शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

लढाई विरोधकांशी नव्हे, मित्रपक्षांबरोबर; भाजप कार्यशाळेतील सूर; ताकद वाढल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 08:18 IST

विरोधक कमकुवत झाल्याचाही पुनरुच्चार

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: आपले विरोधक कमकुवत झाल्याने आपली लढाई ही विरोधकांशी नसून, प्रतिस्पर्धी असलेल्या मित्रपक्षांबरोबर असल्याचा सूर ठाण्यात भाजपच्या कार्यशाळेत पदाधिकाऱ्यांनी लावला. ठाण्यासह कोकणपट्ट्यात भाजपचे दीड कोटी सदस्य नोंदणी अभियान राबविले आहे. त्यामुळे या पट्ट्यात भाजपची ताकद मोठी असून, स्वबळाच्या तयारीला लागा, असा अप्रत्यक्ष संदेश बैठकीत नेत्यांनी दिल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

ठाण्यातील रेमंड येथील भाजप कार्यालयात ठाण्यासह कोकणपट्ट्यातील आमदार, जिल्हाध्यक्ष, मंडल अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीला भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक, मंत्री नितेश राणे, माधवी नाईक, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. मागील काही वर्षांत ठाण्यासह कोकणपट्ट्यात भाजपची ताकद वाढली आहे. जिल्हा परिषदेपासून ते लोकसभेपर्यंत भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळू शकते. यापूर्वी मिळालेले यश टिकवून ठेवताना वाढवण्यासाठी काम करा, असा सल्ला चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता आपले कुणी जुळे भाऊ नाही, तर भाजप हाच मोठा भाऊ असल्याचा सूर नेत्यांंनी आळवल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली.  

ठाण्यात भाजपने आधीपासूनच स्वबळाचा नारा दिला आहे. बैठकीत स्थानिकांनी याबाबत भूमिका विशद केली. भाजपच्या वाढत्या संख्याबळाची धास्ती मित्रपक्षांनी अधिक घेतली. 

मित्रपक्षांचा डाव ओळखा

भाजपच्या संख्याबळाला लगाम घालण्यासाठी काही मित्रपक्षांनी अन्य पक्षांतील इच्छुकांच्या पक्षप्रवेशाचा सपाटा लावला आहे.  या आघाडीवर लक्ष देण्याची मागणी स्थानिक नेत्यांनी केली. सर्व पदाधिकाऱ्यांनी भाजपची ताकद कोकणपट्ट्यात वाढल्याचा दावा करीत स्वबळावर लढलेच पाहिजे, असा आग्रह धरला.

‘सरकारची कामे जनतेपर्यंत नेणार’

येत्या ९ तारखेपासून भाजपच्या वतीने ‘संकल्प से सिद्धी तक’ या कार्यक्रमांतून गेल्या ११ वर्षांत केंद्रातील मोदी सरकारने केलेली कामे आणि राज्यात महायुतीच्या माध्यमातून झालेली कामे जनतेपर्यंत नेणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. ठाण्यात रेमंड येथील भाजप कार्यालयात आयोजित कार्यशाळेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या उपक्रमाचा शुभारंभ करतील, असे ते म्हणाले.

भाजपमध्ये संघटनात्मक पद्धतीने काम करण्याची परंपरा आहे, येथे वैयक्तिक मताला किंमत नाही, टीआरपीसाठी बोलणे सोपे असते. आगामी निवडणुका स्वबळावर लढायच्या की, महायुतीत लढायच्या याचा निर्णय महायुतीमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे घेणार आहेत. फडणवीस हे आम्हाला जे सांगतील त्यानुसार आम्ही पुढे काम करू. आम्ही मोठे भाऊ आहोत हे खरे आहे. मात्र येणाऱ्या काळात काय होणार, हे काळच ठरवणार आहे.-रवींद्र चव्हाण, कार्याध्यक्ष, भाजप

टॅग्स :BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस