शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंपांची वीजबिले शेतकऱ्यांना वेळेवर मिळेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:40 IST

अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : महावितरणच्या कल्याण परिमंडळात ठाणे आणि पालघर जिल्ह्यात एकूण २३ हजार ५८९ कृषिपंप ...

अनिकेत घमंडी

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : महावितरणच्या कल्याण परिमंडळात ठाणे आणि पालघर जिल्ह्यात एकूण २३ हजार ५८९ कृषिपंप ग्राहक असून, त्यांच्याकडे २८ कोटींचे वीजबिल थकीत आहे. मात्र, राज्य शासनाच्या विविध योजनेतील तरतुदींमुळे एकूण थकबाकीपैकी दोन कोटी २१ लाख रुपये माफ झाले आहेत. आता परिमंडळातील शेतकऱ्यांकडे २५ कोटी ७७ लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे. त्यापैकीही नव्या धोरणानुसार सगळ्या थकबाकी केवळ पन्नास टक्के म्हणजेच १२ कोटी ८८ लाख रुपये चालू वीजबिलासह एकरकमी भरल्यास उर्वरित पन्नास टक्के थकबाकी माफ होणार आहे. मात्र, अनेक ग्राहकांनी वेळेवर कृषिपंपांची वीजबिले मिळत नसल्याचे सांगितले.

महावितरणकडून सुरू झालेल्या वसुलीतून दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत, चालू वीजबिलासह थकबाकीच्या चार कोटी ५८ लाख रुपयांचा भरणा करून महावितरणला त्वरित प्रतिसाद दिला असला, तरीही अजूनही सगळेच शेतकरी याला प्रतिसाद देतीलच, असे चित्र नाही. तरीही महावितरण याबाबत आशावादी आहे, तसेच अनेकांना वीजबिल वेळेत मिळत नाहीत, मिळाली तरी ती भरण्याच्या अडचणी असतात, तसेच शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्याबाबत समस्या असतात, त्यांचे निराकरण होणे गरजेचे असते, ते होत नसल्याने काही प्रमाणात शेतकरी बिल भरण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचेही सांगण्यात आले.

-------------

कृषिपंप ग्राहकांच्या बाबतीत शहरी भागांत दरमहा तर ग्रामीण भागात दर तीन महिन्यांना वीजबिल वितरित करण्यात येते. कल्याण परिमंडळात ५० टक्के माफीनंतर आता तर चांगली वसुली सुरू असून, शेतकरी खूप प्रतिसाद देत आहेत. त्यांना अडचणी असतील, तर त्याही आम्ही सोडवू.

- विजयसिंह दूधभाते, जनसंपर्क अधिकारी, कल्याण परिमंडळ, महावितरण

-------------

आम्हाला तीन महिन्यांतून कृषिपंप बिले येतात. काही वेळेस मागेपुढे होते. रक्कम जास्त असल्यास ते भरताना अडचणी येतात, पण आता जी सुविधा दिली आहे, त्यामुळे काहींची तर बिले माफ झाली आहेत, तर काहींना ५० टक्के सवलत मिळाली आहे. त्या योजनांचा लाभ घेऊन सवलत पदरात पाडून घ्यावी.

- शांताराम सासे, शेतकरी, शहापूर

-------------

कृषिपंप वीजबिल काही कालावधीनंतर येतात. कधी दोन, तीन तर कधीतरी सहा महिन्यानेही आले आहे, पण बिल येतात, अनेक जण ती भारतात, काही जण परिस्थितीमुळे भरत नाही, पण सवलत मिळाली की तातडीने त्याचा लाभ घेऊन शेतकरी बिल भरण्याच्या मानसिकतेत असतात.

- राजा निपुर्ते, शेतकरी, शहापूर

-------------

मला २०१६ पासून कृषिपंप वीजबिल मिळालेले नाही. मी पाठपुरावा केला, त्यामुळे २०१८ पर्यंत वर्षातून स्वतः एकदा बिल आणत होतो, पण त्यानंतर पत्र, निवेदन देऊनही काही फरक पडत नसल्याने मी थकलो. अनेकदा पावसात वैगरे वीजतारा तुटतात, त्याबद्दलही बराच खटाटोप करत असतो, पण महावितरणचे उदासीन धोरण की काय, म्हणून मला तरी सुविधा मिळालेल्या नाहीत, हे वास्तव आहे. मी अजूनही बदल होतील, अशी अपेक्षा करत आहे.

- पंकज झाम्बरे, शेतकरी,दहागाव, पोई

-------------

जिल्ह्यातील कृषिपंपचालक - २३,५८९

वीजबिल थकबाकी - १२ कोटी ८८ लाख रुपये

-------------