शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी खाते बेफिकीर तर शेतकऱ्यांना रोगांची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 03:49 IST

जिल्ह्यातील ७५०२१.४४ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली असून खोडकीडा, निळा भुंगेरा आदी आदींचा प्रादुर्भाव नुकसानीच्या आत असल्याचे जिल्हा कृषी विभागाने सांगितले.

- हितेंन नाईकपालघर : जिल्ह्यातील ७५०२१.४४ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली असून खोडकीडा, निळा भुंगेरा आदी आदींचा प्रादुर्भाव नुकसानीच्या आत असल्याचे जिल्हा कृषी विभागाने सांगितले. मात्र काही भागात तुरळक पावसाच्या सरी कोसळत असल्यातरी निर्माण झालेल्या दमट वातावरणामुळे अन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतकºयामधून व्यक्त केली जात आहे. तर जिल्ह्यातील सर्व धरणे पाण्यानी भरलेली आहेत.जिल्ह्यात १ लाख ७ हजार १७६ हेक्टर क्षेत्र हे लागवडी खालील क्षेत्र असून भातपिकाचे सरासरी लागवड क्षेत्र ७६ हजार ३८८ हेक्टर आहे. त्यापैकी ७५ हजार २१.४४ हेक्टर क्षेत्रावर पुर्नलागवड (९८.२१ टक्के) करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे नागली पिकाचे सरासरी क्षेत्र ११ हजार २०५ हेक्टर असून १२ हजार १७१.६३ टक्के (१०९ टक्के) क्षेत्रावर पुनर्लागवड करण्यात आली आहे. उडीद पिकाचे सरासरी क्षेत्र ३ हजार ५९६ हेक्टर असून ३०३९.८८ हेक्टर क्षेत्रावर (८४.५४ टक्के) पेरणी झाली आहे. तूर पिकाचे सरासरी क्षेत्र २ हजार ५४६ हेक्टर असून २ हजार ४४१.८८ हेक्टर क्षेत्रावर (९५.९१ टक्के) क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.जिल्ह्यात पडणारा सरासरी वार्षिक पाऊस २५७७.८० मिमी.एवढा आहे. माहे जून महिन्याची पावसाची सरासरी ४२६.०० मिमी होती. त्या तुलनेत जून महिन्यात ६८७.०० मिमी एवढा पाऊस पडलेला आहे. जुलै महिन्याच्या पावसाची सरासरी १०४७.८० मिमी असून आज अखेर १६५३.७३ मिमी इतका पाऊस पडलेला आहे. आॅगस्ट महिन्याची पावसाची सरासरी ६२६.८० मिमी असून आज अखेर २७६.६० मिमी पाऊस (४४.१० टक्के) पडला आहे.सूर्या या मोठ्या प्रकल्पांतर्गत धामणी, कवडासची क्षमता २८६.३१ द.ल.घ.मी. असून ते पूर्ण भरलेले आहेत. वांद्री मध्यम प्रकल्पात ३५.९३८ द.ल.घ.मी पाणीक्षमता असून ते ही पूर्ण भरलेले आहे. तर जिल्ह्यात एकूण ६ लघु पाटबंधारे असून त्या पालघर तालुक्यात माहीम केळवे, मनोर आणि देवखोप. विक्रमगड तालुक्यात मोहखुर्द व खांड तर डहाणू तालुक्यातील रायतळे यांचा समावेश असून ही सर्व धरणे पूर्ण भरली आहेत.भात रोपांची पुनर्लागवड नुकतीच झाली असून रोपास फुटवे येत आहेत. जिल्हा कृषी अधीक्षकांनी केलेल्या क्रॉपसॅप सर्वेक्षणानुसार पालघर तालुक्यातील माण, वाडा तालुक्यातील गारगाव, जव्हार तालुक्यातील गोरठन तर डहाणू तालुक्यातील भराड येथील काही शेतकºयाच्या शेतात खोडकीडा, निळा भुंगेराचे प्रमाण आढळून आले असून ते नुकसान पातळीच्या आत असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील नाईक यांनी दिली. मात्र जिल्ह्यात कुठेही करपा रोगाची लागण झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून पावसात खंड पडला असला तरी पीक परिस्थिती समाधानकारक असल्याचेही त्यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीpalgharपालघर