शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

कृषिपंपांची वीजबिले शेतकऱ्यांना वेळेवर मिळेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:40 IST

अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : महावितरणच्या कल्याण परिमंडळात ठाणे आणि पालघर जिल्ह्यात एकूण २३ हजार ५८९ कृषिपंप ...

अनिकेत घमंडी

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : महावितरणच्या कल्याण परिमंडळात ठाणे आणि पालघर जिल्ह्यात एकूण २३ हजार ५८९ कृषिपंप ग्राहक असून, त्यांच्याकडे २८ कोटींचे वीजबिल थकीत आहे. मात्र, राज्य शासनाच्या विविध योजनेतील तरतुदींमुळे एकूण थकबाकीपैकी दोन कोटी २१ लाख रुपये माफ झाले आहेत. आता परिमंडळातील शेतकऱ्यांकडे २५ कोटी ७७ लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे. त्यापैकीही नव्या धोरणानुसार सगळ्या थकबाकी केवळ पन्नास टक्के म्हणजेच १२ कोटी ८८ लाख रुपये चालू वीजबिलासह एकरकमी भरल्यास उर्वरित पन्नास टक्के थकबाकी माफ होणार आहे. मात्र, अनेक ग्राहकांनी वेळेवर कृषिपंपांची वीजबिले मिळत नसल्याचे सांगितले.

महावितरणकडून सुरू झालेल्या वसुलीतून दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत, चालू वीजबिलासह थकबाकीच्या चार कोटी ५८ लाख रुपयांचा भरणा करून महावितरणला त्वरित प्रतिसाद दिला असला, तरीही अजूनही सगळेच शेतकरी याला प्रतिसाद देतीलच, असे चित्र नाही. तरीही महावितरण याबाबत आशावादी आहे, तसेच अनेकांना वीजबिल वेळेत मिळत नाहीत, मिळाली तरी ती भरण्याच्या अडचणी असतात, तसेच शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्याबाबत समस्या असतात, त्यांचे निराकरण होणे गरजेचे असते, ते होत नसल्याने काही प्रमाणात शेतकरी बिल भरण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचेही सांगण्यात आले.

-------------

कृषिपंप ग्राहकांच्या बाबतीत शहरी भागांत दरमहा तर ग्रामीण भागात दर तीन महिन्यांना वीजबिल वितरित करण्यात येते. कल्याण परिमंडळात ५० टक्के माफीनंतर आता तर चांगली वसुली सुरू असून, शेतकरी खूप प्रतिसाद देत आहेत. त्यांना अडचणी असतील, तर त्याही आम्ही सोडवू.

- विजयसिंह दूधभाते, जनसंपर्क अधिकारी, कल्याण परिमंडळ, महावितरण

-------------

आम्हाला तीन महिन्यांतून कृषिपंप बिले येतात. काही वेळेस मागेपुढे होते. रक्कम जास्त असल्यास ते भरताना अडचणी येतात, पण आता जी सुविधा दिली आहे, त्यामुळे काहींची तर बिले माफ झाली आहेत, तर काहींना ५० टक्के सवलत मिळाली आहे. त्या योजनांचा लाभ घेऊन सवलत पदरात पाडून घ्यावी.

- शांताराम सासे, शेतकरी, शहापूर

-------------

कृषिपंप वीजबिल काही कालावधीनंतर येतात. कधी दोन, तीन तर कधीतरी सहा महिन्यानेही आले आहे, पण बिल येतात, अनेक जण ती भारतात, काही जण परिस्थितीमुळे भरत नाही, पण सवलत मिळाली की तातडीने त्याचा लाभ घेऊन शेतकरी बिल भरण्याच्या मानसिकतेत असतात.

- राजा निपुर्ते, शेतकरी, शहापूर

-------------

मला २०१६ पासून कृषिपंप वीजबिल मिळालेले नाही. मी पाठपुरावा केला, त्यामुळे २०१८ पर्यंत वर्षातून स्वतः एकदा बिल आणत होतो, पण त्यानंतर पत्र, निवेदन देऊनही काही फरक पडत नसल्याने मी थकलो. अनेकदा पावसात वैगरे वीजतारा तुटतात, त्याबद्दलही बराच खटाटोप करत असतो, पण महावितरणचे उदासीन धोरण की काय, म्हणून मला तरी सुविधा मिळालेल्या नाहीत, हे वास्तव आहे. मी अजूनही बदल होतील, अशी अपेक्षा करत आहे.

- पंकज झाम्बरे, शेतकरी,दहागाव, पोई

-------------

जिल्ह्यातील कृषिपंपचालक - २३,५८९

वीजबिल थकबाकी - १२ कोटी ८८ लाख रुपये

-------------