शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

कारवाईच्या निषेधार्थ फेरीवाल्यांचा मोर्चा, 250 फेरीवाल्यांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 04:22 IST

सतत २५ दिवस हटवले : हप्तेखोरीकरिता बडगा उगारल्याचा आरोप

भार्इंदर : मीरारोड येथील विजयपार्क, सिल्वरपार्क व ओम शांती चौकात गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे यांनी गेल्या २५ दिवसांपासून सतत कारवाई सुरू ठेवल्याच्या निषेधार्थ जनवादी हॉकर्स सभेच्या नेतृत्वाखाली सोमवारी फेरीवाल्यांनी पालिकेवर मोर्चा काढला.

विजयपार्क, सिल्वरपार्क व ओम शांती चौक परिसरात सुमारे २५० फेरीवाले गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसाय करीत आहेत. फेरीवाल्यांचा व्यवसाय बेकायदेशीर असला तरी त्यांच्याकडून हप्ते गोळा करुन त्यांना बसवू देण्यात येत असल्याने फेरीवाल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून फेरीवाल्याचा व्यवसाय करणाºयांचे पुनर्वसन होणे अपेक्षित होते. फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. त्यामुळे काही लोकप्रतिनिधी व अधिकाºयांचे हात ओले करुन हा व्यवसाय केला जात असल्याचा आरोप जनवादी हॉकर्स सभेचे मीरा-भार्इंदर अध्यक्ष अ‍ॅड. किशोर सामंत यांनी केला. फेरीवाल्यांकडे हप्ता वाढवण्याची मागणी अनेकदा केली जाते. ती पूर्ण न झाल्यास भ्रष्ट अधिकारी कारवाईचा बडगा उगारत असल्याचा आरोपही त्यांनी केला. फेरीवाल्यांवरील कारवाई थांबवावी, त्यांचे परिसरातील जागेत पुनर्वसन करा, अशी मागणी करण्यात आली. फेरीवाल्यांवरील कारवाई व पुर्नवसनाची जबाबदारी शहर फेरीवाला समितीची असताना अधिकारी परस्पर कारवाई करुन फेरीवाला कायद्याचे उल्लंघन करीत असल्याचा दावा त्यांनी केला. 

टॅग्स :thaneठाणेMira Bhayanderमीरा-भाईंदर