शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

शेतकरी हिताच्या योजना राज्य सरकारने केल्या बंद; देवेंद्र फडणवीस यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 19:05 IST

भाजप शहापूर तालुका व कपिल पाटील फाउंडेशन यांच्या माध्यमातून बुधवारी शेतकरी मेळावा घेण्यात आला.

भातसानगर : राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर साेडले आहे. या सरकारने लबाडाचे राजकारण केले असून एक नवा पैसाही शेतकऱ्यांना दिलेला नाही. उलट शेतकऱ्यांच्या हिताच्या याेजना या सरकारने बंद केल्यात, असा आराेप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी शहापूर येथे केला.

भाजप शहापूर तालुका व कपिल पाटील फाउंडेशन यांच्या माध्यमातून बुधवारी शेतकरी मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार गणपत गायकवाड, आमदार निरंजन डावखरे, कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, शीतल तोंडलिकर, माजी सभापती सुभाष हरड, तालुका अध्यक्ष भास्कर जाधव, ज्येष्ठ नेते अशोक इरनक, शहरप्रमुख विवेक नार्वेकर, वैदेही नार्वेकर आदी उपस्थित होते. 

या मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी शेतीची आवश्यक असणाऱ्या अवजारांचा लकी ड्रॉ काढण्यात आला.फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत. त्यांच्या वेदना सरकारपर्यंत पोहचल्या पाहिजेत. यासाठी अशा शेतकरी मेळाव्यांची गरज आहे. फळबागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी दीड लाख रुपये देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र, त्याचे पुढे काहीच झाले नाही. विमा कंपन्यांनी तीन हजार कोटींचा नफा कमावला, मात्र शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. 

शेततळ्यांसाठी आम्ही जास्तीत जास्त अनुदान दिले. गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी अवजारे घेण्यासाठी एक कोटींचे अनुदान देणारी योजना या सरकारने बंद केली. तालुक्यात धरणे असतानाही प्यायला पाणी नाही, यासारखे दुर्दैव नाही. दरम्यान, या मेळाव्यानिमित्त एका रात्रीत ते खड्डे या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रशासनाने बुजविल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त करण्यात येत हाेते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार