शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी हिताच्या योजना राज्य सरकारने केल्या बंद; देवेंद्र फडणवीस यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 19:05 IST

भाजप शहापूर तालुका व कपिल पाटील फाउंडेशन यांच्या माध्यमातून बुधवारी शेतकरी मेळावा घेण्यात आला.

भातसानगर : राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर साेडले आहे. या सरकारने लबाडाचे राजकारण केले असून एक नवा पैसाही शेतकऱ्यांना दिलेला नाही. उलट शेतकऱ्यांच्या हिताच्या याेजना या सरकारने बंद केल्यात, असा आराेप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी शहापूर येथे केला.

भाजप शहापूर तालुका व कपिल पाटील फाउंडेशन यांच्या माध्यमातून बुधवारी शेतकरी मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार गणपत गायकवाड, आमदार निरंजन डावखरे, कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, शीतल तोंडलिकर, माजी सभापती सुभाष हरड, तालुका अध्यक्ष भास्कर जाधव, ज्येष्ठ नेते अशोक इरनक, शहरप्रमुख विवेक नार्वेकर, वैदेही नार्वेकर आदी उपस्थित होते. 

या मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी शेतीची आवश्यक असणाऱ्या अवजारांचा लकी ड्रॉ काढण्यात आला.फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत. त्यांच्या वेदना सरकारपर्यंत पोहचल्या पाहिजेत. यासाठी अशा शेतकरी मेळाव्यांची गरज आहे. फळबागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी दीड लाख रुपये देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र, त्याचे पुढे काहीच झाले नाही. विमा कंपन्यांनी तीन हजार कोटींचा नफा कमावला, मात्र शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. 

शेततळ्यांसाठी आम्ही जास्तीत जास्त अनुदान दिले. गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी अवजारे घेण्यासाठी एक कोटींचे अनुदान देणारी योजना या सरकारने बंद केली. तालुक्यात धरणे असतानाही प्यायला पाणी नाही, यासारखे दुर्दैव नाही. दरम्यान, या मेळाव्यानिमित्त एका रात्रीत ते खड्डे या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रशासनाने बुजविल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त करण्यात येत हाेते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार