शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 17:56 IST

नैसर्गिक आपती, किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण देणे.

ठाणे: प्रधानमंत्री पीक विमा योजना अधिसूचित पिकांसाठी यंदाच्या खरीप हंगामपासून तीन वर्षाकरिता राबविण्यास मान्यता प्राप्त झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा मोठ्यासंखेने  लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे. 

खरीप हंगाम पीक कापणी प्रयोग प्रशिक्षण वर्ग आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेची जिल्हास्तरीय बैठक समित सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयात येथे पार पडली.यावेळी कृषी संजीवनी सप्ताह 1 ते 7 जुलैदरम्यान सर्व तालुक्यात राबविण्यात येत आहे.या कृषी संजीवनी साप्ताहाच्या अनुषंगाने प्रचार प्रसार व प्रसिध्दी करण्याकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.‍शिवाजी पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, अग्रणी बॅक प्रंबंधक जयानंद भारती, विमा कंपनीचे चीफ मॅनेजर सचिन सुरवसे  उपस्थित होते.

नैसर्गिक आपती, किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे. कृषि क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे आदींसाठी शेतकर्‍यांना या विम्याचा लाभ होणार आहे. प्रधाननमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने करणारे शेतकरी पण पात्र आहे. सर्व अधिसूचित पिकासाठी ७०% असा निश्चित करण्यात आला आहे. उंबरठा उत्पन्न हे मागील ७ वर्षापैकी सर्वाधिक उत्पन्नाच्या ५ वर्षाचे सरासरी उत्पन्न गणिले त्या पिकाचा जोखीम स्तर विचारात घेऊन निश्चित केले  जाणार आहे. 

टॅग्स :thaneठाणे