शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

राज्य सरकारच्या निर्णयावर विषय समित्यांचे भवितव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 01:15 IST

याबाबतचा निर्णय लवकर अपेक्षित आहे. अन्यथा फेरनिवडणूक घ्यावी लागेल, असे जाणकारांचे मत आहे.

प्रशांत माने कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन, शिक्षण आणि प्रभाग समितीच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. २७ गावे वगळणार की कायम राहणार, या निर्णयावर या समित्यांचे भवितव्य राहणार आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय लवकर अपेक्षित आहे. अन्यथा फेरनिवडणूक घ्यावी लागेल, असे जाणकारांचे मत आहे. केडीएमसीत समावेश केलेली २७ गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करायची की ती महापालिकेत कायम ठेवायची, याबाबतचा निर्णय राज्य सरकारच्या दरबारी प्रलंबित आहे.सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि स्थानिक आमदार प्रमोद पाटील यांची भूमिका गावे महापालिकेतून वगळण्याबाबत ठाम राहिली असताना गावांमधील नगरसेवकांनी गावे वगळण्यास नकार दिला आहे. मात्र, विरोध करणाऱ्या नगरसेवकांमध्ये फूट पडत असल्याचे आजदे गावात पार पडलेल्या सभेतून दिसून आले. केडीएमसीची निवडणूक आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. २७ गावांबाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो सहा महिने आधी म्हणजेच एप्रिलपर्यंत घेता येणार आहे. महापालिकेतील परिवहन सभापती, शिक्षण समिती आणि प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक अनुक्रमे मार्च, एप्रिलमध्ये होणार आहेत. आय आणि ई प्रभाग हे २७ गावांंचे प्रभाग आहेत तर परिवहन आणि शिक्षण समितीवरही २७ गावांमधील सदस्य आणि नगरसेवक आहेत. परिवहन सभापती आणि शिक्षण समिती सदस्य तसेच सभापतीपदासाठी अन्य सदस्यांबरोबर २७ गावांमधील सदस्यही इच्छुक आहेत. परिवहन सभापतीपदासाठी मार्चमध्ये निवडणूक होणार आहे. त्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांना महापालिकेच्या सचिव कार्यालयाकडून पत्रही पाठवण्यात आले आहे.परिवहन समिती सभापतीपदी २७ गावांमधील सदस्य निवडून आला आणि २७ गावे वगळण्याचा निर्णय झाला तर संबंधित सदस्य समितीमधून बाद होतील आणि त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड करून पुन्हा नव्याने सभापतीपदाची निवडणूक घ्यावी लागणार आहे. शिक्षण समितीतीलही २७ गावांमधील सदस्य बाद होऊन त्यांच्या जागी नवीन सदस्य नेमावे लागतील तर ‘आय’ आणि ‘ई’ हे दोन्ही प्रभाग महापालिकेतूनबाद होतील.>सरकारने लवकर भूमिका घेण्याची संघर्ष समितीची मागणीसर्वपक्षीय संघर्ष समितीने २७ गावांमध्ये चौकसभा घेऊन आपला लढा तीव्र केला आहे. सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी या सभांमध्ये केली जात आहे. आता सरकारच्या निर्णयावर गावांचे त्याचबरोबर महापालिकेतील समित्यांचेही भवितव्य अवलंबून राहणार आहे. त्यामुळे सरकारने त्वरित भूमिका स्पष्ट करावी, असे मत व्यक्त होत आहे.