शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोमुळे घोडबंदर पट्यातील चार पादचारी पुलांचे भवितव्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 16:10 IST

एमएमआरडीएने ठाणे महापालिकेला पाठविलेल्या पत्रामुळे घोडबंदरच्या प्रस्तावित चार पादचारी पुलांचे भवितव्य धोक्यात आले आहे. जो पर्यंत मेट्रोचा आराखडा तयार होत नाही, तो पर्यंत या पुलांचे काम सुरु न करण्याच्या सुचना त्यांनी पालिकेला केल्या आहेत.

ठळक मुद्देदोन पादचारी पुलांचे काम पूर्णचार पुलांसाठी केला जाणार २० कोटींचा खर्च

ठाणे - घोडबंदर रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी येथील नागरीकांनी वारंवार पादचारी पुलांची मागणी लावून धरली आहे. त्यानुसार काही पादचारी पुल तयार झाले असून काही प्रस्तावित करण्यात आले आहेत. परंतु आता जोपर्यंत मेट्रोचा आराखडा येत नाही, तो पर्यंत या प्रस्तावित पादचारी पुलांचे काम थांबविण्याच्या सुचना एमएमआरडीएने ठाणे महापालिकेला दिल्या असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता प्रस्तावित चार पादचारी पुलांचे भवितव्य यामुळे धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.                           नवीन ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर पट्यात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती तयार झाली असून जवळपास ५ लाख नागरीकांचे वास्तव्य या ठिकाणी आहे. घोडबंदर रोड हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने या रोडवरून वेगाने वाहने येत असतात. यामध्ये मोठ्या आणि अवजड वाहनांचा देखील समावेश आहे. नोकरीला जाणारे, शाळकरी मुले, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना अतिशय मोठा असलेला हा घोडबंदर रोड आपला जीव धोक्यात घालून ओलांडावा लागतो. रस्ता ओलांडताना यापूर्वी या रोडवर अपघात देखील झाले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी या रोडवर पादचारी पूल बांधण्याची मागणी ठाण्यातील दक्ष नागरिक आणि ठाणेकरांनी केली होती. त्यानुसार महापालकेच्या वतीने घोडबंदर पट्ट्यात पादचारी पुलाची कामे सुरु करण्यात आली आहे. आर मॉल आणि तत्वज्ञान विद्यापीठ येथील पादचारी पुलाचे काम पूर्ण करण्यात आले असून तो पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात आला आहे. तर कासारवडवली येथील प्रस्तावित असलेल्या पादचारी पुलाचे ठिकाण बदलण्यात आले असून हा पादचारी पूल आता सुरज पंचामृत ( सुरज वोटर पार्क ) येथे बांधण्यात येणार आहे. सध्या या ठिकाणी केबल हलवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.दोन पादचारी पुलांची कामे पूर्ण झाली असली तरी, आणखी चार पादचारी पूल प्रस्तावित करण्यात आले असून या पुलाचे काम देखील लवकरच सुरु करण्यात येणार होते. यामध्ये आनंदनगर, मूच्छाला कॉलेज, भार्इंदर पाडा तसेच ओवळा अशा चार ठिकाणी पादचारी पुल प्रस्तावित करण्यात आले आहेत. या कामासाठी २० कोटींचा निधी प्रास्तवित करण्यात आला आहे. मात्र आता या पुलाच्या कामाला एमएमआरडीएनेच ब्रेक लावला असून या चारही पादचारी पुलाच्या कामाची प्रक्रि या काही काळ थांबवावी असे एमएमआरडीएने ठाणे महापालिकेला पत्र पाठविले आहे. भविष्यात या या मार्गावरून जाणाऱ्या मेट्रोचा चौथा टप्प्याला हे पादचारी पूल अडथळा ठरू शकतात. मेट्रोच्या आराखडा तयार करण्याचे काम देखील सुरु असून त्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मेट्रोचा आराखडा तयार होत नाही तोपर्यंत महापालिकेला हे काम थांबवावे लागणार आहे. या उड्डाणपुलाच्या कामाला अद्याप सुरु वात करण्यात आली नसून निविदा प्रक्रिया देखील झालेली नाही. एमएमआरडीएकडून नुकतेच पत्र प्राप्त झाले असून पुढील सूचना मिळेपर्यंत काम कामाची प्रक्रि या थांबवावी लागणार आहे अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. परंतु मेट्रोचा आराखडा आला आणि त्यात हे पुल नकोच असा उल्लेख झाला तर मात्र या पुलांचे भवितव्य अधांतरी राहणार असल्याचेही आता बोलले जात आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाmmrdaएमएमआरडीए