शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

कमी कर्मचाऱ्यांच्या बळावर कोरोनाशी लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 00:31 IST

ठाण्यातील आरोग्य यंत्रणेची स्थिती : २९६३ नागरिकांमागे एक वैद्यकीय आरोग्य कर्मचारी, ग्रामीण भागात कोरोना रुग्णांचा मृत्युदर नियंत्रणात

सुरेश लोखंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोना महामारीच्या या कालावधीत राज्यातील पहिले कोविड रुग्णालय म्हणून ठाणे सिव्हिल रुग्णालय घोषित झालेले आहे. या रुग्णालयावर जिल्ह्याचा भार पडलेला असतानाही त्यातील उपचारांबाबत आजपर्यंतही नागरिकांच्या तक्रारी नाहीत. तर, मुंबईला जवळ असलेल्या या ठाणे जिल्ह्यातील महापालिका, ग्रामीण, आदिवासी दुर्गम भागांत सध्या अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कोरोना मोठ्या प्रमाणात पसरला आहे. प्रारंभी येथील शहरांच्या ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागांत कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश गावपाडे शहरांना लागून असल्यामुळे तेथील रुग्णांची ग्रामस्थांना लागण झाली आणि आज जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग या रुग्णांच्या उपचारासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. आरोग्य कर्मचारी, परिचारिका, वैद्यकीय अधिकारी आदींच्या कमतरतेचा विचार न करता जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग रुग्णांवरील उपचारांत आघाडीवर आहे.

ठाणे महापालिका, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा-भार्इंदर आणि उल्हासनगर या महानगरांच्या जवळ जिल्हा परिषदेच्या गावखेड्यांचा समावेश आहे. या महानगरांसह मुंबई नगर आणि उपनगरांत सरकारी, निमसरकारी व खाजगी आस्थापनांमध्ये असणारे कर्मचारी स्वस्तात मिळणाºया ग्रामपंचायतींमधील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहेत. या शहरांतील नोकरदारांनी या शेवटच्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या गावपाड्यांमध्ये कोरोनाचा फैलाव केल्याचे दिसून येत आहे. डॉक्टरांची, परिचारिकांची, वॉर्डबॉयची कमी असतानाही जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा कोरोना रुग्णांवर समाधानकारक उपचार करून या महामारीतून मुक्त करण्याचा त्यांचा हा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. शेजारील महापालिकांमधील मृत्युदराच्या तुलनेत ग्रामीण भागाचा मृत्युदरही कमी असून संख्यात्मक मृत्यूही कमी आहेत.

वेतन जास्त मिळत असल्यामुळे डॉक्टर, परिचारिकांनी तीन महिन्यांसाठी कोरोना रुग्णांची सेवा महापालिकांमध्ये करायला घेतल्याचे एका ज्येष्ठ वैद्यकीय अधिकाºयाने लक्षात आणून दिले. यामुळे ग्रामीणच्या १२ लाख ग्रामस्थांना वैद्यकीय सेवा देणाºया आरोग्य यंत्रणेने कोणतीही तक्रार येऊ न देता कोरोना रुग्णांची सेवा हाती घेतली आहे.पालिकेमुळे डॉक्टरांची जिल्हा रुग्णालयाकडे पाठजिल्हा रुग्णालयाकडे भरती होणाºया डॉक्टरला २८ हजार रुपये वेतन निश्चित केलेले आहे. पण, याच कालावधीत महापालिकांनीया कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जाहिरात काढून७० हजार रुपयांपर्यंतच्या वेतनाचे डॉक्टर भरती केले.यामुळे सिव्हिलच्या भरतीकडे डॉक्टरांनी पाठ फिरवलेली आहे. सिव्हिल वैद्यकीय अधिकाºयास६० हजार रुपये देणार, पण या तुलनेत महापालिकांनी ९० हजार रुपयांच्या वेतनावर वैद्यकीय अधिकारी नियुक्त केलेले आहेत.फिजिशियनला दीड लाखापर्यंत वेतन महापालिकांनी दिले. पण, सिव्हिलकडे केवळ ७० हजार मिळणार असल्याने या भरतीकडे डॉक्टरांनी पाठ फिरवून महापालिकांच्या सेवा जवळ केल्या.दोघांचे काम एकाच्या खांद्यावरदोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा एका अधिकाºयाकडून ग्रामीण भागात दिली जात आहे. कर्मचाºयांची संख्या कमी असतानाही कोरोनासह अन्य आजारांच्या रुग्णांसाठी यंत्रणेची कसोटी लागत आहे.ठाणे जिल्ह्यातील भौगोलिक क्षेत्र पाहता नागरी, सागरी आणि डोंगरी भागांत जिल्हा विस्तारला आहे. त्यातील लोकसंख्या व स्थानिक गरज वेगवेगळी आहे. जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. गरजूंना आवश्यक त्या सर्व आरोग्य सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्याच्या लोकसंख्येला लक्षात घेऊन जिल्ह्यात १० प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ५७ उपकेंद्रांचा बृहद्आराखडा शासनाकडे एक वर्षापासून मंजुरीस पाठवला आहे. दहा वर्षांनंतरची लोकसंख्या लक्षात घेऊन हा आरोग्य यंत्रणेच्या दृष्टीने बृहद्आराखडा पाठवलेला आहे. याला मंजुरी मिळाल्यास आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम होण्यास मदत होईल.- डॉ. मनीष रेघेजिल्हा आरोग्य अधिकारीजिल्हा परिषद, ठाणे

टॅग्स :hospitalहॉस्पिटल