शहरं
Join us  
Trending Stories
1
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
2
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
3
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
4
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
5
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
6
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
7
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
8
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
9
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
10
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
11
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
12
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
13
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
14
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
15
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
16
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
17
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
18
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
19
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
20
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा

भिवंडीत परतीच्या पावसामुळे भात शेती धोक्यात; शेतकरी हवालदिल 

By नितीन पंडित | Updated: October 13, 2022 16:08 IST

यावर्षीच्या उत्तम पावसामुळे शेतात भात पीक जोमाने आले असून बळीराजा देखील सुखावला आहे.मात्र परतीच्या पावसाने काही दिवसांपासून सायंकाळी हजेरी लावत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

भिवंडी - भिवंडीत परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे कापणीसाठी तय्यार होत असलेल्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात असून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे येथील भात शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.परतीच्या पावसामुळे तालुक्यातील ३ हजार हेक्टरहुन अधिक भात पिकाचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

भिवंडीत हळवे व गरवे अशी एकूण १८ हजार हेक्टर भातशेती आहे.त्यापैकी ३ हजार हेक्टर भातशेतीमध्ये हळवे पीक घेण्यात येते. सध्या अनेक ठिकाणी हे पीक तय्यार झाले आहे.पुढच्या दहा बारा दिवसात दिवाळी सण येऊ घातल्याने या सणा पूर्वीच भात पिकाची कापणी करून ते घरात आणण्यासाठी काही शेतकऱ्यांची लगबग सुरु केली आहे.मात्र मागील आठवड्यापासून मुसळधार वारा पावसामुळे भात शेती धोक्यात आली असून हाता तोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसामुळे मातीमोल होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.

यावर्षीच्या उत्तम पावसामुळे शेतात भात पीक जोमाने आले असून बळीराजा देखील सुखावला आहे.मात्र परतीच्या पावसाने काही दिवसांपासून सायंकाळी हजेरी लावत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. भिवंडी तालुक्यातील पडघा, अंबाडी, खानिवली, वडवली, अनगांव, कवाड, कुंदे, दिघाशी, नांदकर, बापगांव, मुठवळ, चिंबीपाडा, कुहे, धामणे, खारबांव, पाये, पायगांव, खार्डी, एकसाल, सागांव, जुनांदुर्खी, टेंभवली, पालीवली, गाणे, फिरिंगपाडा, बासे, मैदे, पाश्चापूर आदी गावांमध्ये भात शेती केली जात असून सध्या हे भात पीक कापणीसाठी जवळपास तयार झाले आहे मात्र परतीच्या पावसामुळे हे पीक धोक्यात आले असून शेतकऱ्यांसमोर वर्षभराच्या खावटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.जर परतीचा पाऊस आणखी काही दिवस असाच पडत राहिला तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून बळीराजा आणखीन कर्जबाजारी होण्याची शक्यता वाढली आहे.

टॅग्स :Rainपाऊस