शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 17:56 IST

नैसर्गिक आपती, किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण देणे.

ठाणे: प्रधानमंत्री पीक विमा योजना अधिसूचित पिकांसाठी यंदाच्या खरीप हंगामपासून तीन वर्षाकरिता राबविण्यास मान्यता प्राप्त झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा मोठ्यासंखेने  लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे. 

खरीप हंगाम पीक कापणी प्रयोग प्रशिक्षण वर्ग आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेची जिल्हास्तरीय बैठक समित सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयात येथे पार पडली.यावेळी कृषी संजीवनी सप्ताह 1 ते 7 जुलैदरम्यान सर्व तालुक्यात राबविण्यात येत आहे.या कृषी संजीवनी साप्ताहाच्या अनुषंगाने प्रचार प्रसार व प्रसिध्दी करण्याकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.‍शिवाजी पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, अग्रणी बॅक प्रंबंधक जयानंद भारती, विमा कंपनीचे चीफ मॅनेजर सचिन सुरवसे  उपस्थित होते.

नैसर्गिक आपती, किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे. कृषि क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे आदींसाठी शेतकर्‍यांना या विम्याचा लाभ होणार आहे. प्रधाननमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने करणारे शेतकरी पण पात्र आहे. सर्व अधिसूचित पिकासाठी ७०% असा निश्चित करण्यात आला आहे. उंबरठा उत्पन्न हे मागील ७ वर्षापैकी सर्वाधिक उत्पन्नाच्या ५ वर्षाचे सरासरी उत्पन्न गणिले त्या पिकाचा जोखीम स्तर विचारात घेऊन निश्चित केले  जाणार आहे. 

टॅग्स :thaneठाणे