शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

कारवाईच्या निषेधार्थ फेरीवाल्यांचा मोर्चा, 250 फेरीवाल्यांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 04:22 IST

सतत २५ दिवस हटवले : हप्तेखोरीकरिता बडगा उगारल्याचा आरोप

भार्इंदर : मीरारोड येथील विजयपार्क, सिल्वरपार्क व ओम शांती चौकात गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे यांनी गेल्या २५ दिवसांपासून सतत कारवाई सुरू ठेवल्याच्या निषेधार्थ जनवादी हॉकर्स सभेच्या नेतृत्वाखाली सोमवारी फेरीवाल्यांनी पालिकेवर मोर्चा काढला.

विजयपार्क, सिल्वरपार्क व ओम शांती चौक परिसरात सुमारे २५० फेरीवाले गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसाय करीत आहेत. फेरीवाल्यांचा व्यवसाय बेकायदेशीर असला तरी त्यांच्याकडून हप्ते गोळा करुन त्यांना बसवू देण्यात येत असल्याने फेरीवाल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून फेरीवाल्याचा व्यवसाय करणाºयांचे पुनर्वसन होणे अपेक्षित होते. फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. त्यामुळे काही लोकप्रतिनिधी व अधिकाºयांचे हात ओले करुन हा व्यवसाय केला जात असल्याचा आरोप जनवादी हॉकर्स सभेचे मीरा-भार्इंदर अध्यक्ष अ‍ॅड. किशोर सामंत यांनी केला. फेरीवाल्यांकडे हप्ता वाढवण्याची मागणी अनेकदा केली जाते. ती पूर्ण न झाल्यास भ्रष्ट अधिकारी कारवाईचा बडगा उगारत असल्याचा आरोपही त्यांनी केला. फेरीवाल्यांवरील कारवाई थांबवावी, त्यांचे परिसरातील जागेत पुनर्वसन करा, अशी मागणी करण्यात आली. फेरीवाल्यांवरील कारवाई व पुर्नवसनाची जबाबदारी शहर फेरीवाला समितीची असताना अधिकारी परस्पर कारवाई करुन फेरीवाला कायद्याचे उल्लंघन करीत असल्याचा दावा त्यांनी केला. 

टॅग्स :thaneठाणेMira Bhayanderमीरा-भाईंदर