शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
3
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
4
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
5
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
6
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
7
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
8
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
9
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
10
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
11
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
12
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
13
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
14
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
15
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
16
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
17
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
18
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
19
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
20
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?

राज्य सरकारच्या निर्णयावर विषय समित्यांचे भवितव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 01:15 IST

याबाबतचा निर्णय लवकर अपेक्षित आहे. अन्यथा फेरनिवडणूक घ्यावी लागेल, असे जाणकारांचे मत आहे.

प्रशांत माने कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन, शिक्षण आणि प्रभाग समितीच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. २७ गावे वगळणार की कायम राहणार, या निर्णयावर या समित्यांचे भवितव्य राहणार आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय लवकर अपेक्षित आहे. अन्यथा फेरनिवडणूक घ्यावी लागेल, असे जाणकारांचे मत आहे. केडीएमसीत समावेश केलेली २७ गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करायची की ती महापालिकेत कायम ठेवायची, याबाबतचा निर्णय राज्य सरकारच्या दरबारी प्रलंबित आहे.सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि स्थानिक आमदार प्रमोद पाटील यांची भूमिका गावे महापालिकेतून वगळण्याबाबत ठाम राहिली असताना गावांमधील नगरसेवकांनी गावे वगळण्यास नकार दिला आहे. मात्र, विरोध करणाऱ्या नगरसेवकांमध्ये फूट पडत असल्याचे आजदे गावात पार पडलेल्या सभेतून दिसून आले. केडीएमसीची निवडणूक आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. २७ गावांबाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो सहा महिने आधी म्हणजेच एप्रिलपर्यंत घेता येणार आहे. महापालिकेतील परिवहन सभापती, शिक्षण समिती आणि प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक अनुक्रमे मार्च, एप्रिलमध्ये होणार आहेत. आय आणि ई प्रभाग हे २७ गावांंचे प्रभाग आहेत तर परिवहन आणि शिक्षण समितीवरही २७ गावांमधील सदस्य आणि नगरसेवक आहेत. परिवहन सभापती आणि शिक्षण समिती सदस्य तसेच सभापतीपदासाठी अन्य सदस्यांबरोबर २७ गावांमधील सदस्यही इच्छुक आहेत. परिवहन सभापतीपदासाठी मार्चमध्ये निवडणूक होणार आहे. त्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांना महापालिकेच्या सचिव कार्यालयाकडून पत्रही पाठवण्यात आले आहे.परिवहन समिती सभापतीपदी २७ गावांमधील सदस्य निवडून आला आणि २७ गावे वगळण्याचा निर्णय झाला तर संबंधित सदस्य समितीमधून बाद होतील आणि त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड करून पुन्हा नव्याने सभापतीपदाची निवडणूक घ्यावी लागणार आहे. शिक्षण समितीतीलही २७ गावांमधील सदस्य बाद होऊन त्यांच्या जागी नवीन सदस्य नेमावे लागतील तर ‘आय’ आणि ‘ई’ हे दोन्ही प्रभाग महापालिकेतूनबाद होतील.>सरकारने लवकर भूमिका घेण्याची संघर्ष समितीची मागणीसर्वपक्षीय संघर्ष समितीने २७ गावांमध्ये चौकसभा घेऊन आपला लढा तीव्र केला आहे. सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी या सभांमध्ये केली जात आहे. आता सरकारच्या निर्णयावर गावांचे त्याचबरोबर महापालिकेतील समित्यांचेही भवितव्य अवलंबून राहणार आहे. त्यामुळे सरकारने त्वरित भूमिका स्पष्ट करावी, असे मत व्यक्त होत आहे.