शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

...भय इथले संपत नाही!, कल्याणमधील स्कायवॉकची दुर्दशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 05:30 IST

कल्याणमधील स्कायवॉकची दुर्दशा : अडथळे पार करताना जीव टांगणीला

कल्याण : रेलिंग तुटलेल्या कल्याणच्या स्कायवॉकवरून पडून बबलू तलर हा दृष्टिहीन पादचारी गंभीर जखमी झाल्याची घटना मे महिन्यात घडली होती. मात्र, त्यानंतरही तुटलेले रेलिंग, गायब झालेले संरक्षक बार आणि तुटलेल्या लाद्या बसवण्यासाठी केडीएमसीला मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे स्कायवॉकवर अपघाताचा धोका कायम आहे.

रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि वाहतूककोंडी यातून सुटका करण्यासाठी २०१०-११ मध्ये पश्चिमेत स्कायवॉक उभारण्यात आला. एमएमआरडीएने बांधलेल्या स्कायवॉकची जबाबदारी सध्या केडीएमसीवर आहे. स्कायवॉक रेल्वेच्या पुलाला जोडून असल्याने मोठ्या संख्येने प्रवासी त्याचा वापर करतात. या स्कायवॉकमुळे फेरीवाल्यांचा त्रास वाचेल, तसेच कोंडीतून मुक्तता होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, फेरीवाल्यांनीच स्कायवॉकवर ठाण मांडल्याने पादचाऱ्यांची अपेक्षा फोल ठरली आहे. याला सर्वस्वी केडीएमसी कारणीभूत असली तरी काहीअंशी फेरीवाल्यांकडून वस्तू खरेदी करणारे नागरिकही या परिस्थितीला जबाबदार आहेत. फेरीवाल्यांच्या कचºयामुळे याठिकाणी आगीच्या घटनाही वारंवार घडल्या आहेत.फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाबरोबरच भिकारी, गर्दुल्ल्यांच्या उपद्रवामुळे प्रवाशांना रात्री उशिरा जीव मुठीत धरून येजा करावी लागते. फेरीवाले, भिकारी आणि गर्दुल्ले यांच्यामुळे स्कायवॉकला बकाल स्वरूप आले आहे. केडीएमसीकडून स्वच्छतेचे धडे दिले जातात. मात्र, स्वत:च्या स्कायवॉकवर जमा होणाºया कचºयाची कधी गंभीर दखल घेणार, असा सवालही नागरिक करत आहेत. स्कायवॉक परिसरात वारांगनांचाही वावर असतो. मात्र, स्थानिक महात्मा फुले चौक पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.स्कायवॉकवरील संरक्षक बार व रेलिंग तुटलेल्या अवस्थेत आहेत. मे महिन्यात अपघात घडूनही केडीएमसीला घटनेचे गांभीर्य नसल्याचे सद्य:स्थिती पाहता स्पष्ट होते. स्कायवॉकच्या जिन्याचा भाग ओबडधोबड झाल्याने पाय घसरून अथवा तोल जाऊन गंभीर दुखापत होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. येथील तुटलेल्या लाद्यांमुळेही काही पादचारी जखमी झाल्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे ‘स्कायवॉकवरून चालताय, पण जीव सांभाळून’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.निविदेचे काय झाले?च्मे महिन्यातील घटनेनंतर स्कायवॉकच्या दुरुस्तीचे काम केले जाणार होते. याबाबतच्या प्रस्तावाला आयुक्त गोविंद बोडके यांनी मान्यता दिल्याची तसेच दुरुस्ती कामाची निविदा काढल्याची माहिती तत्कालीन शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी दिली होती.च्परंतु, अजूनही या कामाला मुहूर्त मिळाला नसल्याने अपघाताचा धोका कायम आहे. यासंदर्भात बोडके यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याण