शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

भिवंडीत परतीच्या पावसामुळे भात शेती धोक्यात; शेतकरी हवालदिल 

By नितीन पंडित | Updated: October 13, 2022 16:08 IST

यावर्षीच्या उत्तम पावसामुळे शेतात भात पीक जोमाने आले असून बळीराजा देखील सुखावला आहे.मात्र परतीच्या पावसाने काही दिवसांपासून सायंकाळी हजेरी लावत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

भिवंडी - भिवंडीत परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे कापणीसाठी तय्यार होत असलेल्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात असून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे येथील भात शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.परतीच्या पावसामुळे तालुक्यातील ३ हजार हेक्टरहुन अधिक भात पिकाचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

भिवंडीत हळवे व गरवे अशी एकूण १८ हजार हेक्टर भातशेती आहे.त्यापैकी ३ हजार हेक्टर भातशेतीमध्ये हळवे पीक घेण्यात येते. सध्या अनेक ठिकाणी हे पीक तय्यार झाले आहे.पुढच्या दहा बारा दिवसात दिवाळी सण येऊ घातल्याने या सणा पूर्वीच भात पिकाची कापणी करून ते घरात आणण्यासाठी काही शेतकऱ्यांची लगबग सुरु केली आहे.मात्र मागील आठवड्यापासून मुसळधार वारा पावसामुळे भात शेती धोक्यात आली असून हाता तोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसामुळे मातीमोल होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.

यावर्षीच्या उत्तम पावसामुळे शेतात भात पीक जोमाने आले असून बळीराजा देखील सुखावला आहे.मात्र परतीच्या पावसाने काही दिवसांपासून सायंकाळी हजेरी लावत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. भिवंडी तालुक्यातील पडघा, अंबाडी, खानिवली, वडवली, अनगांव, कवाड, कुंदे, दिघाशी, नांदकर, बापगांव, मुठवळ, चिंबीपाडा, कुहे, धामणे, खारबांव, पाये, पायगांव, खार्डी, एकसाल, सागांव, जुनांदुर्खी, टेंभवली, पालीवली, गाणे, फिरिंगपाडा, बासे, मैदे, पाश्चापूर आदी गावांमध्ये भात शेती केली जात असून सध्या हे भात पीक कापणीसाठी जवळपास तयार झाले आहे मात्र परतीच्या पावसामुळे हे पीक धोक्यात आले असून शेतकऱ्यांसमोर वर्षभराच्या खावटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.जर परतीचा पाऊस आणखी काही दिवस असाच पडत राहिला तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून बळीराजा आणखीन कर्जबाजारी होण्याची शक्यता वाढली आहे.

टॅग्स :Rainपाऊस