शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

शेतकरी हिताच्या योजना राज्य सरकारने केल्या बंद; देवेंद्र फडणवीस यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 19:05 IST

भाजप शहापूर तालुका व कपिल पाटील फाउंडेशन यांच्या माध्यमातून बुधवारी शेतकरी मेळावा घेण्यात आला.

भातसानगर : राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर साेडले आहे. या सरकारने लबाडाचे राजकारण केले असून एक नवा पैसाही शेतकऱ्यांना दिलेला नाही. उलट शेतकऱ्यांच्या हिताच्या याेजना या सरकारने बंद केल्यात, असा आराेप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी शहापूर येथे केला.

भाजप शहापूर तालुका व कपिल पाटील फाउंडेशन यांच्या माध्यमातून बुधवारी शेतकरी मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार गणपत गायकवाड, आमदार निरंजन डावखरे, कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, शीतल तोंडलिकर, माजी सभापती सुभाष हरड, तालुका अध्यक्ष भास्कर जाधव, ज्येष्ठ नेते अशोक इरनक, शहरप्रमुख विवेक नार्वेकर, वैदेही नार्वेकर आदी उपस्थित होते. 

या मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी शेतीची आवश्यक असणाऱ्या अवजारांचा लकी ड्रॉ काढण्यात आला.फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत. त्यांच्या वेदना सरकारपर्यंत पोहचल्या पाहिजेत. यासाठी अशा शेतकरी मेळाव्यांची गरज आहे. फळबागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी दीड लाख रुपये देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र, त्याचे पुढे काहीच झाले नाही. विमा कंपन्यांनी तीन हजार कोटींचा नफा कमावला, मात्र शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. 

शेततळ्यांसाठी आम्ही जास्तीत जास्त अनुदान दिले. गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी अवजारे घेण्यासाठी एक कोटींचे अनुदान देणारी योजना या सरकारने बंद केली. तालुक्यात धरणे असतानाही प्यायला पाणी नाही, यासारखे दुर्दैव नाही. दरम्यान, या मेळाव्यानिमित्त एका रात्रीत ते खड्डे या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रशासनाने बुजविल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त करण्यात येत हाेते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार