शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

कृषी खाते बेफिकीर तर शेतकऱ्यांना रोगांची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 03:49 IST

जिल्ह्यातील ७५०२१.४४ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली असून खोडकीडा, निळा भुंगेरा आदी आदींचा प्रादुर्भाव नुकसानीच्या आत असल्याचे जिल्हा कृषी विभागाने सांगितले.

- हितेंन नाईकपालघर : जिल्ह्यातील ७५०२१.४४ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली असून खोडकीडा, निळा भुंगेरा आदी आदींचा प्रादुर्भाव नुकसानीच्या आत असल्याचे जिल्हा कृषी विभागाने सांगितले. मात्र काही भागात तुरळक पावसाच्या सरी कोसळत असल्यातरी निर्माण झालेल्या दमट वातावरणामुळे अन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतकºयामधून व्यक्त केली जात आहे. तर जिल्ह्यातील सर्व धरणे पाण्यानी भरलेली आहेत.जिल्ह्यात १ लाख ७ हजार १७६ हेक्टर क्षेत्र हे लागवडी खालील क्षेत्र असून भातपिकाचे सरासरी लागवड क्षेत्र ७६ हजार ३८८ हेक्टर आहे. त्यापैकी ७५ हजार २१.४४ हेक्टर क्षेत्रावर पुर्नलागवड (९८.२१ टक्के) करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे नागली पिकाचे सरासरी क्षेत्र ११ हजार २०५ हेक्टर असून १२ हजार १७१.६३ टक्के (१०९ टक्के) क्षेत्रावर पुनर्लागवड करण्यात आली आहे. उडीद पिकाचे सरासरी क्षेत्र ३ हजार ५९६ हेक्टर असून ३०३९.८८ हेक्टर क्षेत्रावर (८४.५४ टक्के) पेरणी झाली आहे. तूर पिकाचे सरासरी क्षेत्र २ हजार ५४६ हेक्टर असून २ हजार ४४१.८८ हेक्टर क्षेत्रावर (९५.९१ टक्के) क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.जिल्ह्यात पडणारा सरासरी वार्षिक पाऊस २५७७.८० मिमी.एवढा आहे. माहे जून महिन्याची पावसाची सरासरी ४२६.०० मिमी होती. त्या तुलनेत जून महिन्यात ६८७.०० मिमी एवढा पाऊस पडलेला आहे. जुलै महिन्याच्या पावसाची सरासरी १०४७.८० मिमी असून आज अखेर १६५३.७३ मिमी इतका पाऊस पडलेला आहे. आॅगस्ट महिन्याची पावसाची सरासरी ६२६.८० मिमी असून आज अखेर २७६.६० मिमी पाऊस (४४.१० टक्के) पडला आहे.सूर्या या मोठ्या प्रकल्पांतर्गत धामणी, कवडासची क्षमता २८६.३१ द.ल.घ.मी. असून ते पूर्ण भरलेले आहेत. वांद्री मध्यम प्रकल्पात ३५.९३८ द.ल.घ.मी पाणीक्षमता असून ते ही पूर्ण भरलेले आहे. तर जिल्ह्यात एकूण ६ लघु पाटबंधारे असून त्या पालघर तालुक्यात माहीम केळवे, मनोर आणि देवखोप. विक्रमगड तालुक्यात मोहखुर्द व खांड तर डहाणू तालुक्यातील रायतळे यांचा समावेश असून ही सर्व धरणे पूर्ण भरली आहेत.भात रोपांची पुनर्लागवड नुकतीच झाली असून रोपास फुटवे येत आहेत. जिल्हा कृषी अधीक्षकांनी केलेल्या क्रॉपसॅप सर्वेक्षणानुसार पालघर तालुक्यातील माण, वाडा तालुक्यातील गारगाव, जव्हार तालुक्यातील गोरठन तर डहाणू तालुक्यातील भराड येथील काही शेतकºयाच्या शेतात खोडकीडा, निळा भुंगेराचे प्रमाण आढळून आले असून ते नुकसान पातळीच्या आत असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील नाईक यांनी दिली. मात्र जिल्ह्यात कुठेही करपा रोगाची लागण झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून पावसात खंड पडला असला तरी पीक परिस्थिती समाधानकारक असल्याचेही त्यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीpalgharपालघर