिकांनी याबाबत भूमिका विशद केली. भाजपच्या वाढत्या संख्याबळाची धास्ती मित्रपक्षांनी अधिक घेतली. 

मित्रपक्षांचा डाव ओळखा

भाजपच्या संख्याबळाला लगाम घालण्यासाठी काही मित्रपक्षांनी अन्य पक्षांतील इच्छुकांच्या पक्षप्रवेशाचा सपाटा लावला आहे.  या आघाडीवर लक्ष देण्याची मागणी स्थानिक नेत्यांनी केली. सर्व पदाधिकाऱ्यांनी भाजपची ताकद कोकणपट्ट्यात वाढल्याचा दावा करीत स्वबळावर लढलेच पाहिजे, असा आग्रह धरला.

‘सरकारची कामे जनतेपर्यंत नेणार’

येत्या ९ तारखेपासून भाजपच्या वतीने ‘संकल्प से सिद्धी तक’ या कार्यक्रमांतून गेल्या ११ वर्षांत केंद्रातील मोदी सरकारने केलेली कामे आणि राज्यात महायुतीच्या माध्यमातून झालेली कामे जनतेपर्यंत नेणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. ठाण्यात रेमंड येथील भाजप कार्यालयात आयोजित कार्यशाळेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या उपक्रमाचा शुभारंभ करतील, असे ते म्हणाले.

भाजपमध्ये संघटनात्मक पद्धतीने काम करण्याची परंपरा आहे, येथे वैयक्तिक मताला किंमत नाही, टीआरपीसाठी बोलणे सोपे असते. आगामी निवडणुका स्वबळावर लढायच्या की, महायुतीत लढायच्या याचा निर्णय महायुतीमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे घेणार आहेत. फडणवीस हे आम्हाला जे सांगतील त्यानुसार आम्ही पुढे काम करू. आम्ही मोठे भाऊ आहोत हे खरे आहे. मात्र येणाऱ्या काळात काय होणार, हे काळच ठरवणार आहे.-रवींद्र चव्हाण, कार्याध्यक्ष, भाजप

टॅग्स :BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस