शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

कोरोनाच्या धास्तीमुळे मलेरियाचीही ‘हुडहुडी’ , रुग्ण आढळल्यास संपर्कातील व्यक्तींची रक्तचाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 06:50 IST

Thane : महाराष्ट्र हे हिवताप रोगप्रवण असून, हा आजार जीवघेणा असल्याने त्याचा कधीही उद्रेेक होऊ शकतो, अशी आरोग्य विभागास खात्री आहे.

- नारायण जाधव 

ठाणे : दुधाने तोंड भाजल्यास ताकही फुंकून पितात, असे म्हणतात. यामुळेच की काय, आता कोविड महामारीच्या संकटास तोंड देणाऱ्या महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने मलेरियासाठी नवा महाराष्ट्र साथरोग हिवताप विनियम २०२१ प्रसिद्ध केला आहे. 

नव्या कायद्यानुसार मलेरिया रुग्ण आढळल्यास त्याची तत्काळ संबंधित जिल्हा प्रशासन किंवा महापालिकेच्या आरोग्य खात्यास माहिती द्यावी, ती मिळताच संबंधित रुग्णासह त्याच्या संपर्कातील व्यक्तींची रक्तचाचणी करून तो राहतो त्या इमारतीसह ४०० मीटर परिसरात धूरफवारणी करावी, जे खासगी दवाखाने, रुग्णालये, वैद्यकीय व्यावसायिक किंवा रुग्ण माहिती देण्यास टाळाटाळ करतील, त्यांच्यावर भारतीय दंडसंहिता १८६०च्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र हे हिवताप रोगप्रवण असून, हा आजार जीवघेणा असल्याने त्याचा कधीही उद्रेेक होऊ शकतो, अशी आरोग्य विभागास खात्री आहे. त्यामुळे ही संभाव्य साथ टाळण्यासाठी मलेरियाविषयीच्या आधीच्या सर्व सूचना, आदेश, अधिसूचना रद्द करून हा नवा कायदा २१ डिसेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध केला आहे.

नव्या कायद्यानुसार मलेरियास अटकाव घालण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिकांंचे आयुक्त यांनी तत्काळ हिवताप नियंत्रक अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती करायची आहे. संक्रमित वसाहती, गावे यांची यादी प्रसिद्ध करून उपाययोजना करायच्या आहेत. गावे एखाद्या जिल्ह्याच्या सीमेवर असतील तर दुसऱ्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना ती यादी देऊन संंक्रमण राेखायचे आहे. 

जिथे हिवतापाचा रुग्ण आढळेल, त्याच्या इमारतीच्या मालकाने याची माहिती आरोग्य अधिकाऱ्याला द्यायची आहे, जेणेकरून संबंधित रुग्ण व त्याच्या संपर्कातील व्यक्तींची रक्तचाचणी करून त्यांच्यावर उपचार करणे सोपे होईल. संक्रमित क्षेत्रास भेट देणाऱ्या कामगारांसह नेहमी भेट देणाऱ्यांची रक्तचाचणी करण्यात येणार आहे. शिवाय रस्ते, इमारती, शासकीय प्रकल्पांच्या बांधकाम साईटवर संबंधित ठेकेदार, अधिकाऱ्यांनी योग्य काळजी घ्यायची आहे. 

या व्यक्तींसह खासगी इमारतींचे मालक, भोगवटादारांनी डासांची पैदास होईल, असे पाणी जमा होणार नाही, स्वच्छता राखणे, तुटके टायर, बाटल्या, भांड्यांची विल्हेवाट लावण्यास सांगितले आहे. दरम्यान, ओमायक्रॉनचे रूग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा चिंतेत आहे. तर दुसऱ्या बाजूला मलेरियाचा फैलाव होत असल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे.

पाणी साचणार नाही याची खात्री करामहापालिका, रेल्वे, दूरसंचार कंपन्या, बांधकाम ठेकेदार यांनी केलेल्या खोदकामाच्या ठिकाणी पाणी जमा होणार नाही, याची खात्री करावी, हे खड्डे, चर याची जोडणी नैसर्गिक गटारांशी कराव्यात. जलवाहिन्यांशी त्यांचा संंपर्क येणार नाही, याबाबत काळजी घ्यावी, यात कसूर केल्यास कारवाई करण्यात येईल, असे बजावले आहे.

- संभाव्य साथ टाळण्यासाठी मलेरियाविषयीच्या आधीच्या सर्व सूचना, आदेश, अधिसूचना रद्द करून हा नवा कायदा २१ डिसेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध केला आहे. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका