शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

लॉकडाऊनच्या आघाताने तुटली कुटुंबाची नाळ, पत्नीचा शोध, मुलांच्या ताब्यासाठी धडपड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 09:06 IST

लॉकडाऊनमध्ये व्यवसाय गेल्याने अनेकांना बेरोजगारीचा सामना करावा लागला. यातूनच कुटुंबाची वाताहत झाल्याचे वास्तव नुकत्याच घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेतून उघड झाले आहे.

-  प्रशांत माने डोंबिवली : लॉकडाऊनमध्ये व्यवसाय गेल्याने अनेकांना बेरोजगारीचा सामना करावा लागला. यातूनच कुटुंबाची वाताहत झाल्याचे वास्तव नुकत्याच घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेतून उघड झाले आहे. तान्हुली मुले बेवारस स्थितीत सोडून बेपत्ता झालेल्या पत्नी रत्नमालाचा एकीकडे शोध घेत असताना दुसरीकडे मुलांचा ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात सुब्रत साहू यांची सुरू असलेली धडपड काळजाला हात घालणारी आहे.कचोरे खाडीच्या परिसरात दोन लहान मुलांना सोडून रत्नमाला बेपत्ता झाली. चार दिवस उलटूनही तिचा शोध लागलेला नाही. मुलांना डोंबिवलीतील ‘जननी आशिष’ या बालसंगोपन केंद्रात ठेवले आहे. त्यांचे वडील सुब्रत यांची पत्नीचा शोध घेण्याबरोबरच मुलांचा ताबा घेण्यासाठीही धडपड सुरू आहे.साहू कुटुंब ठाकुर्लीतील ९० फुटी रोड परिसरात राहते. सुब्रत यांचा सलूनचा व्यवसाय होता, तर रत्नमाला ब्युटी पार्लर चालवायची. परंतु, लॉकडाऊनमध्ये दोघांचे व्यवसाय बंद पडले. त्यातच सुब्रत यांचा अपघात झाल्याने हे कुटुंब पुरते कोलमडले होते. या ताणातूनच रत्नमालाने आत्महत्या केली का, अशी शंका ती बेपत्ता झाल्याने उपस्थित होत आहे. परंतु, खाडीकिनारी तिचा शोध लागलेला नाही. त्यामुळे तिने आत्महत्या केली की अन्य काही, या चर्चांनाही उधाण आले आहे. सुब्रत हे पत्नीच्या शोधासाठी एकटेच सर्वत्र फिरत आहेत. त्यांच्या सोबतीला ना त्यांचे नातेवाईक अथवा मित्र. विष्णूनगर आणि टिळकनगर पोलीस ठाण्यांची वारी असो. तसेच मुलांच्या ताब्यासाठी उल्हासनगरमधील बालकल्याण समितीपुढे सुनावणीसाठी जाणे असो, यात त्यांची फरफट होत आहे.मुले ‘जननी आशिष’ बाल संगोपन केंद्रात असल्याने सुब्रत यांनी तेथे भेटीसाठी बुधवारी धाव घेतली. परंतु, कोरोनाच्या नियमाप्रमाणे मुले पाच दिवस क्वारंटाइन असल्याने ती जवळून भेटू शकली नाहीत. लांबूनच त्यांना मुलांना पाहता आले. दरम्यान, मुलांचा ताबा मिळण्यासाठी अनेक प्रक्रिया पार पाडाव्या लागणार आहेत. पोलीस ठाण्यात हे प्रकरण असल्याने त्यांचीही परवानगी लागणार असून मुलांची काळजी घेण्याची हमी मिळाल्यावरच त्यांचा ताबा सुब्रत यांना मिळणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली.सांभाळण्यासाठी महिला असेल, तरच मुलांचा ताबाघरात मुलांचा सांभाळ करण्यासाठी सक्षम महिला असल्यास मुलांचा ताबा घेऊ शकता, असा निर्णय बाल कल्याण समितीने गुरुवारच्या सुनावणीदरम्यान दिल्याने सुब्रत यांना दिलासा मिळाला आहे. सुब्रत घरी सध्या एकटेच आहेत. त्यामुळे मुलांना सांभाळण्याची व्यवस्था केल्यानंतरच मुलांना घरी नेता येणार आहे. तोपर्यंत जननी आशिष येथेच दररोज मुलांना भेटण्याची परवानगीही त्यांना देण्यात आली आहे.  

टॅग्स :Familyपरिवार