शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनाे आता रब्बीच्या पिकांचा ‘ई पीक पेरा’ माेबाईल ॲपवर नाेंद करा - माने

By सुरेश लोखंडे | Updated: November 7, 2023 18:36 IST

Thane: नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई मिळण्यासाठी, याशिवाय शेतातील पीक विमा दावे निकाली काढण्यासाठी, पीक कर्ज वाटपासह पीएम किसान योजना, यांत्रिकीकरण योजना आदी शासनाच्या विविध योजनाच्या लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक शेतकरी खातेदाराने पीक ‘पेरा ई-पीक पाहणी ॲपद्वारे नोंद करणे आवश्यक आहे.

- सुरेश लोखंडे  ठाणे - नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई मिळण्यासाठी, याशिवाय शेतातील पीक विमा दावे निकाली काढण्यासाठी, पीक कर्ज वाटपासह पीएम किसान योजना, यांत्रिकीकरण योजना आदी शासनाच्या विविध योजनाच्या लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक शेतकरी खातेदाराने पीक ‘पेरा ई-पीक पाहणी ॲपद्वारे नोंद करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे आताही या रब्बी हंगामाचा ‘ई पीक पेरा’ नोंदीला सुरूवात झाली असून १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. यास अनुसरून ठाणे जिल्ह्यासह कोकण विभागातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तत्काळ, आजच मोबाईलमध्ये ‘ॲप डाऊनलोड करून ही ई पीक पाहणी नाेंद करावी, असे आवाहन कोकण विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे.

 शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेल्या पिकांबाबत आज्ञावलीमध्ये स्वयंम घोषणापत्र घेतले जाणार असून शेतकऱ्यांनी केलेली पीक पाहणी स्वयंप्रमाणित मानण्यात येईल. शेतकऱ्यांनी केलेल्या पीक पाहणीपैकी १० टक्के नोंदीची पडताळणी तलाठ्यांमार्फत करण्यात येणार आहे. तलाठी पडताळणीअंती आवश्यक असल्यास दुरुस्ती करून त्या नोंदी सत्यापित करतील व त्यानंतर त्या गाव नमुना नंबर १२ मध्ये प्रतिबिंबित होतील. शासनाच्या विविध योजनांचा लाभ, नुकसान भरपाई मदत व किमान आधारभुत किंमतीनुसार खरेदीच्या लाभाकरिता शेतकऱ्यांनी आजच ई पिकांची नोंद मोबाईल ॲपद्वारे करावी, असे माने यांनी केले आहे. गेल्या वर्षीच्या ॲपमध्ये सुधारणा करून नवीन सुविधायुक्त अॲप (२.०.१४) यावर्षी सुरू केले आहे. नवीन सुविधांमध्ये विविध सुविधांचा समावेश आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपद्वारे नोंदवलेली ‘ई-पीक पाहणी’ ४८ तासांमध्ये स्वतःहून केव्हाही एक वेळेस दुरुस्त करता येणार आहे.

गेल्या वर्षीच्या ॲपमध्ये सुधारणा करून नवीन सुविधायुक्त अँप  (२.०.१४) यावर्षी सुरू करण्यात आलेले  आहे. नवीन सुविधांमध्ये पुढील सुविधांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे नोंदवलेली पीक पाहणी ४८ तासांमध्ये स्वतःहून केव्हाही एक वेळेस दुरुस्त करता येईल. किमान आधारभूत योजनेंतर्गत येणाऱ्या पिकांची ई-पीक पाहणीसाठी नोंदणी केल्यास अशा शेतकऱ्यांची माहिती वेब आज्ञावलीद्वारे पुरवठा विभागाला दिली जाणार आहे. त्याआधारे किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत अशा शेतकऱ्यांची नोंदणी आपोआप होणार आहे. खरेदी केंद्रामध्ये जाऊन रांगेत उभे राहून नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही.

शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेल्या पिकांबाबत आज्ञावलीमध्ये स्वयंम घोषणापत्र घेतले जाणार असून शेतकऱ्यांनी केलेली पीक पाहणी स्वयंप्रमाणित मानण्यात येईल. शेतकऱ्यांनी केलेल्या पीक पाहणीपैकी १० टक्के नोंदीची पडताळणी तलाठ्यांमार्फत करण्यात येणार आहे. तलाठी पडताळणीअंती आवश्यक असल्यास दुरुस्ती करून त्या नोंदी सत्यापित करतील व त्यानंतर त्या गाव नमुना नंबर १२ मध्ये प्रतिबिंबित होतील.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीthaneठाणे