शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

 ठाणे जिल्ह्यातील ग्राम पंचायतींच्या ९२८ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात फीट; सोमवारी मत मोजणी 

By सुरेश लोखंडे | Updated: November 5, 2023 19:26 IST

जिल्ह्यातील ६२ ग्राम पंचायतींच्या निवडणुकीमध्ये ९२८ जणांनी नशिब अजमावले आहे.

ठाणे: जिल्ह्यातील ६२ ग्राम पंचायतींच्या निवडणुकीमध्ये ९२८ जणांनी नशिब अजमावले आहे. जिल्ह्याभरातील या ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक व पाेटनिवडणुकीसाठी एक लाख एक हजार २३२ मतदानापैकी साडेतीन वाजेपर्यंत ६२.५४ टक्के म्हणजे ५८ हजार ७३३ मतदान झाले. साडेपाच वाजेपर्यंतच्या मतदानाच्या माहितीला विलंब हाेणार असल्यामुळे दरम्यान ७५ ते ८० टक्के मतदान झाल्याचा आंदाज तहसीलदार संजय भाेसले यांनी व्यक्त केला. आज शांततेत झालेल्या या मतदानाची ६ नाेव्हेंबरला त्या त्या तहसीलदार कार्यालयात मतमाेजणी हाेणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील सार्वत्रिक ४८ ग्राम पंचायतींच्या ३८९ जागांवरील ८५४ उमेदवारांना १८३ मतदान केंद्रांवर मतदान झाले. या ग्राम पंचायतींच्या ९३ हजार ९०४ मतदारांपैकी साडेतीन वाजेपर्यंत ५८ हजार ७३३ मतदारांनी (६२.५४ टक्के) मतदानाचा हक्के बजावला. यामध्ये २७ हजार ८३९ महिलांचा समावेश आहे. तर पाेटनिवडणुकीच्या १४ ग्राम पंचायतींच्या सात हजार ३२८ मतदारांपैकी चार हजार ४३६ (६०.५३ टक्के) जणांनी मतदान केले आहे. जिल्ह्याभरातील २०० मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रीया आज शांततेत पार पडली.

सार्वत्रिक निवडणुकीच्या ६१ पैकी १२ ग्राम पंचायती आधीच बिनविरोध विजयी झालेल्या आहेत. तर शहापूरच्या एका ग्राम पंचायतीसाठी एकही उमेदवारी दाखल झालेली नाही. याशिवाय पाेटनिवडणूक असलेल्या ६० पैकी ३१ ग्राम पंचायतींच्या पोटनिवडणुका ह्या बिनविरोध झाल्या आहेत. तर सातच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले नाही. त्यामुळे येथे निवडणूक प्रक्रीया पार पडणार नसल्याचे उघड झाले. सार्वत्रिक व पोटनिवडणूक आदी मिळून ६२ ग्राम पंचायतींच्या कार्यक्षेत्रात रविवारी शांततेत मतदान झाले आहे.

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूक