शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या आघाताने तुटली कुटुंबाची नाळ, पत्नीचा शोध, मुलांच्या ताब्यासाठी धडपड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 09:06 IST

लॉकडाऊनमध्ये व्यवसाय गेल्याने अनेकांना बेरोजगारीचा सामना करावा लागला. यातूनच कुटुंबाची वाताहत झाल्याचे वास्तव नुकत्याच घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेतून उघड झाले आहे.

-  प्रशांत माने डोंबिवली : लॉकडाऊनमध्ये व्यवसाय गेल्याने अनेकांना बेरोजगारीचा सामना करावा लागला. यातूनच कुटुंबाची वाताहत झाल्याचे वास्तव नुकत्याच घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेतून उघड झाले आहे. तान्हुली मुले बेवारस स्थितीत सोडून बेपत्ता झालेल्या पत्नी रत्नमालाचा एकीकडे शोध घेत असताना दुसरीकडे मुलांचा ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात सुब्रत साहू यांची सुरू असलेली धडपड काळजाला हात घालणारी आहे.कचोरे खाडीच्या परिसरात दोन लहान मुलांना सोडून रत्नमाला बेपत्ता झाली. चार दिवस उलटूनही तिचा शोध लागलेला नाही. मुलांना डोंबिवलीतील ‘जननी आशिष’ या बालसंगोपन केंद्रात ठेवले आहे. त्यांचे वडील सुब्रत यांची पत्नीचा शोध घेण्याबरोबरच मुलांचा ताबा घेण्यासाठीही धडपड सुरू आहे.साहू कुटुंब ठाकुर्लीतील ९० फुटी रोड परिसरात राहते. सुब्रत यांचा सलूनचा व्यवसाय होता, तर रत्नमाला ब्युटी पार्लर चालवायची. परंतु, लॉकडाऊनमध्ये दोघांचे व्यवसाय बंद पडले. त्यातच सुब्रत यांचा अपघात झाल्याने हे कुटुंब पुरते कोलमडले होते. या ताणातूनच रत्नमालाने आत्महत्या केली का, अशी शंका ती बेपत्ता झाल्याने उपस्थित होत आहे. परंतु, खाडीकिनारी तिचा शोध लागलेला नाही. त्यामुळे तिने आत्महत्या केली की अन्य काही, या चर्चांनाही उधाण आले आहे. सुब्रत हे पत्नीच्या शोधासाठी एकटेच सर्वत्र फिरत आहेत. त्यांच्या सोबतीला ना त्यांचे नातेवाईक अथवा मित्र. विष्णूनगर आणि टिळकनगर पोलीस ठाण्यांची वारी असो. तसेच मुलांच्या ताब्यासाठी उल्हासनगरमधील बालकल्याण समितीपुढे सुनावणीसाठी जाणे असो, यात त्यांची फरफट होत आहे.मुले ‘जननी आशिष’ बाल संगोपन केंद्रात असल्याने सुब्रत यांनी तेथे भेटीसाठी बुधवारी धाव घेतली. परंतु, कोरोनाच्या नियमाप्रमाणे मुले पाच दिवस क्वारंटाइन असल्याने ती जवळून भेटू शकली नाहीत. लांबूनच त्यांना मुलांना पाहता आले. दरम्यान, मुलांचा ताबा मिळण्यासाठी अनेक प्रक्रिया पार पाडाव्या लागणार आहेत. पोलीस ठाण्यात हे प्रकरण असल्याने त्यांचीही परवानगी लागणार असून मुलांची काळजी घेण्याची हमी मिळाल्यावरच त्यांचा ताबा सुब्रत यांना मिळणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली.सांभाळण्यासाठी महिला असेल, तरच मुलांचा ताबाघरात मुलांचा सांभाळ करण्यासाठी सक्षम महिला असल्यास मुलांचा ताबा घेऊ शकता, असा निर्णय बाल कल्याण समितीने गुरुवारच्या सुनावणीदरम्यान दिल्याने सुब्रत यांना दिलासा मिळाला आहे. सुब्रत घरी सध्या एकटेच आहेत. त्यामुळे मुलांना सांभाळण्याची व्यवस्था केल्यानंतरच मुलांना घरी नेता येणार आहे. तोपर्यंत जननी आशिष येथेच दररोज मुलांना भेटण्याची परवानगीही त्यांना देण्यात आली आहे.  

टॅग्स :Familyपरिवार