शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

शेतकरी हिताच्या योजना राज्य सरकारने केल्या बंद; देवेंद्र फडणवीस यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 19:05 IST

भाजप शहापूर तालुका व कपिल पाटील फाउंडेशन यांच्या माध्यमातून बुधवारी शेतकरी मेळावा घेण्यात आला.

भातसानगर : राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर साेडले आहे. या सरकारने लबाडाचे राजकारण केले असून एक नवा पैसाही शेतकऱ्यांना दिलेला नाही. उलट शेतकऱ्यांच्या हिताच्या याेजना या सरकारने बंद केल्यात, असा आराेप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी शहापूर येथे केला.

भाजप शहापूर तालुका व कपिल पाटील फाउंडेशन यांच्या माध्यमातून बुधवारी शेतकरी मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार गणपत गायकवाड, आमदार निरंजन डावखरे, कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, शीतल तोंडलिकर, माजी सभापती सुभाष हरड, तालुका अध्यक्ष भास्कर जाधव, ज्येष्ठ नेते अशोक इरनक, शहरप्रमुख विवेक नार्वेकर, वैदेही नार्वेकर आदी उपस्थित होते. 

या मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी शेतीची आवश्यक असणाऱ्या अवजारांचा लकी ड्रॉ काढण्यात आला.फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत. त्यांच्या वेदना सरकारपर्यंत पोहचल्या पाहिजेत. यासाठी अशा शेतकरी मेळाव्यांची गरज आहे. फळबागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी दीड लाख रुपये देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र, त्याचे पुढे काहीच झाले नाही. विमा कंपन्यांनी तीन हजार कोटींचा नफा कमावला, मात्र शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. 

शेततळ्यांसाठी आम्ही जास्तीत जास्त अनुदान दिले. गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी अवजारे घेण्यासाठी एक कोटींचे अनुदान देणारी योजना या सरकारने बंद केली. तालुक्यात धरणे असतानाही प्यायला पाणी नाही, यासारखे दुर्दैव नाही. दरम्यान, या मेळाव्यानिमित्त एका रात्रीत ते खड्डे या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रशासनाने बुजविल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त करण्यात येत हाेते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार