शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्य्रात कार्य विरुद्ध करिष्मा यांच्यात रंगणार लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 00:47 IST

- अजित मांडके ठाणे : मुंब्रा-कळवा मतदारसंघातून राष्टÑवादीचे जितेंद्र आव्हाड हे सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांची लढत शिवसेनेच्या ...

- अजित मांडकेठाणे : मुंब्रा-कळवा मतदारसंघातून राष्टÑवादीचे जितेंद्र आव्हाड हे सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांची लढत शिवसेनेच्या महिला उमेदवार दीपाली सय्यद यांच्याशी होणार आहे. या मतदारसंघात शिवसेनेत अनेक इच्छुक असतानाही श्रेष्ठींनी अचानकपणे दीपाली यांना उमेदवारी देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. परंतु, स्थानिक शिवसैनिकांच्या हे अद्यापही पचनी पडलेले नाही. केवळ एक अभिनेत्री म्हणूनच त्यांची ओळख असली तरी, मतदारांमध्ये त्यांची किती छाप पडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आव्हाडांना मागील निवडणुकीतही घेरण्यासाठी शिवसेनेकडून व्यूहरचना आखण्यात आली होती. परंतु, तरीसुद्धा त्यांना सर्वाधिक मते मिळाली होती. आता तर समाजवादी, एमआयएम आणि वंचित आघाडी निवडणुकीत नसल्याने राष्टÑवादी विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आव्हाड यांचा कामावर, तर सेनेचा उमेदवाराच्या करिष्म्यावर भर आहे. दीपाली यांना शिवसेनेने अचानक उमेदवारी दिल्यामुळे पक्षातील अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.जमेच्या बाजूजितेंद्र आव्हाड हे सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असून मागील १० वर्षे विकासकामे ही त्यांच्यासाठी जमेची बाजू मानली जात आहे. कळवा स्टेशन, मुंब्रा स्टेशन आदींसह येथील प्रत्येक रस्ता, छोट्यामोठ्या गल्ल्या या सिमेंट काँक्रिटचे केल्या आहेत. सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणारे आमदार म्हणूनही त्यांची ओळख आहे. दांडगा जनसंपर्क, जनतादरबार घेऊन घराघरांत पोहोचलेले म्हणून त्यांची ओळख आहे.एक मराठी सिनेअभिनेत्री म्हणून दीपाली यांची ओळख आहे. शिवाय, मुंब्य्रातील मते मिळविण्यासाठी सय्यद हे आडनाव त्यांना फायदेशीर ठरू शकणार आहे. तर, दीपाली हे नाव कळव्यात चालू शकणार आहे. दीपाली यांनी महिला सक्षमीकरणाची अनेक कामे केली असून अहमदनगर, कोल्हापूर येथे सामाजिक कार्यामध्ये त्या सक्रिय राहिल्या आहेत. मातोश्रीच्या पसंतीच्या उमेदवार ही जमेची बाजू मानावी लागणार आहे.उणे बाजू

राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक दिग्गज नेते बाहेर पडल्यामुळे सध्या पक्ष कठीण अवस्थेतून जात आहे. काँग्रेसची परिस्थिती अधिकच बिकट असल्याने मित्रपक्षाची साथ लाभणार नाही. अशा आव्हानात्मक परिस्थितीत ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची पताका फडकवत ठेवण्याचे दडपण त्यांच्यावर असणार आहे. आक्रमकता आणि संयम यांचा समतोल सांभाळताना त्यांना तारेवरील कसरत करावी लागेल.दीपाली सय्यद अभिनेत्री असल्या तरी त्या बाहेरील उमेदवार असल्याने स्थानिक त्यांना आपलेसे करतील का, हा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. स्थानिक शिवसैनिकांची आणि इच्छुकांची नाराजी दूर करण्यात सेना नेतृत्व अपयशी ठरले आहे. शिवाय, मुंब्रा-कळव्याची थोडीही माहिती त्यांच्याकडे नाही, एका रात्रीत त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नवीन चेहरा हा सुद्धा त्यांच्यासाठी मायनस पॉइंट मानला जात आहे.

टॅग्स :mumbra-kalwa-acमुंब्रा कळवाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019