शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

मेट्रोमुळे घोडबंदर पट्यातील चार पादचारी पुलांचे भवितव्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 16:10 IST

एमएमआरडीएने ठाणे महापालिकेला पाठविलेल्या पत्रामुळे घोडबंदरच्या प्रस्तावित चार पादचारी पुलांचे भवितव्य धोक्यात आले आहे. जो पर्यंत मेट्रोचा आराखडा तयार होत नाही, तो पर्यंत या पुलांचे काम सुरु न करण्याच्या सुचना त्यांनी पालिकेला केल्या आहेत.

ठळक मुद्देदोन पादचारी पुलांचे काम पूर्णचार पुलांसाठी केला जाणार २० कोटींचा खर्च

ठाणे - घोडबंदर रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी येथील नागरीकांनी वारंवार पादचारी पुलांची मागणी लावून धरली आहे. त्यानुसार काही पादचारी पुल तयार झाले असून काही प्रस्तावित करण्यात आले आहेत. परंतु आता जोपर्यंत मेट्रोचा आराखडा येत नाही, तो पर्यंत या प्रस्तावित पादचारी पुलांचे काम थांबविण्याच्या सुचना एमएमआरडीएने ठाणे महापालिकेला दिल्या असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता प्रस्तावित चार पादचारी पुलांचे भवितव्य यामुळे धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.                           नवीन ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर पट्यात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती तयार झाली असून जवळपास ५ लाख नागरीकांचे वास्तव्य या ठिकाणी आहे. घोडबंदर रोड हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने या रोडवरून वेगाने वाहने येत असतात. यामध्ये मोठ्या आणि अवजड वाहनांचा देखील समावेश आहे. नोकरीला जाणारे, शाळकरी मुले, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना अतिशय मोठा असलेला हा घोडबंदर रोड आपला जीव धोक्यात घालून ओलांडावा लागतो. रस्ता ओलांडताना यापूर्वी या रोडवर अपघात देखील झाले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी या रोडवर पादचारी पूल बांधण्याची मागणी ठाण्यातील दक्ष नागरिक आणि ठाणेकरांनी केली होती. त्यानुसार महापालकेच्या वतीने घोडबंदर पट्ट्यात पादचारी पुलाची कामे सुरु करण्यात आली आहे. आर मॉल आणि तत्वज्ञान विद्यापीठ येथील पादचारी पुलाचे काम पूर्ण करण्यात आले असून तो पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात आला आहे. तर कासारवडवली येथील प्रस्तावित असलेल्या पादचारी पुलाचे ठिकाण बदलण्यात आले असून हा पादचारी पूल आता सुरज पंचामृत ( सुरज वोटर पार्क ) येथे बांधण्यात येणार आहे. सध्या या ठिकाणी केबल हलवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.दोन पादचारी पुलांची कामे पूर्ण झाली असली तरी, आणखी चार पादचारी पूल प्रस्तावित करण्यात आले असून या पुलाचे काम देखील लवकरच सुरु करण्यात येणार होते. यामध्ये आनंदनगर, मूच्छाला कॉलेज, भार्इंदर पाडा तसेच ओवळा अशा चार ठिकाणी पादचारी पुल प्रस्तावित करण्यात आले आहेत. या कामासाठी २० कोटींचा निधी प्रास्तवित करण्यात आला आहे. मात्र आता या पुलाच्या कामाला एमएमआरडीएनेच ब्रेक लावला असून या चारही पादचारी पुलाच्या कामाची प्रक्रि या काही काळ थांबवावी असे एमएमआरडीएने ठाणे महापालिकेला पत्र पाठविले आहे. भविष्यात या या मार्गावरून जाणाऱ्या मेट्रोचा चौथा टप्प्याला हे पादचारी पूल अडथळा ठरू शकतात. मेट्रोच्या आराखडा तयार करण्याचे काम देखील सुरु असून त्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मेट्रोचा आराखडा तयार होत नाही तोपर्यंत महापालिकेला हे काम थांबवावे लागणार आहे. या उड्डाणपुलाच्या कामाला अद्याप सुरु वात करण्यात आली नसून निविदा प्रक्रिया देखील झालेली नाही. एमएमआरडीएकडून नुकतेच पत्र प्राप्त झाले असून पुढील सूचना मिळेपर्यंत काम कामाची प्रक्रि या थांबवावी लागणार आहे अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. परंतु मेट्रोचा आराखडा आला आणि त्यात हे पुल नकोच असा उल्लेख झाला तर मात्र या पुलांचे भवितव्य अधांतरी राहणार असल्याचेही आता बोलले जात आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाmmrdaएमएमआरडीए