शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

कृषी खाते बेफिकीर तर शेतकऱ्यांना रोगांची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 03:49 IST

जिल्ह्यातील ७५०२१.४४ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली असून खोडकीडा, निळा भुंगेरा आदी आदींचा प्रादुर्भाव नुकसानीच्या आत असल्याचे जिल्हा कृषी विभागाने सांगितले.

- हितेंन नाईकपालघर : जिल्ह्यातील ७५०२१.४४ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली असून खोडकीडा, निळा भुंगेरा आदी आदींचा प्रादुर्भाव नुकसानीच्या आत असल्याचे जिल्हा कृषी विभागाने सांगितले. मात्र काही भागात तुरळक पावसाच्या सरी कोसळत असल्यातरी निर्माण झालेल्या दमट वातावरणामुळे अन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतकºयामधून व्यक्त केली जात आहे. तर जिल्ह्यातील सर्व धरणे पाण्यानी भरलेली आहेत.जिल्ह्यात १ लाख ७ हजार १७६ हेक्टर क्षेत्र हे लागवडी खालील क्षेत्र असून भातपिकाचे सरासरी लागवड क्षेत्र ७६ हजार ३८८ हेक्टर आहे. त्यापैकी ७५ हजार २१.४४ हेक्टर क्षेत्रावर पुर्नलागवड (९८.२१ टक्के) करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे नागली पिकाचे सरासरी क्षेत्र ११ हजार २०५ हेक्टर असून १२ हजार १७१.६३ टक्के (१०९ टक्के) क्षेत्रावर पुनर्लागवड करण्यात आली आहे. उडीद पिकाचे सरासरी क्षेत्र ३ हजार ५९६ हेक्टर असून ३०३९.८८ हेक्टर क्षेत्रावर (८४.५४ टक्के) पेरणी झाली आहे. तूर पिकाचे सरासरी क्षेत्र २ हजार ५४६ हेक्टर असून २ हजार ४४१.८८ हेक्टर क्षेत्रावर (९५.९१ टक्के) क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.जिल्ह्यात पडणारा सरासरी वार्षिक पाऊस २५७७.८० मिमी.एवढा आहे. माहे जून महिन्याची पावसाची सरासरी ४२६.०० मिमी होती. त्या तुलनेत जून महिन्यात ६८७.०० मिमी एवढा पाऊस पडलेला आहे. जुलै महिन्याच्या पावसाची सरासरी १०४७.८० मिमी असून आज अखेर १६५३.७३ मिमी इतका पाऊस पडलेला आहे. आॅगस्ट महिन्याची पावसाची सरासरी ६२६.८० मिमी असून आज अखेर २७६.६० मिमी पाऊस (४४.१० टक्के) पडला आहे.सूर्या या मोठ्या प्रकल्पांतर्गत धामणी, कवडासची क्षमता २८६.३१ द.ल.घ.मी. असून ते पूर्ण भरलेले आहेत. वांद्री मध्यम प्रकल्पात ३५.९३८ द.ल.घ.मी पाणीक्षमता असून ते ही पूर्ण भरलेले आहे. तर जिल्ह्यात एकूण ६ लघु पाटबंधारे असून त्या पालघर तालुक्यात माहीम केळवे, मनोर आणि देवखोप. विक्रमगड तालुक्यात मोहखुर्द व खांड तर डहाणू तालुक्यातील रायतळे यांचा समावेश असून ही सर्व धरणे पूर्ण भरली आहेत.भात रोपांची पुनर्लागवड नुकतीच झाली असून रोपास फुटवे येत आहेत. जिल्हा कृषी अधीक्षकांनी केलेल्या क्रॉपसॅप सर्वेक्षणानुसार पालघर तालुक्यातील माण, वाडा तालुक्यातील गारगाव, जव्हार तालुक्यातील गोरठन तर डहाणू तालुक्यातील भराड येथील काही शेतकºयाच्या शेतात खोडकीडा, निळा भुंगेराचे प्रमाण आढळून आले असून ते नुकसान पातळीच्या आत असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील नाईक यांनी दिली. मात्र जिल्ह्यात कुठेही करपा रोगाची लागण झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून पावसात खंड पडला असला तरी पीक परिस्थिती समाधानकारक असल्याचेही त्यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीpalgharपालघर