शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

बाधीत शेती-पीक पंचनाम्यांसाठी काळूच्या खोऱ्यातील शेतकऱ्यांचे मुरबाड तहसीलदारास साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 19:37 IST

त्वरीत पंचमाने करण्याच्या मागणीसाठी काळू धरण विरोधी संघर्ष समितीचे पोपटराव देशमुख, रामचंद्र देशमुख आणि रंगनाथ देशमुख यांनी तहसीलदारांना साकडे घातले. यावेळी त्यांनी शेती नुकसान व पूरग्रस्त तळेगाव, खरशेत-उमरोली, जडई ,फांगळोशी,दिघेफळ, आंबिवली, चासोळे, खुटल (बा.), न्याहाडी, फांगणे,भोरांडे, उदाळडोह या महसूली गांवासह

ठळक मुद्देमहसूल यंत्रणेच्या पंचनामा पथकांस विलंबशेतकऱ्यांना अतिवृष्टी व पूरस्थितीचा सर्वाधीक फटकाशेत जमिनीसह भातपीक नुकसानीची जाणीव तहसीलदारांना करून दिली

ठाणे : अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या खरीप पिकांसह शेत जमिनीच्या नुकसानीचे पंचनामे आजपर्यंत बहुतांशी शेतकऱ्यांचे झाले नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. महसूल यंत्रणेच्या पंचनामा पथकांस विलंब झाल्यामुळे मुरबाड तालुक्यातील काळू नदी परिसरातील शेतकऱ्यांनी त्वरीत पंचनामे करण्यासाठी तहसीलदार अमोल कदम यांना लेखी निवेदनाव्दारे साकडे घातले आहे.         ‘अतिवृष्टीतील सात हजार हेक्टर पिकांचे पंचनामे अर्धवट’ या मथळ्याखालाी लोकमतने २१ आॅगस्ट रोजी वृत्तप्रसिध्द करून शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा हा विषय उघड केला . पंचनामे होऊन नुकसान भरपाईसाठी पात्र ठरणारे शेतकरी शासनाच्या लाभापासून विंचत आहे. तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात असल्याचे शासनाकडून सांगितले जात आहे. पण बहुतांशी शेतांवर पंचनामा पथक अद्यापही पोहोचलेले नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. यावर मात करण्यासाठी काही शेतकरी स्वत:च तलाठी, सर्कल व तहसीलदार या महसूल यंत्रणांकडे फेऱ्यां  मारून मारीत आहेत. तर काही स्वत: लेखी निवेदन घेऊन तहसीलदारांना साकडे घालत असल्याचे वास्तव जिल्ह्यात दिसून येत आहे.        मुरबाड तालुक्यात १२ गांवांमधील ३५८ शेतकऱ्यांच्या ७५.३६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे झाल्याचे काही दिवसांपूर्वीच स्पष्ट करण्यात आले. उर्वरित १८ गावांच्या २९२ शेतकºयांच्या २८.५० हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे अर्धवट झाल्याचे निदर्शना आले. यातील संतापलेल्या काळ परिसरातील शेतकऱ्यांनी तहसीलदार कदम यांना लेखी निवेदनाव्दारे साकडे घालून पंचनाम त्वरीत करण्याची मागणी लावून धरली. काळू धरण प्रकल्प विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शुक्रवारी लेखी निवेदन देत प्रशासनाच पंचनामे त्वरीत करण्याची जाणीव करून दिली आहे.काळूनदी परिसरातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पूरस्थितीचा सर्वाधीक फटका खरीप पिकांसह फळबागांना देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे.       मुरबाड तालुक्यातील या काळू नदी परिसरातील ३० ते ४० हेक्टर भातपिकांसह २५० हेक्टर शेत जमीन बाधीत झाल्याचा आंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. सुमारे २६० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांचे त्वरीत पंचमाने करण्याच्या मागणीसाठी काळू धरण विरोधी संघर्ष समितीचे पोपटराव देशमुख, रामचंद्र देशमुख आणि रंगनाथ देशमुख यांनी तहसीलदारांना साकडे घातले. यावेळी त्यांनी शेती नुकसान व पूरग्रस्त तळेगाव, खरशेत-उमरोली, जडई ,फांगळोशी,दिघेफळ, आंबिवली, चासोळे, खुटल (बा.), न्याहाडी, फांगणे,भोरांडे, उदाळडोह या महसूली गांवासह कुंडाचीवाडी,भट्टीचीवाडी,भिकारवाडी, शिरसोनवाडी आणि वाकळवाडी आदी गावपाड्यांसह वाड्यांमधील शेकडो शेतकऱ्यांच्या शेत जमिनीसह भातपीक नुकसानीची जाणीव तहसीलदारांना   करून दिली आहे...

टॅग्स :thaneठाणेFarmerशेतकरी