शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
3
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
4
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
5
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
6
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
7
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
8
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
9
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
10
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
11
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
12
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
13
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
14
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
15
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
16
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
17
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
18
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
19
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
20
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना

सागरीकिनारा रस्त्याच्या भरावामुळे मुंबईचे अतोनात नुकसान होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 05:22 IST

पर्यावरणतज्ज्ञांचे मत : सार्वजनिक वाहतूक प्रणालीवर भर देण्याची गरज

मुंबई : प्रस्तावित सागरी किनारा रस्त्यासाठी (कोस्टल रोड) उपलब्ध होणाऱ्या भराव क्षेत्रापैकी २२ टक्के क्षेत्रात सागरी किनारा रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार असून, उर्वरित ७८ टक्के क्षेत्रात लँडस्केपिंगसह नागरी सुविधा करण्यात येणार आहेत. मात्र, या प्रकल्पासाठीच्या भरावामुळे समुद्राचे अर्थात, मुंबईचे अतोनात नुकसान होणार असल्याचे म्हणत, पर्यावरणवाद्यांनी यावर टीकास्त्र उगारले आहे. टीकास्त्र उगारतानाच सार्वजनिक वाहतूक प्रणालीवर भर देण्याची गरज असल्याचे पर्यावरणवाद्यांनी म्हटले आहे.

मुळात सागरी रस्ता प्रकल्प करावयाचा झाल्यास, प्रथम वाहतुकीच्या दृष्टीने आणि त्यानंतर सागरी पर्यावरणातील हस्तक्षेप व शेवटी बांधकाम असा विचार होणे गरजेचे आहे. मात्र, प्रत्यक्षात बांधकाम एके बांधकाम असा विचार होतो. हाच प्रकार वांद्रे-वरळी सी लिंकबाबत घडला होता. सागरी रस्त्याबाबत पर्यावरण प्रभाव तपासणी नीट होत नाही. मोटारींना रोखल्यास फ्लायओव्हर, मुक्त किंवा द्रुतगती मार्ग, सागरी मार्ग अशा भांडवल व साधनसामग्री केंद्रित ऊर्जाग्राही प्रकल्पांची गरज नसते. मुळात हे प्रकल्प म्हणजे उपाय नसून समस्या आहेत.

सागरी रस्ता प्रकल्पाच्या निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणावर ऊर्जा आणि विजेचा वापर केला जातो. यासाठी कोळशापासून वीज बनविणारे किंवा जैतापूरसारखे विनाशकारी प्रकल्प उभारावे लागतात. बांधकामासाठी दगड, सिमेंट, स्टीलकरिता डोंगरे तोडली जातात. नद्यांमधील वाळू उपसली जाते. शहराच्या भूभागाच्या खालच्या बाजूला रस्ते बांधल्याने त्यांची उंची वाढविली जाते. याचा वाईट परिणाम होतो. समुद्रकिनारी कितीही रस्ते बांधले, तरी शेवटी वाहने शहरातच येणार आहेत. परिणामी, वाहतूककोंडी, ध्वनी आणि वायू प्रदूषणात भरच पडणार आहे. आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे, याकडे कोणीच लक्ष देत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

दरम्यान, १९८७ सालच्या सरकारचे तत्कालीन मुख्य सचिव के. जी. परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने सार्वजनिक वाहतुकीवर भर द्यावा आणि मुंबईच्या सागरात नवा भराव करू नये, असे आपल्या अहवालात म्हटले होते. १९९४ च्या एमएमआरडीएच्या अहवालात पश्चिम बेट मुक्त मार्ग केल्यास वाहतूककोंडी वाढेल, असे नमूद करण्यात आले होते. १९९९च्या एमएमआरडीएच्या अहवालात मुंबईवर फ्लायओव्हरमुळे दुष्पपरिणाम होत असून, इंधन अधिक जाळले जात असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, याकडे कानाडोळा केला जात आहे.तापमानवाढीची झळप्रशांत, हिंदी आणि अटलांटिक महासागरातील ३५ देश आणि नेदरलँड हा देश तापमानवाढीच्या परिणामांमुळे चिंतेत आहे. हे देश महासागरांच्या पाण्याच्या पातळीत बुडू लागले आहेत. ध्रुवावरील आणि पर्वतांवरील बर्फ वितळू लागला आहे. हे पाणी महासागरांच्या पातळीत वाढ घडवत आहेत.श्यामलदास गांधी उड्डाणपूल (प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर) ते राजीव गांधी सागरी सेतूच्या (वरळी वांद्रे सी लिंक) वरळी बाजूच्या दरम्यान मुंबई सागरी किनारा रस्ता बांधण्याची कार्यवाही आता सुरू झाली आहे.समुद्रात आणखी भराव करू नकासागरी पाळीतील वाढ सुरू झाली आहे. मुंबई, न्यूयॉर्क, शांघाय ही शहरे धोक्यात आली आहेत. समुद्रात आणखी भराव करू नयेत. अतिवृष्टी आणि चक्रीवादळामुळे घुसत असलेल्या पाण्याला समावून घेण्यासाठी नदीमुखे आणि खाड्यांची मुखे यात केलेले भराव काढून टाकावे.- अ‍ॅड. गिरीश राऊत, पर्यावरणतज्ज्ञ

येत्या तीसएक वर्षांत समुद्राच्या पाण्याची पातळी वीस फुटांपर्यंत वाढेल. असे होणार असेल, तर मुंबई जागेवर राहणार नाही. सार्वजनिक वाहतूक प्रणालीवर भर दिला पाहिजे. पर्यावरणाची हानी होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.- शिरीष मेढी, पर्यावरणतज्ज्ञकेवळ ६० टक्के लोकांनाच सागरी किनारा रस्त्याचा फायदा होईल. आता आठ हजार कोटींचा प्रकल्प बारा हजार कोटींवर गेला आहे. आता भविष्यात तो १५ हजार कोटींवर जाईल. सर्वसामान्यांना प्रकल्पाचा फायदा नाही. ज्यांच्याकडे गाड्या आहेत, त्यांच्यासाठी हा प्रकल्प आहे.- गॉडफ्रे पिमेंटा, विश्वस्त, वॉचडॉग फाउंडेशन

टॅग्स :Mumbaiमुंबईthaneठाणे